शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मरणानंतरही यातना कायमच, उघड्यावरच अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:46 IST

दिग्रस : मृत्यूनंतर परंपरागत पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, काही ठिकाणी दाहसंस्कार करण्यासाठी सुविधा नाही. त्यामुळे मरणानंतरही यातना कायमच ...

दिग्रस : मृत्यूनंतर परंपरागत पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, काही ठिकाणी दाहसंस्कार करण्यासाठी सुविधा नाही. त्यामुळे मरणानंतरही यातना कायमच राहतात. असाच अनुभव तालुक्यातील आरंभी येथे येत आहे.

तालुक्यात आरंभी हे गाव सर्वांत मोठे म्हणून ओळखले जाते. मात्र, गावात गेल्या अनेक वर्षांपासून उघड्यावरच नागरिकांना अंत्यसंस्कार करावे लागतात. ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासन आणखी किती काळ अंत पाहणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करताना दिसत आहेत. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. ‘मरणाने केली सुटका, जगण्याने मजला छळले होते’, असे गजलकार सुरेश भट हे सांगून गेले आहेत. मात्र, मरणाने सुटका केली तरीही गावकऱ्यांसाठी हा अभिशाप ठरताना दिसत आहे.

पावसाळा आणि उन्हाळ्यात ही समस्या तीव्र रूप धारण करते. गावाच्या उत्तर आणि दक्षिण भागात वनविभागाच्या जागेवर ग्रामस्थ अंत्यसंस्कार पार पाडतात. हक्काची आणि शेडयुक्त स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात चिखल तुडवीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात. प्रसंगी मृतदेह पाऊस थांबेपर्यंत घरात ठेवावे लागतात.

उन्हाळ्यातदेखील चटके खात उभे राहून अंत्यसंस्कार करावे लागतात. गावात सुरक्षित आणि हक्काची स्मशानभूमी नाही, ही शोकांतिका आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणे, मृतांच्या नातेवाइकांसाठी खूप त्रासदायक ठरते.

बॉक्स

लहान गावांत सुविधा उपलब्ध

आरंभीनजीक असलेल्या चिरकुटा, फुलवाडी, वडगाव, झिरपूरवाडी या छोट्या गावात शेडयुक्त स्मशानभूमीची सोय आहे. मात्र, लोकसंख्येने मोठे असलेल्या आरंभी येथे सुविधा उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने त्वरित स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावून मृतदेहाची होणारी विटंबना थांबवावी, अशी अपेक्षा आहे.