शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

आर्णी तालुक्यात विवाह मेळाव्याची परंपरा

By admin | Updated: March 20, 2016 02:25 IST

अनाठायी खर्चाला आळा घालण्यासाठी तसेच वेळेची बचत म्हणून आर्णी तालुक्यात विवाह मेळाव्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.

खर्चाला आळा : तालुक्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या मेळाव्याचे आयोजनआर्णी : अनाठायी खर्चाला आळा घालण्यासाठी तसेच वेळेची बचत म्हणून आर्णी तालुक्यात विवाह मेळाव्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. अनेक मोठे विवाह मेळावे याठिकाणी झालेले आहेत. या मेळाव्यांना राज्यातील मोठ्या पदावरील लोकांनी भेटीसुद्धा दिल्या आहेत. तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी हे कोळवन येथे एका मेळाव्यासाठी आले होते तर आता २० मार्च रोजी तालुक्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विवाह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात ७५ विवाह पार पडणार असल्याची माहिती आयोजक माजी आमदार बाळासाहेब मुंनगीनवार यांनी दिली आहे. यापूर्वी मुंनगीनवार यांनी कोळवन येथे सहा विवाह मेळावे घेतलेले आहेत. १९९८ साली कोळवन येथे मोठा विवाह मेळावा झाला. त्यापूर्वी बौद्ध समाजाचा विवाह मेळावा म.द. भारती विद्यालयामध्ये झाला होता. त्यामध्ये १८ जोडप्यांचे विवाह झाले होते. त्याच दरम्यान दिग्रस तालुक्यात वडगाव येथे बंजारा समाजाचा मेळावा घेण्यात आला. त्या कार्यक्रमाला रामराव महाराज, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, अशोक शिंदे उपस्थित होते. ही सर्व मंडळी आर्णी येथेसुद्घा आली होती. बोरगाव येथील फुलसिंग नाईक यांनी १९७३ व त्यापूर्वी असे दोन विवाह मेळावे घेतले. एका मेळाव्यात तर त्यांनी स्वत:च्या मुलीचेही लग्न लावले. तत्कालिन महसूल मंत्री व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे या मेळाव्यासाठी उपस्थित होते. मागील १० वर्षांपासून आर्णीचे शेख आरीफ शेख अहेमद हे मुस्लिम विकास मंचकडून मुस्लिम समाजातील विवाह मेळावे घेत आहेत. १४७ जोडप्यांचे त्यांनी आजवर विवाह लावलेले आहेत. उमरी कापेश्वर येथील पांडुरंग मोरे महाविद्यालयात आदिवासी विवाह मेळावा झाला होता. लोणबेहळ येथे स्वत:च्या शेतात सतत चार वर्ष सुनील भारती व मित्र मंडळींनी आदिवासी विवाह मेळावे घेतले. त्यातून ५० लग्न लावलीत. केळझरा कोमटी येथील आकाश राठोड हा येत्या २३ एप्रिलला मेळावा घेत आहे. यामध्ये आतापर्यंत १६ विवाहांची नोंदणी झाली आहे. माळेगाव येथील रामराव डाखोरे यांनी स्वत: खर्च करून सर्वधर्मिय विवाह मेळावे घेतले आहेत. अशा अनेक विवाह मेळाव्याची परंपरा सातत्याने आर्णी तालुक्याने जपली आहे. (शहर प्रतिनिधी)