शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वणीमार्गे जनावरांची तस्करी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 21:46 IST

कत्तलीसाठी जनावरांची वणी मार्गे तस्करी सुरूच आहे. नागपूर ते आदिलाबाद मार्गावरील पोलिसांना गुंगारा देत वणीमार्गे जनावरांना ट्रकद्वारे नेण्याचा प्रयत्न शुक्रवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने उधळून लावला. या कारवाईत ३४ जनावरांना पोलिसांनी जीवदान दिले.

ठळक मुद्दे३४ जनावरांना जीवदान : साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त, एसडीपीओ पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : कत्तलीसाठी जनावरांची वणी मार्गे तस्करी सुरूच आहे. नागपूर ते आदिलाबाद मार्गावरील पोलिसांना गुंगारा देत वणीमार्गे जनावरांना ट्रकद्वारे नेण्याचा प्रयत्न शुक्रवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने उधळून लावला. या कारवाईत ३४ जनावरांना पोलिसांनी जीवदान दिले. ट्रकसह एकूण १३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.जनावरांच्या तस्करीचे मुख्य केंद्र असलेल्या नागपुरातून दररोज शेकडो जनावरांना कत्तलीसाठी तेलंगाणातील आदिलाबाद येथे नेले जात आहे. शुक्रवारी जनावरांनी भरलेला एक ट्रक वणीमार्गे आदिलाबादकडे जाणार असल्याची गोपनिय माहिती वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्या विशेष पथकाने वणी शहरालगतच्या चंद्रपूर मार्गावरील टोलनाक्याजवळ शुक्रवारी रात्री सापळा रचला. दरम्यान, नागपूरकडून एक संशयास्पद ट्रक टोलनाक्याजवळ पोहचताच, पोलीस पथकाने त्या ट्रकला अडविले असता, ट्रकचालकाने ट्रकसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकातील पोलिसांनी जीव धोक्यात टाकून ट्रकचालकाच्या मुसक्या आवळल्या. ट्रकची तपासणी केली असता, ट्रकमध्ये तब्बल ३४ बैल निर्दयपणे कोंबून असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. यावेळी ट्रकचालक शेख महेफूस शेख महेबूब (२५) रा.आझादनगर नागपूर व इम्रानखान करीम खान पठाण (३०) रा.नागमंदिर गोधणी रोड नागपूर या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध कलम ११ घ.ड.झ.प्राणीमात्रांना निर्दयपणे वागणूक देणे प्रती कायदा सहकलम ५ अ.ब.प्राणी संरक्षक कायदा व ४२९, ३४ भादंवि ८३, १७७ मोवाका प्रमाणे गुन्हा नोंदवून तपासात घेतला. जनावरांची सुटका करण्यात आल्यानंतर सर्व जनावरांना रासा येथील गुरू गणेश गोशालेत दाखल करण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या जनावरांची किंमती सहा लाख ६० हजार रुपये आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली नायक पोलीस दिलीप अडकीने पोलीस शिपाई आशिष टेकाडे, रवी ईसनकर, संतोष अण्णा यांनी पार पाडली.पोलिसांच्या कारवाया वाढल्याने मधल्या काळात जनावरांची तस्करी थंडावली होती. मात्र तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. नागपूर हे जनावरांच्या तस्करीचे मुख्य केंद्र बनले आहे. तेथून आदिलाबादकडे जनावरांना कत्तलीसाठी नेले जाते. नागपूर ते आदिलाबादपर्यंत अनेक पोलीस ठाणी लागतात. परंतु पोलिसांचे सुरक्षा कवच भेदून जनावरांना कत्तलीसाठी नेले जात आहे. तस्करीचे फार मोठे रॅकेट सक्रीय असल्याचे बोलले जाते.