शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

तेलंगणा सीमेवर जनावरांची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:57 IST

मध्यंतरी पोलिसांच्या कारवाया वाढल्याने भूमिगत झालेल्या जनावरांच्या तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दोन राज्यांच्या सीमेवरून दररोज शेकडो जनावरे कत्तलीसाठी तेलंगणाकडे नेली जात आहे. गुराख्यांचे सोंग घेऊन ही तस्करी केली जात आहे.

ठळक मुद्देफंडा बदलविला : गुराख्याचे सोंग घेऊन गोधन केले जाते सीमापार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : मध्यंतरी पोलिसांच्या कारवाया वाढल्याने भूमिगत झालेल्या जनावरांच्या तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दोन राज्यांच्या सीमेवरून दररोज शेकडो जनावरे कत्तलीसाठी तेलंगणाकडे नेली जात आहे. गुराख्यांचे सोंग घेऊन ही तस्करी केली जात आहे. या तस्करांना आवर घालण्याचे मोठे आव्हान वणी उपविभागातील पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.काही महिन्यांपूर्वी जनावरे ट्रकमध्ये कोंबून नेली जायची. त्यामुळे अनेकदा या तस्करांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत होते. तस्करीचे मुख्य केंद्र हे नागपूर असल्याने नागपुरात जनावरांना ट्रकमध्ये कोंबून वणीमार्गे ही जनावरे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेली जायची. परंतु पोलिसांनी तस्करांविरूद्ध कारवाईचा फास आवळल्याने या मार्गाने ट्रकने जनावरे नेण्याचा प्रकार काहीअंशी बंद झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी यावर मात करण्यासाठी तस्करांनी नवा फंडा अवलंबविला आहे. झरीच्या जंगलात जनावरे एकत्र करायची. त्यानंतर १० जनावरांच्यामागे एक मजूर लावून त्या जनावरांना चोरट्या जंगल मार्गाने तेलंगणात पोहोचते करायचे. असा नवा फंडा या तस्करांनी अवलंबविला आहे. एक माणुस १० जनावरे घेऊन जात असल्याने तो गुराखीच असावा, असे पाहणाऱ्याला वाटते. त्यामुळे ही तस्करी यशस्वी होऊ लागली आहे. या तस्करीत वणी उपविभागातील अनेक लोक गुंतले असून तेलंगणातील तस्करांशी त्यांचा दैनंदिन व्यवहार असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली.रस्त्याने १० जनावरे घेऊन जाणाºया व्यक्तीचा कुणालाच संशय येत नसल्याने तो व्यक्ती ही जनावरे घेऊन सहीसलामत तेलंगणात पोहोचत आहे. तेलंगणातील काही तस्कर एजंटांच्या माध्यमातून सिमेवरील गावातून जनावरांची कमी पैशात खरेदी करून ती कत्तलीसाठी घेऊन जात आहेत.जनावरे हाकत नेणाºया मजुराला रग्गड मजुरी दिली जात असल्याने तोदेखिल निडरपणे तस्करीतील ही जनावरे तेलंगणात पोहोचवित आहे. या धंद्यात दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत असल्याचे बोलले जाते. झरी तालुक्यातील पाटण येथे पोलीस ठाणे आहे. मात्र पाटण पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून दिवसाढवळ्या ही तस्करी केली जात असल्याची चर्चा आहे. या तस्करीचे तार मारेगावातही जुळले असल्याचे सांगितले जाते. मारेगाव आणि झरी तालुके अगदी जवळ आहेत.चारा टंचाईमुळे ग्रामीण भागात जनावरे विक्रीलायंदा निसर्गाच्या प्रकोपामुळे शेती उत्पादनावर परिणाम झाला. त्यातच पाऊस कमी झाल्याने आगामी काळात चाºयाची टंचाई जाणवू शकते. ही बाब लक्षात घेऊन अनेकांनी आपले गोधन विक्रीला काढले आहे. तस्कर ते गोधन अल्प किमतीत खरेदी करीत आहेत.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ