शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचा कापूस वाळतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 06:00 IST

या कापसात २५ ते ४५ टक्क्यांपर्यंत ओलावा आहे. ओलावा असलेल्या कापसाचे जिनिंगच होत नाही. हा कापूस सडतो. त्यातून सुतही निघत नाही. यामुळे खरेदी झालेला कापूस व्यापाऱ्यांनी जिनिंगमध्ये वाळू घातला आहे. यातून जिनमध्ये पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिलेली नाही. हा संपूर्ण कापूस वाळवून नंतर त्याचे जिनिंग होणार आहे. या प्रक्रियेला आठ दिवसाचा कालावधी लागणार आहे.

ठळक मुद्दे१० हजार क्विंटल । परतीच्या पावसाने भिजला, राळेगावातील जिनिंग-प्रेसिंग फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील पहिले कापूस खरेदी केंद्र राळेगावात सुरू झाले. येथे शुभारंभालाच १० हजार क्विंटल कापसाची आवक झाली. विक्रीस आलेला कापूस परतीच्या पावसाने भिजलेला असल्याने तो व्यापाऱ्यांना वाळवत टाकावा लागला आहे. यातून जिनिंग सेंटर हाऊसफुल्ल झाले. त्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत कापूस खरेदी थांबविण्यात आली आहे.राळेगाव बाजार समितीच्या हद्दीत सीसीआयचे तीन कापूस संकलन केंद्र शुक्रवारपासून सुरू झाले. सीसीआयला ८ ते १२ टक्के ओलावा असणारा कापूस लागतो. यामुळे शुभारंभाला आलेला कापूस सीसीआयने खरेदीच केला नाही. व्यापाऱ्यांनी ४८०० रूपये क्विंटल दराने कापसाची खरेदी केली. हा कापूस ओलाचिंब आहे.या कापसात २५ ते ४५ टक्क्यांपर्यंत ओलावा आहे. ओलावा असलेल्या कापसाचे जिनिंगच होत नाही. हा कापूस सडतो. त्यातून सुतही निघत नाही. यामुळे खरेदी झालेला कापूस व्यापाऱ्यांनी जिनिंगमध्ये वाळू घातला आहे. यातून जिनमध्ये पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिलेली नाही. हा संपूर्ण कापूस वाळवून नंतर त्याचे जिनिंग होणार आहे. या प्रक्रियेला आठ दिवसाचा कालावधी लागणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत कापूस खरेदी बंद ठेवली आहे. बाजार समितीनेही त्याबाबत घोषणा केली आहे.प्रतीक्षा शासकीय खरेदीचीखुल्या बाजारात कापसाचे दर पडले आहेत. या स्थितीत शासकीय खरेदी केंद्र उघडले तर शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबणार आहे. खेडा खरेदीलाही मोठा हातभार लागणार आहे. यामुळे शेतकरी शासकीय खरेदी केंद्र कधी उघडणार, याची वाट पाहात आहेत.कापूस उत्पादकांची कोंडीजिल्ह्यात सर्वाधिक पेरा कापसाचा आहे. कापसाला चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात केंद्र शासनाने कापसाची आयात केली. यामुळे कापसाचे दर पडले आहेत. या स्थितीत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. यातून कापसाचे दर आणखी घसरले आहे.प्रथमच निर्माण झाली विदारक स्थितीपरतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या स्थितीत ओलाचिंब कापूस बाजारात आला. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अवस्था पाहता या कापसाची खरेदी केली आहे. कापूस खरेदीत प्रथमच अशी विदारक अवस्था पहायला मिळाली. यातून बाजार जिनिंग प्रेसिंगमध्ये कापसाच्या गंज्या न लागता वाळवत ठेवल्याचे दृश्य पहायला मिळत आहे.सरकारच नाही तर केंद्र उघडणार कोण?सध्या राज्यात काळजीवाहू सरकार आहे. अशा सरकारला निर्णय घेताना मर्यादा पडतात. यामुळे शासकीय कापूस संकलन केंद्र उघडणार किंवा नाही, हा खरा प्रश्न आहे. यामुळे कापूस विक्रीकरिता शेतकऱ्यांना सध्या तरी खासगी व्यापाऱ्यांच्याच खरेदीवर अवलंबून राहावे लागणार आहे. हा पेच सोडविण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

टॅग्स :cottonकापूस