शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

पुसद शहरात वाहतुकीचे वाजले तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 22:22 IST

नियमाच्या नावाखाली शहरातील दुचाकीस्वारांवर वाहतूक शाखा नित्यनेमाने कारवाईची मोहीम राबवित आहे. नो-एन्ट्री, सिग्नल तोडणे, परवाना नसणे, वाहनाची कागदपत्रे आदींची कसून तपासणी केली जाते.

ठळक मुद्देहातगाड्यांचा अडथळा : नगरपालिका प्रशासनासह वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : नियमाच्या नावाखाली शहरातील दुचाकीस्वारांवर वाहतूक शाखा नित्यनेमाने कारवाईची मोहीम राबवित आहे. नो-एन्ट्री, सिग्नल तोडणे, परवाना नसणे, वाहनाची कागदपत्रे आदींची कसून तपासणी केली जाते. मात्र हेच पोलीस शहरातील गर्दीच्या ठिकाणावरून जाणाऱ्या अवडज वाहनांवर का दुर्लक्ष करतात असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक शाखा आणि नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळेच शहरातील वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहे.पुसद शहरातील बाजारपेठेत महात्मा फुले चौक ते शिवाजी चौक, सुभाष चौक ते शिवाजी चौक, गांधी चौक ते सुभाष चौक, नाईक चौक ते महात्मा फुले चौक, कार्ला मार्ग, वाशिम मार्ग या परिसरातील रस्त्यांसह शहरातील अनेक ठिकाणी हातगाडीवाल्यांनी आपली दुकाने भर रस्त्यातच लावली आहे. नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमणाचा विषय अनेकदा हाताळला पण त्याला सकारात्मक प्रतिसाद अल्पसाच मिळाला.दुसरीकडे पोलीस प्रशासन दुचाकी स्वारांवर कठोर कारवाई नेहमीच करते. दुचाकीस्वार हे त्यांचे ‘टार्गेट’ असते. चारचाकीस्वार नियमाचे उल्लंघन करून जात असले तरी त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात नाही. सिग्नल तोडला तरी चारचाकी स्वारावर कारवाई होत नाही. परंतु दुचाकीस्वाराने चूक केल्यास तो फार मोठा अपराध वाहतूक शाखेचे पोलीस मानतात आणि तातडीने पकडून कारवाई करतात. पुसद शहरात मुख्य बाजारपेठेत कोणत्याही रस्त्यावर नजर टाकली तर हातगाडीवाले भर रस्त्यात उभे दिसतात. नगरपालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांशी त्यांचे अर्थपूर्ण व्यवहार आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे दुकानदारी बेधडक सुरु आहे. अनेक भागातील रस्ते अरुंद असल्याने वाहतूकीची कोंडी हा कायमचा प्रश्न बनला आहे. परंतु अरुंद रस्त्यांवर व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहे.प्रशासनावर संशयगर्दीच्या वेळी शिवाजी चौक, तीन पुतळे चौक, बसस्थानका समोरील मार्ग, गांधी चौक, कापड लाईन, नाईक चौक या भागातमध्ये वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचा श्वास गुदमरतो. काही चौकात वाहतूक कर्मचारी दिसत असले तरी ते निव्वळ दुचाकी स्वारांवर ‘डोळा’ ठेवतात. पण अडथळा आणणारे चारचाकी चालक, हातगाडीवाले, छोटे दुकानदार यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. या संपूर्ण प्रकारामुळे वाहतूक शाखा आणि नगरपालिका प्रशासनाबाबत संशय निर्माण झाला आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी