शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

गट ‘ब’ अधिकाऱ्यांच्या बदल्या आयुक्तस्तरावर

By admin | Updated: February 13, 2015 01:54 IST

सत्तेत आलेल्या युती सरकारने प्रथमच प्रशासकीय फेरबदलाची भूमिका स्वीकारली आहे. यात अधिकारांच्या विकेंद्रीकरणावर भर दिला जात आहे.

यवतमाळ : सत्तेत आलेल्या युती सरकारने प्रथमच प्रशासकीय फेरबदलाची भूमिका स्वीकारली आहे. यात अधिकारांच्या विकेंद्रीकरणावर भर दिला जात आहे. प्रशासकीय कामकाजाला गती मिळावी, या दृष्टिकोनातून हा बदल होत असून, आता विभागीय आयुक्तांना महाराष्ट्र विकास सेवेतील गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास अधिनियम २००५ हा १ जुलै २००६ रोजीपासून अमलात आला. या अधिनियमातील कलम ६ नुसार महाराष्ट्र विकास सेवा, गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले. याबाबत कोणत्याही दुय्यम प्राधिकाऱ्याकडे बदली अधिकार प्रत्यार्पीत करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले. यासाठी २००५ च्या अधिनियमातील कलम ६ अंतर्गत येत असलेल्या २ व ७ मधील तरतूदी एकत्रीत विचारात घेऊन बदली अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. महसूल विभागात याच अधिनियमाचा आधार घेऊन गट ब संवर्गातून अधिकाऱ्यांच्या महसूल विभागात बदल्या करावयाच्या असल्याच त्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आला आहे. मात्र या कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कारणावरून अथवा विनंती बदली करावयाची असल्यास त्यासाठी आयुक्तांना बदली अधिनियमातील कलम ४ (४) व ५ नुसार शासनाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. बदलीपात्र अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी समुपदेशनाची प्रक्रिया राबवावी असे निर्देश देण्यात आले आहे. यासाठी बदली अधिनियम २००५ मधील तरतूदींचा आधार घ्यावा हेही स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीस्तरावर गट ‘ब’ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागत असे. आता विभागीय स्तरावर अधिकार आल्याने कामकाजात गती येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)