शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

वणीमार्गे जनावरांची तस्करी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 21:46 IST

कत्तलीसाठी जनावरांची वणी मार्गे तस्करी सुरूच आहे. नागपूर ते आदिलाबाद मार्गावरील पोलिसांना गुंगारा देत वणीमार्गे जनावरांना ट्रकद्वारे नेण्याचा प्रयत्न शुक्रवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने उधळून लावला. या कारवाईत ३४ जनावरांना पोलिसांनी जीवदान दिले.

ठळक मुद्दे३४ जनावरांना जीवदान : साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त, एसडीपीओ पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : कत्तलीसाठी जनावरांची वणी मार्गे तस्करी सुरूच आहे. नागपूर ते आदिलाबाद मार्गावरील पोलिसांना गुंगारा देत वणीमार्गे जनावरांना ट्रकद्वारे नेण्याचा प्रयत्न शुक्रवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने उधळून लावला. या कारवाईत ३४ जनावरांना पोलिसांनी जीवदान दिले. ट्रकसह एकूण १३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.जनावरांच्या तस्करीचे मुख्य केंद्र असलेल्या नागपुरातून दररोज शेकडो जनावरांना कत्तलीसाठी तेलंगाणातील आदिलाबाद येथे नेले जात आहे. शुक्रवारी जनावरांनी भरलेला एक ट्रक वणीमार्गे आदिलाबादकडे जाणार असल्याची गोपनिय माहिती वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्या विशेष पथकाने वणी शहरालगतच्या चंद्रपूर मार्गावरील टोलनाक्याजवळ शुक्रवारी रात्री सापळा रचला. दरम्यान, नागपूरकडून एक संशयास्पद ट्रक टोलनाक्याजवळ पोहचताच, पोलीस पथकाने त्या ट्रकला अडविले असता, ट्रकचालकाने ट्रकसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकातील पोलिसांनी जीव धोक्यात टाकून ट्रकचालकाच्या मुसक्या आवळल्या. ट्रकची तपासणी केली असता, ट्रकमध्ये तब्बल ३४ बैल निर्दयपणे कोंबून असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. यावेळी ट्रकचालक शेख महेफूस शेख महेबूब (२५) रा.आझादनगर नागपूर व इम्रानखान करीम खान पठाण (३०) रा.नागमंदिर गोधणी रोड नागपूर या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध कलम ११ घ.ड.झ.प्राणीमात्रांना निर्दयपणे वागणूक देणे प्रती कायदा सहकलम ५ अ.ब.प्राणी संरक्षक कायदा व ४२९, ३४ भादंवि ८३, १७७ मोवाका प्रमाणे गुन्हा नोंदवून तपासात घेतला. जनावरांची सुटका करण्यात आल्यानंतर सर्व जनावरांना रासा येथील गुरू गणेश गोशालेत दाखल करण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या जनावरांची किंमती सहा लाख ६० हजार रुपये आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली नायक पोलीस दिलीप अडकीने पोलीस शिपाई आशिष टेकाडे, रवी ईसनकर, संतोष अण्णा यांनी पार पाडली.पोलिसांच्या कारवाया वाढल्याने मधल्या काळात जनावरांची तस्करी थंडावली होती. मात्र तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. नागपूर हे जनावरांच्या तस्करीचे मुख्य केंद्र बनले आहे. तेथून आदिलाबादकडे जनावरांना कत्तलीसाठी नेले जाते. नागपूर ते आदिलाबादपर्यंत अनेक पोलीस ठाणी लागतात. परंतु पोलिसांचे सुरक्षा कवच भेदून जनावरांना कत्तलीसाठी नेले जात आहे. तस्करीचे फार मोठे रॅकेट सक्रीय असल्याचे बोलले जाते.