शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

परंपरागत शेतीत बदल आवश्यक

By admin | Updated: August 30, 2015 02:15 IST

शेतकऱ्यांनी स्वाभिमानाने जीवन जगणे शिकले पाहिजे. आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही. बदलत्या वातावरणात आता शेती पिकात बदल करणे गरजेचे आहे,....

राजीव शेट्टी : अंबोडा येथे शेतकरी मेळावा, शेताची प्रत्यक्ष पाहणीमहागाव : शेतकऱ्यांनी स्वाभिमानाने जीवन जगणे शिकले पाहिजे. आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही. बदलत्या वातावरणात आता शेती पिकात बदल करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजीव शेट्टी यांनी केले. अंबोडा येथील गजानन महाराज संस्थानच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी ‘अमृत पॅर्टन’ पुस्तकाचे प्रकाशन खासदार शेट्टी यांच्या हस्ते झाले. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर प्रामुख्याने उपस्थित होते. खासदार शेट्टी पुढे म्हणाले, पुर्वी शेतीसाठी आर्थिक उलाढालीचे केंद्र हे त्या-त्या गावच्या सोसायट्या होते. जिल्हा मध्यवर्ती बँका त्यासाठी कर्ज पुरवठा करीत होत्या. शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीची बलस्थाने पांढरपेशांनी घेरली. शेतकऱ्यांच्या बँका असलेल्या संस्थेत प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला. शेतकऱ्यांना सावकार आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या दारात जावे लागत आहे. कधी बँका तर कधी सावकार शेतकऱ्यांची पिळवणूक करू लागले. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रकार वाढीस लागले. शासनाला शेतकरी आत्महत्येचे मुळ शोधण्यास बाध्य करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या संघटनांनी एकत्र लढा उभारण्याची गरज शेट्टी यांनी व्यक्त केली. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी यावेळी समयोचित मार्गदर्शन केले. डॉ. पंडित चव्हाण, जगदीश नरवाडे, मनीष जाधव, प्रकाश कोपरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नागोराव कदम, प्रकाश इंगोले, अमृतराव देशमुख, डॉ. संदीप शिंदे, हनवंतराव देशमुख, दादाराव ठाकरे, अविनाश पतंगराव, एम.डी. मिराशे, शंकरराव राजेगोरे, हरिभाऊ कुंडेकर, गुलाब शेतीच्या महिला शेतकरी लक्ष्मीबाई पारवेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)