शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

व्यापारी, भाजपचा लाॅकडाऊनला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 05:00 IST

यवतमाळ शहरातील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. दुपारी स्थानिक बसस्थानक चौकातून व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला. तहसील चौक, गांधी चौक, लोखंडी पूल ते पाच कंदील चौकमार्गे जिल्हा कचेरीवर मोर्चा धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी राज्य शासनाविरोधात नारेबाजी केली. त्यानंतर चेंबर ऑफ काॅमर्स अन्ड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देयवतमाळातील रस्त्यांवर उतरुन निदर्शने : चेंबर ऑफ काॅमर्सचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत तब्बल २५ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. अत्यावश्यक सेवेची ३० ते ४० टक्के दुकाने खुली राहत असताना लाॅकडाऊनचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित करीत बुधवारी यवतमाळात व्यापारी रस्त्यावर उतरले. यवतमाळ शहरातील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. दुपारी स्थानिक बसस्थानक चौकातून व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला. तहसील चौक, गांधी चौक, लोखंडी पूल ते पाच कंदील चौकमार्गे जिल्हा कचेरीवर मोर्चा धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी राज्य शासनाविरोधात नारेबाजी केली. त्यानंतर चेंबर ऑफ काॅमर्स अन्ड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान बुधवारी भाजपच्या आमदारांनीही लाॅकडाऊनला तीव्र विरोध करीत सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. एकीकडे व्यापारपेठ बंद तर दुसरीकडे ई-काॅमर्स सुविधा सुरू ठेवून सरकार व्यापाऱ्यांना आणखी अडचणीत आणत असल्याचा आरोप करण्यात आला. जमावबंदी आदेश असला तरी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत नागरिकांचा शहरात मुक्त संचार राहतो. मग व्यापाऱ्यांवरच अन्याय का असा प्रश्न विचारण्यात आला आहे.  व्यापाऱ्यांनी लाॅकडाऊनचा निर्णय मागे घेण्यासाठी सरकार व प्रशासनाला तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला असून त्यानंतर कुटुंबासह रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.  आंदोलनात मंडप, कॅटरिंग असोसिएशन, नेताजी चौक कापड व्यापारी, इंदिरा गांधी मार्केट व्यापारी, हॉटेल व्यावसायिक असोसिएशन, बुक डेपो असोसिएशनसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान, मोर्चा काढून जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.  

कुणाचे भाडे तर कुणाचे वीज बिल झाले थकीत  जिल्ह्यात छोट्या आणि मोठ्या व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. या दुकानावर काम करणाऱ्या  कामगारांची संख्या मोठी आहे. पुढील २५ दिवस व्यापार बंद राहिल्यास कामगार आणि दुकानदारांवर उपासमार ओढवणार आहे.  पाहिजे तर दुकानाच्या वेळा कमी कराव्यात.  गतवर्षीच्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांची आर्थिक स्थिती आधीच बिघडली आहे. अनेकांना दुकानाचे भाडेही देता आले नाही. तर, काहींचे विजेचे बिल थकलेले आहे. आता पुन्हा दुकाने बंद केल्याने  जगायचे कसे, असा प्रश्न व्यावसायिक आणि कामगारांनी उपस्थित केला. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या