शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

तेलंगणा सीमेवर जनावरांची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:57 IST

मध्यंतरी पोलिसांच्या कारवाया वाढल्याने भूमिगत झालेल्या जनावरांच्या तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दोन राज्यांच्या सीमेवरून दररोज शेकडो जनावरे कत्तलीसाठी तेलंगणाकडे नेली जात आहे. गुराख्यांचे सोंग घेऊन ही तस्करी केली जात आहे.

ठळक मुद्देफंडा बदलविला : गुराख्याचे सोंग घेऊन गोधन केले जाते सीमापार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : मध्यंतरी पोलिसांच्या कारवाया वाढल्याने भूमिगत झालेल्या जनावरांच्या तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दोन राज्यांच्या सीमेवरून दररोज शेकडो जनावरे कत्तलीसाठी तेलंगणाकडे नेली जात आहे. गुराख्यांचे सोंग घेऊन ही तस्करी केली जात आहे. या तस्करांना आवर घालण्याचे मोठे आव्हान वणी उपविभागातील पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.काही महिन्यांपूर्वी जनावरे ट्रकमध्ये कोंबून नेली जायची. त्यामुळे अनेकदा या तस्करांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत होते. तस्करीचे मुख्य केंद्र हे नागपूर असल्याने नागपुरात जनावरांना ट्रकमध्ये कोंबून वणीमार्गे ही जनावरे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेली जायची. परंतु पोलिसांनी तस्करांविरूद्ध कारवाईचा फास आवळल्याने या मार्गाने ट्रकने जनावरे नेण्याचा प्रकार काहीअंशी बंद झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी यावर मात करण्यासाठी तस्करांनी नवा फंडा अवलंबविला आहे. झरीच्या जंगलात जनावरे एकत्र करायची. त्यानंतर १० जनावरांच्यामागे एक मजूर लावून त्या जनावरांना चोरट्या जंगल मार्गाने तेलंगणात पोहोचते करायचे. असा नवा फंडा या तस्करांनी अवलंबविला आहे. एक माणुस १० जनावरे घेऊन जात असल्याने तो गुराखीच असावा, असे पाहणाऱ्याला वाटते. त्यामुळे ही तस्करी यशस्वी होऊ लागली आहे. या तस्करीत वणी उपविभागातील अनेक लोक गुंतले असून तेलंगणातील तस्करांशी त्यांचा दैनंदिन व्यवहार असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली.रस्त्याने १० जनावरे घेऊन जाणाºया व्यक्तीचा कुणालाच संशय येत नसल्याने तो व्यक्ती ही जनावरे घेऊन सहीसलामत तेलंगणात पोहोचत आहे. तेलंगणातील काही तस्कर एजंटांच्या माध्यमातून सिमेवरील गावातून जनावरांची कमी पैशात खरेदी करून ती कत्तलीसाठी घेऊन जात आहेत.जनावरे हाकत नेणाºया मजुराला रग्गड मजुरी दिली जात असल्याने तोदेखिल निडरपणे तस्करीतील ही जनावरे तेलंगणात पोहोचवित आहे. या धंद्यात दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत असल्याचे बोलले जाते. झरी तालुक्यातील पाटण येथे पोलीस ठाणे आहे. मात्र पाटण पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून दिवसाढवळ्या ही तस्करी केली जात असल्याची चर्चा आहे. या तस्करीचे तार मारेगावातही जुळले असल्याचे सांगितले जाते. मारेगाव आणि झरी तालुके अगदी जवळ आहेत.चारा टंचाईमुळे ग्रामीण भागात जनावरे विक्रीलायंदा निसर्गाच्या प्रकोपामुळे शेती उत्पादनावर परिणाम झाला. त्यातच पाऊस कमी झाल्याने आगामी काळात चाºयाची टंचाई जाणवू शकते. ही बाब लक्षात घेऊन अनेकांनी आपले गोधन विक्रीला काढले आहे. तस्कर ते गोधन अल्प किमतीत खरेदी करीत आहेत.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ