शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पांढरकवडा येथे वाहतूक व्यवस्थेचे वाजले तीनतेरा

By admin | Updated: August 13, 2015 03:16 IST

शहरात वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली असून त्याचे तीनतेरा वाजले आहे.

पांढरकवडा : शहरात वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली असून त्याचे तीनतेरा वाजले आहे. परिणामी अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज कुठे ना कुठे, लहान-मोठे अपघात घडत आहे़ याबाबत अनेकदा पोलीस, नगरपरिषदेकडे तक्रारी करूनही या गंभीर बाबीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही़ त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे़शहरातील राम मंदिर ते आखाडा रोड, चालबर्डी रोड आदी मार्गावर बहुतांश शाळा, महाविद्यालये आहेत. या मार्गावर रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारी वाहने दिवसभर उभी असतात. त्यामुळे वाहतूक प्रभावीत होत आहे. शहरात जागोजागी मोकाट जनावरेसुद्धा तळ ठोकून बसतात. पूर्वी मोकाट जनावरे कोंडवाड्यात टाकल्यानंतर त्यांचा लिलाव खासगी व्यक्तीला दिला जात होता. त्यामुळे मोकाट जनावरांची समस्या बऱ्याच प्रमाणात सुटली होती. तथापि गेल्या काही दिवसात शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोकाट जनावरांचे कळपच्या कळप दिसत आहे. त्यामुळेही वाहतूक समस्येत वाढ झाली आहे. शहरात वराहांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जागोजागी वराहांचे कळप रस्त्यांवरून फिरताना दिसतात़ सरळ घरातही घुसायला हे वराह मागे पुढे पाहत नाही. ते कधी-कधी सरळ घरातसुद्धा घुसतात़ त्यामुळे नागरिक वैतागले आहेत़ या वराहांच्या भर रस्त्यावरील भ्रमंतीमुळे वाहतुकही प्रभावीत होत असून त्यामुळे अपघात घडत आहे़ मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आखाडा मार्गावरील स्टेट बँकेजवळ वराहाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक खाली पडून त्याच्या डोक्याला मार लागनूत तो जखमी झाला़शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सुसाट वेगाने दुचाकी वाहने चालविण्याचे प्रमाणही वाढले आहे. भरधाव वाहने चालविणाऱ्या या मुलांना पालकांचा व इतर कुणाचाही धाक राहिला नसल्याचे निदर्शनास येत आहे. चालक परवाना मिळविण्याचे वय नसल्याने ८० ते ९० टक्के विद्यार्थ्यांजवळ वाहन चालविण्याचा परवानाच नाही. तथापि त्याची साधी चौकशी केली जात नाही. एका दुचाकीवर तिघे-तिघे, चौघे-चौघे बसून वेगाने वाहने चालविणाऱ्या या विद्यार्थ्यांवर कुणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे शाळा, महाविद्यालयाच्या वेळात हे नवखे वाहन चालक सुसाट वेगाने वाहने चालवितात. या अनिर्बंध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. नेहमीच विस्कळीत होणारी वाहतूक ही शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. येथील बसवेश्वर चौक, तहसील चौक, मेन चौक, बसस्थानक चौक, जैन चौक, ओम टॉकिज रोड, वाय पॉइंट चौक, बिरसा मुंडा चौक, डायमंड चौक, आठवडी बाजार रोड, स्टेट बँक चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. याबाबत शहरवासीयांनी अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. मात्र ही समस्या अद्यापही कायमच आहे. (तालुका प्रतिनिधी)