शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचा कापूस वाळतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 06:00 IST

या कापसात २५ ते ४५ टक्क्यांपर्यंत ओलावा आहे. ओलावा असलेल्या कापसाचे जिनिंगच होत नाही. हा कापूस सडतो. त्यातून सुतही निघत नाही. यामुळे खरेदी झालेला कापूस व्यापाऱ्यांनी जिनिंगमध्ये वाळू घातला आहे. यातून जिनमध्ये पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिलेली नाही. हा संपूर्ण कापूस वाळवून नंतर त्याचे जिनिंग होणार आहे. या प्रक्रियेला आठ दिवसाचा कालावधी लागणार आहे.

ठळक मुद्दे१० हजार क्विंटल । परतीच्या पावसाने भिजला, राळेगावातील जिनिंग-प्रेसिंग फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील पहिले कापूस खरेदी केंद्र राळेगावात सुरू झाले. येथे शुभारंभालाच १० हजार क्विंटल कापसाची आवक झाली. विक्रीस आलेला कापूस परतीच्या पावसाने भिजलेला असल्याने तो व्यापाऱ्यांना वाळवत टाकावा लागला आहे. यातून जिनिंग सेंटर हाऊसफुल्ल झाले. त्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत कापूस खरेदी थांबविण्यात आली आहे.राळेगाव बाजार समितीच्या हद्दीत सीसीआयचे तीन कापूस संकलन केंद्र शुक्रवारपासून सुरू झाले. सीसीआयला ८ ते १२ टक्के ओलावा असणारा कापूस लागतो. यामुळे शुभारंभाला आलेला कापूस सीसीआयने खरेदीच केला नाही. व्यापाऱ्यांनी ४८०० रूपये क्विंटल दराने कापसाची खरेदी केली. हा कापूस ओलाचिंब आहे.या कापसात २५ ते ४५ टक्क्यांपर्यंत ओलावा आहे. ओलावा असलेल्या कापसाचे जिनिंगच होत नाही. हा कापूस सडतो. त्यातून सुतही निघत नाही. यामुळे खरेदी झालेला कापूस व्यापाऱ्यांनी जिनिंगमध्ये वाळू घातला आहे. यातून जिनमध्ये पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिलेली नाही. हा संपूर्ण कापूस वाळवून नंतर त्याचे जिनिंग होणार आहे. या प्रक्रियेला आठ दिवसाचा कालावधी लागणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत कापूस खरेदी बंद ठेवली आहे. बाजार समितीनेही त्याबाबत घोषणा केली आहे.प्रतीक्षा शासकीय खरेदीचीखुल्या बाजारात कापसाचे दर पडले आहेत. या स्थितीत शासकीय खरेदी केंद्र उघडले तर शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबणार आहे. खेडा खरेदीलाही मोठा हातभार लागणार आहे. यामुळे शेतकरी शासकीय खरेदी केंद्र कधी उघडणार, याची वाट पाहात आहेत.कापूस उत्पादकांची कोंडीजिल्ह्यात सर्वाधिक पेरा कापसाचा आहे. कापसाला चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात केंद्र शासनाने कापसाची आयात केली. यामुळे कापसाचे दर पडले आहेत. या स्थितीत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. यातून कापसाचे दर आणखी घसरले आहे.प्रथमच निर्माण झाली विदारक स्थितीपरतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या स्थितीत ओलाचिंब कापूस बाजारात आला. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अवस्था पाहता या कापसाची खरेदी केली आहे. कापूस खरेदीत प्रथमच अशी विदारक अवस्था पहायला मिळाली. यातून बाजार जिनिंग प्रेसिंगमध्ये कापसाच्या गंज्या न लागता वाळवत ठेवल्याचे दृश्य पहायला मिळत आहे.सरकारच नाही तर केंद्र उघडणार कोण?सध्या राज्यात काळजीवाहू सरकार आहे. अशा सरकारला निर्णय घेताना मर्यादा पडतात. यामुळे शासकीय कापूस संकलन केंद्र उघडणार किंवा नाही, हा खरा प्रश्न आहे. यामुळे कापूस विक्रीकरिता शेतकऱ्यांना सध्या तरी खासगी व्यापाऱ्यांच्याच खरेदीवर अवलंबून राहावे लागणार आहे. हा पेच सोडविण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

टॅग्स :cottonकापूस