शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

व्यापारी, भाजपचा लाॅकडाऊनला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 05:00 IST

यवतमाळ शहरातील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. दुपारी स्थानिक बसस्थानक चौकातून व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला. तहसील चौक, गांधी चौक, लोखंडी पूल ते पाच कंदील चौकमार्गे जिल्हा कचेरीवर मोर्चा धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी राज्य शासनाविरोधात नारेबाजी केली. त्यानंतर चेंबर ऑफ काॅमर्स अन्ड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देयवतमाळातील रस्त्यांवर उतरुन निदर्शने : चेंबर ऑफ काॅमर्सचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत तब्बल २५ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. अत्यावश्यक सेवेची ३० ते ४० टक्के दुकाने खुली राहत असताना लाॅकडाऊनचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित करीत बुधवारी यवतमाळात व्यापारी रस्त्यावर उतरले. यवतमाळ शहरातील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. दुपारी स्थानिक बसस्थानक चौकातून व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला. तहसील चौक, गांधी चौक, लोखंडी पूल ते पाच कंदील चौकमार्गे जिल्हा कचेरीवर मोर्चा धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी राज्य शासनाविरोधात नारेबाजी केली. त्यानंतर चेंबर ऑफ काॅमर्स अन्ड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान बुधवारी भाजपच्या आमदारांनीही लाॅकडाऊनला तीव्र विरोध करीत सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. एकीकडे व्यापारपेठ बंद तर दुसरीकडे ई-काॅमर्स सुविधा सुरू ठेवून सरकार व्यापाऱ्यांना आणखी अडचणीत आणत असल्याचा आरोप करण्यात आला. जमावबंदी आदेश असला तरी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत नागरिकांचा शहरात मुक्त संचार राहतो. मग व्यापाऱ्यांवरच अन्याय का असा प्रश्न विचारण्यात आला आहे.  व्यापाऱ्यांनी लाॅकडाऊनचा निर्णय मागे घेण्यासाठी सरकार व प्रशासनाला तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला असून त्यानंतर कुटुंबासह रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.  आंदोलनात मंडप, कॅटरिंग असोसिएशन, नेताजी चौक कापड व्यापारी, इंदिरा गांधी मार्केट व्यापारी, हॉटेल व्यावसायिक असोसिएशन, बुक डेपो असोसिएशनसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान, मोर्चा काढून जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.  

कुणाचे भाडे तर कुणाचे वीज बिल झाले थकीत  जिल्ह्यात छोट्या आणि मोठ्या व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. या दुकानावर काम करणाऱ्या  कामगारांची संख्या मोठी आहे. पुढील २५ दिवस व्यापार बंद राहिल्यास कामगार आणि दुकानदारांवर उपासमार ओढवणार आहे.  पाहिजे तर दुकानाच्या वेळा कमी कराव्यात.  गतवर्षीच्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांची आर्थिक स्थिती आधीच बिघडली आहे. अनेकांना दुकानाचे भाडेही देता आले नाही. तर, काहींचे विजेचे बिल थकलेले आहे. आता पुन्हा दुकाने बंद केल्याने  जगायचे कसे, असा प्रश्न व्यावसायिक आणि कामगारांनी उपस्थित केला. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या