शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

मरणानंतरही यातना कायमच, उघड्यावरच अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:46 IST

दिग्रस : मृत्यूनंतर परंपरागत पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, काही ठिकाणी दाहसंस्कार करण्यासाठी सुविधा नाही. त्यामुळे मरणानंतरही यातना कायमच ...

दिग्रस : मृत्यूनंतर परंपरागत पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, काही ठिकाणी दाहसंस्कार करण्यासाठी सुविधा नाही. त्यामुळे मरणानंतरही यातना कायमच राहतात. असाच अनुभव तालुक्यातील आरंभी येथे येत आहे.

तालुक्यात आरंभी हे गाव सर्वांत मोठे म्हणून ओळखले जाते. मात्र, गावात गेल्या अनेक वर्षांपासून उघड्यावरच नागरिकांना अंत्यसंस्कार करावे लागतात. ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासन आणखी किती काळ अंत पाहणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करताना दिसत आहेत. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. ‘मरणाने केली सुटका, जगण्याने मजला छळले होते’, असे गजलकार सुरेश भट हे सांगून गेले आहेत. मात्र, मरणाने सुटका केली तरीही गावकऱ्यांसाठी हा अभिशाप ठरताना दिसत आहे.

पावसाळा आणि उन्हाळ्यात ही समस्या तीव्र रूप धारण करते. गावाच्या उत्तर आणि दक्षिण भागात वनविभागाच्या जागेवर ग्रामस्थ अंत्यसंस्कार पार पाडतात. हक्काची आणि शेडयुक्त स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात चिखल तुडवीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात. प्रसंगी मृतदेह पाऊस थांबेपर्यंत घरात ठेवावे लागतात.

उन्हाळ्यातदेखील चटके खात उभे राहून अंत्यसंस्कार करावे लागतात. गावात सुरक्षित आणि हक्काची स्मशानभूमी नाही, ही शोकांतिका आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणे, मृतांच्या नातेवाइकांसाठी खूप त्रासदायक ठरते.

बॉक्स

लहान गावांत सुविधा उपलब्ध

आरंभीनजीक असलेल्या चिरकुटा, फुलवाडी, वडगाव, झिरपूरवाडी या छोट्या गावात शेडयुक्त स्मशानभूमीची सोय आहे. मात्र, लोकसंख्येने मोठे असलेल्या आरंभी येथे सुविधा उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने त्वरित स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावून मृतदेहाची होणारी विटंबना थांबवावी, अशी अपेक्षा आहे.