शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

पैनगंगेतून रेती तस्करी

By admin | Updated: March 27, 2015 01:43 IST

तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून अवैध रेती उत्खनन जोरात सुरू आहे. याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शासनाला लाखो रुपयांचा चूना लागत आहे.

उमरखेड : तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून अवैध रेती उत्खनन जोरात सुरू आहे. याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शासनाला लाखो रुपयांचा चूना लागत आहे.चातारी, बोरी, देवसरी, साखरा, लोहरा, बिटरगाव, सावळेश्वर, तिवरंग, दिवट पिंपरी, हातला आदी ठिकाणांवरून अवैधरित्या नियमबाह्य पद्धतीने रेती उत्खनन सुरू आहे. काही रेती घाटांचा लिलाव झालेला नाही. मात्र हा सर्व प्रकार तहसीलदारांना माहीत असतानाही याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. या परिसरातून रेती वाहतूक करणारी वाहने शेतीचे अतोनात नुकसान करीत आहे. अनेकांच्या शेतातून कालव्याचे मॅनर गेले असल्यामुळे या वाहनांच्या वाहतुकीमुळे मॅनरचीही तुटफूट होत आहे. यातूनही शासनाला नुकसान होत आहे.लाखो रुपये खर्च करून शासनाने इसापूर धरणाचा कालवा निर्माण केला. शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मिटण्यासाठी शासन विविध मार्ग अवलंबित आहे. मात्र येथील तहसील प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे अवैध रेती उत्खनन करणारे खुलेआम रेतीची वाहतूक करीत आहे. शासन रेती माफियांविरुद्ध कठोर पावले उचलत असले तरी त्यातूनही रितसर जडतोड करून येथील महसूल कर्मचारी पळवाटा काढत आहे. काही वाहनांना थातूरमातूर दंड ठोठावून कारवाई केल्याचे दाखविले जाते. शासनाने सुधारित प्रणालीचा वापर करून ज्या पद्धतीने कारवाईच्या अंमलबजावणीचा प्रयत्न सुरू केला असला तरीदेखील रेती चोर काही प्रणालींच्या विरोधात जावून आर्थिक साटेलोटे करून नदी पात्रातील रेती तेवढ्याच प्रमाणात चोरी करीत आहे. महसूल विभागाने काही अंश सुधार पद्धतीचा आव आणून चोरट्या उत्खननाला आळा बसला असल्याचे सांगितले असले तरी त्यामध्ये फारसे तथ्य नाही. रेती तस्कर आपले काम या ना त्या मार्गाने करीतच आहे. अवैध रेती उत्खननावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सक्षम पथक निर्माण करावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. (शहर प्रतिनिधी)