शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

व्यापाऱ्यांचा कापूस वाळतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 06:00 IST

या कापसात २५ ते ४५ टक्क्यांपर्यंत ओलावा आहे. ओलावा असलेल्या कापसाचे जिनिंगच होत नाही. हा कापूस सडतो. त्यातून सुतही निघत नाही. यामुळे खरेदी झालेला कापूस व्यापाऱ्यांनी जिनिंगमध्ये वाळू घातला आहे. यातून जिनमध्ये पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिलेली नाही. हा संपूर्ण कापूस वाळवून नंतर त्याचे जिनिंग होणार आहे. या प्रक्रियेला आठ दिवसाचा कालावधी लागणार आहे.

ठळक मुद्दे१० हजार क्विंटल । परतीच्या पावसाने भिजला, राळेगावातील जिनिंग-प्रेसिंग फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील पहिले कापूस खरेदी केंद्र राळेगावात सुरू झाले. येथे शुभारंभालाच १० हजार क्विंटल कापसाची आवक झाली. विक्रीस आलेला कापूस परतीच्या पावसाने भिजलेला असल्याने तो व्यापाऱ्यांना वाळवत टाकावा लागला आहे. यातून जिनिंग सेंटर हाऊसफुल्ल झाले. त्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत कापूस खरेदी थांबविण्यात आली आहे.राळेगाव बाजार समितीच्या हद्दीत सीसीआयचे तीन कापूस संकलन केंद्र शुक्रवारपासून सुरू झाले. सीसीआयला ८ ते १२ टक्के ओलावा असणारा कापूस लागतो. यामुळे शुभारंभाला आलेला कापूस सीसीआयने खरेदीच केला नाही. व्यापाऱ्यांनी ४८०० रूपये क्विंटल दराने कापसाची खरेदी केली. हा कापूस ओलाचिंब आहे.या कापसात २५ ते ४५ टक्क्यांपर्यंत ओलावा आहे. ओलावा असलेल्या कापसाचे जिनिंगच होत नाही. हा कापूस सडतो. त्यातून सुतही निघत नाही. यामुळे खरेदी झालेला कापूस व्यापाऱ्यांनी जिनिंगमध्ये वाळू घातला आहे. यातून जिनमध्ये पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिलेली नाही. हा संपूर्ण कापूस वाळवून नंतर त्याचे जिनिंग होणार आहे. या प्रक्रियेला आठ दिवसाचा कालावधी लागणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत कापूस खरेदी बंद ठेवली आहे. बाजार समितीनेही त्याबाबत घोषणा केली आहे.प्रतीक्षा शासकीय खरेदीचीखुल्या बाजारात कापसाचे दर पडले आहेत. या स्थितीत शासकीय खरेदी केंद्र उघडले तर शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबणार आहे. खेडा खरेदीलाही मोठा हातभार लागणार आहे. यामुळे शेतकरी शासकीय खरेदी केंद्र कधी उघडणार, याची वाट पाहात आहेत.कापूस उत्पादकांची कोंडीजिल्ह्यात सर्वाधिक पेरा कापसाचा आहे. कापसाला चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात केंद्र शासनाने कापसाची आयात केली. यामुळे कापसाचे दर पडले आहेत. या स्थितीत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. यातून कापसाचे दर आणखी घसरले आहे.प्रथमच निर्माण झाली विदारक स्थितीपरतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या स्थितीत ओलाचिंब कापूस बाजारात आला. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अवस्था पाहता या कापसाची खरेदी केली आहे. कापूस खरेदीत प्रथमच अशी विदारक अवस्था पहायला मिळाली. यातून बाजार जिनिंग प्रेसिंगमध्ये कापसाच्या गंज्या न लागता वाळवत ठेवल्याचे दृश्य पहायला मिळत आहे.सरकारच नाही तर केंद्र उघडणार कोण?सध्या राज्यात काळजीवाहू सरकार आहे. अशा सरकारला निर्णय घेताना मर्यादा पडतात. यामुळे शासकीय कापूस संकलन केंद्र उघडणार किंवा नाही, हा खरा प्रश्न आहे. यामुळे कापूस विक्रीकरिता शेतकऱ्यांना सध्या तरी खासगी व्यापाऱ्यांच्याच खरेदीवर अवलंबून राहावे लागणार आहे. हा पेच सोडविण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

टॅग्स :cottonकापूस