शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
8
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
9
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
10
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
11
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
13
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
14
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
15
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
16
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
17
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
18
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
19
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
20
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कापूस खरेदीत व्यापाऱ्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 06:00 IST

शासकीय काम आणि बारा महिने थांब असाच अनुभव तूर आणि सोयाबीन खरेदीत शेतकऱ्यांच्या वाट्याला आला. यामुळे हमीदराने कापूस विक्री करतांना आपल्याला पैसे कधी मिळतील याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शिवाय खरेदी झालेल्या कापसाचे पैसे बँक खात्यात जमा झाले तर हे पैसे बँका कर्जात वळते केले जातील याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या विड्रॉलवर स्वाक्षऱ्या : प्रती क्विंटल २०० ते २५० रूपयांचे कमीशन

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खुल्या बाजाराच्या तुलनेत कापसाचे शासकीय दर क्विंटलमागे ५०० रूपयाने अधिक आहे. हा नफा स्वत:च्या खिशात घालण्यासाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कापूस विकणे सुरू केले आहे. यातून प्रती क्विंटलमागे २०० ते २५० रूपयांचा नफा व्यापारी मिळवित आहेत. यामुळे या योजनेचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच होत आहे.शासकीय काम आणि बारा महिने थांब असाच अनुभव तूर आणि सोयाबीन खरेदीत शेतकऱ्यांच्या वाट्याला आला. यामुळे हमीदराने कापूस विक्री करतांना आपल्याला पैसे कधी मिळतील याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शिवाय खरेदी झालेल्या कापसाचे पैसे बँक खात्यात जमा झाले तर हे पैसे बँका कर्जात वळते केले जातील याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.कापूस घेऊन हमी केंद्रावर आलेल्या शेतकऱ्याला व्यापारी जाळ््यात ओढळतात. त्याला नगदी पैशाचे आमिष देऊन व्यवहार केला जातो. शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवसाचा धनादेश देऊन हमीदरापेक्षा कमी दरात सौदा करतात. शेतकऱ्यांनी हमी केंद्रावर विक्रीकरिता आणलेल्या कापूस विकण्याकरिता स्वत: जवळचा सातबारा देतात.पासबुकही दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांनी विकलेल्या कापसाचे पैसे त्याच खात्यात वळते होतात. शिवाय शेतकऱ्यांचा विड्रॉल कापूस विक्रीपूर्वीच घेतला जातो. यातून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते होताच हे पैसे व्यापाऱ्यांना मिळण्याचा मार्ग सुकर होतो. यातून शेतकऱ्यांना तत्काळ पैसे मिळाल्याचे समाधान होते. तर अशा अडचणीत अडकलेल्या शेतकऱ्यांचा फायदा घेत व्यापारी दररोज शेकडो क्विंटल कापसाची उलाढाल करतात.यातून व्यापारीच श्रीमंत होत आहे. शेतकऱ्यांसाठी हमीभाव योजना राबविली गेली, तो शेतकरी व्यवस्थेचा आणि गैर समजुतीचा बळी ठरतआहे.शेतकऱ्यांनो, व्यापाऱ्यांना सातबारा देऊ नकाकापूस खरेदी करताना व्यापारी गाव खेड्यातून सातबारा गोळा करत आहेत. या सातबारा मालकाकडून विड्रॉलचा ओटीजीएसही शेतमाल विकण्यापूर्वीच तयार करून घेत आहेत. यामुळे बँकेत पैसे जमा होताच ते पैसे व्यापाऱ्यांना वळते करता येतात. यातून व्यापारी मोठा होत आहे. त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना अडीअडचणीला सावकारी म्हणून व्यापारी मदत करणार आहेत. शेतकऱ्यांनी वेळीच जागृत होत ही योजना खऱ्या लाभार्थ्यांना मिळावी. खऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी असे सातबारा देण थांबविण्याची नितांत गरज आहे.शेतकºयांना आठ दिवसात चुकारे मिळण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. खात्यात जमा होणाऱ्या पैशातून कर्जाची रक्कमही वळती होणार नाही. शेतकऱ्यांनी आपले सातबारा व्यापाऱ्यांना देऊ नये. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आहे. व्यापाऱ्यांना मोठे करण्यासाठी नाही.- सुरेश चिंचोळकरपणन संचालक, यवतमाळ

टॅग्स :cottonकापूस