शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा येथे वाहतूक व्यवस्थेचे वाजले तीनतेरा

By admin | Updated: August 13, 2015 03:16 IST

शहरात वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली असून त्याचे तीनतेरा वाजले आहे.

पांढरकवडा : शहरात वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली असून त्याचे तीनतेरा वाजले आहे. परिणामी अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज कुठे ना कुठे, लहान-मोठे अपघात घडत आहे़ याबाबत अनेकदा पोलीस, नगरपरिषदेकडे तक्रारी करूनही या गंभीर बाबीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही़ त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे़शहरातील राम मंदिर ते आखाडा रोड, चालबर्डी रोड आदी मार्गावर बहुतांश शाळा, महाविद्यालये आहेत. या मार्गावर रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारी वाहने दिवसभर उभी असतात. त्यामुळे वाहतूक प्रभावीत होत आहे. शहरात जागोजागी मोकाट जनावरेसुद्धा तळ ठोकून बसतात. पूर्वी मोकाट जनावरे कोंडवाड्यात टाकल्यानंतर त्यांचा लिलाव खासगी व्यक्तीला दिला जात होता. त्यामुळे मोकाट जनावरांची समस्या बऱ्याच प्रमाणात सुटली होती. तथापि गेल्या काही दिवसात शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोकाट जनावरांचे कळपच्या कळप दिसत आहे. त्यामुळेही वाहतूक समस्येत वाढ झाली आहे. शहरात वराहांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जागोजागी वराहांचे कळप रस्त्यांवरून फिरताना दिसतात़ सरळ घरातही घुसायला हे वराह मागे पुढे पाहत नाही. ते कधी-कधी सरळ घरातसुद्धा घुसतात़ त्यामुळे नागरिक वैतागले आहेत़ या वराहांच्या भर रस्त्यावरील भ्रमंतीमुळे वाहतुकही प्रभावीत होत असून त्यामुळे अपघात घडत आहे़ मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आखाडा मार्गावरील स्टेट बँकेजवळ वराहाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक खाली पडून त्याच्या डोक्याला मार लागनूत तो जखमी झाला़शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सुसाट वेगाने दुचाकी वाहने चालविण्याचे प्रमाणही वाढले आहे. भरधाव वाहने चालविणाऱ्या या मुलांना पालकांचा व इतर कुणाचाही धाक राहिला नसल्याचे निदर्शनास येत आहे. चालक परवाना मिळविण्याचे वय नसल्याने ८० ते ९० टक्के विद्यार्थ्यांजवळ वाहन चालविण्याचा परवानाच नाही. तथापि त्याची साधी चौकशी केली जात नाही. एका दुचाकीवर तिघे-तिघे, चौघे-चौघे बसून वेगाने वाहने चालविणाऱ्या या विद्यार्थ्यांवर कुणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे शाळा, महाविद्यालयाच्या वेळात हे नवखे वाहन चालक सुसाट वेगाने वाहने चालवितात. या अनिर्बंध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. नेहमीच विस्कळीत होणारी वाहतूक ही शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. येथील बसवेश्वर चौक, तहसील चौक, मेन चौक, बसस्थानक चौक, जैन चौक, ओम टॉकिज रोड, वाय पॉइंट चौक, बिरसा मुंडा चौक, डायमंड चौक, आठवडी बाजार रोड, स्टेट बँक चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. याबाबत शहरवासीयांनी अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. मात्र ही समस्या अद्यापही कायमच आहे. (तालुका प्रतिनिधी)