शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

मरणानंतरही यातना कायमच, उघड्यावरच अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:46 IST

दिग्रस : मृत्यूनंतर परंपरागत पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, काही ठिकाणी दाहसंस्कार करण्यासाठी सुविधा नाही. त्यामुळे मरणानंतरही यातना कायमच ...

दिग्रस : मृत्यूनंतर परंपरागत पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, काही ठिकाणी दाहसंस्कार करण्यासाठी सुविधा नाही. त्यामुळे मरणानंतरही यातना कायमच राहतात. असाच अनुभव तालुक्यातील आरंभी येथे येत आहे.

तालुक्यात आरंभी हे गाव सर्वांत मोठे म्हणून ओळखले जाते. मात्र, गावात गेल्या अनेक वर्षांपासून उघड्यावरच नागरिकांना अंत्यसंस्कार करावे लागतात. ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासन आणखी किती काळ अंत पाहणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करताना दिसत आहेत. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. ‘मरणाने केली सुटका, जगण्याने मजला छळले होते’, असे गजलकार सुरेश भट हे सांगून गेले आहेत. मात्र, मरणाने सुटका केली तरीही गावकऱ्यांसाठी हा अभिशाप ठरताना दिसत आहे.

पावसाळा आणि उन्हाळ्यात ही समस्या तीव्र रूप धारण करते. गावाच्या उत्तर आणि दक्षिण भागात वनविभागाच्या जागेवर ग्रामस्थ अंत्यसंस्कार पार पाडतात. हक्काची आणि शेडयुक्त स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात चिखल तुडवीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात. प्रसंगी मृतदेह पाऊस थांबेपर्यंत घरात ठेवावे लागतात.

उन्हाळ्यातदेखील चटके खात उभे राहून अंत्यसंस्कार करावे लागतात. गावात सुरक्षित आणि हक्काची स्मशानभूमी नाही, ही शोकांतिका आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणे, मृतांच्या नातेवाइकांसाठी खूप त्रासदायक ठरते.

बॉक्स

लहान गावांत सुविधा उपलब्ध

आरंभीनजीक असलेल्या चिरकुटा, फुलवाडी, वडगाव, झिरपूरवाडी या छोट्या गावात शेडयुक्त स्मशानभूमीची सोय आहे. मात्र, लोकसंख्येने मोठे असलेल्या आरंभी येथे सुविधा उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने त्वरित स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावून मृतदेहाची होणारी विटंबना थांबवावी, अशी अपेक्षा आहे.