शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

पांढरकवडा हद्दवाढ त्रासदायक

By admin | Updated: March 11, 2017 01:05 IST

मोठा गाजावाजा करुन येथील नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ठ झालेल्या वसाहतींची दुर्दशा अद्यापही संपली नाही.

नगर परिषदेचे दुर्लक्ष : समस्यांमध्ये पडली भर, नागरिक हैराण पांढरकवडा : मोठा गाजावाजा करुन येथील नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ठ झालेल्या वसाहतींची दुर्दशा अद्यापही संपली नाही. हद्दवाढ झाल्यानंतर या वसाहतींची दुर्दशा संपेल, या वसाहतींना ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा होती. परंतु अद्यापही या वसाहतीला पाहिजे त्या प्रमाणात सुविधाच पुरविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. गेल्या अडीच वर्षांपूर्वी शहराला लागून असलेल्या मंगलमूर्ती ले-आऊट, बेतवार ले-आऊट, पटेल ले-आऊट, श्यामनगरी-२, पोसवाल ले-आऊट, आशियाना ले-आऊट, राधेयनगरी, जंगूबाई टेकडी परिसर, रामकृष्णनगर, चिंतामणी ले-आऊट आदि परिसर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.१ व प्रभाग क्र.२ मध्ये समाविष्ठ करण्यात आला. हा भाग नगरपरिषदेच्या क्षेत्रात आल्यामुळे मतदारांची संख्याही वाढली. त्यामुळे नगरपरिषदेचे दोन नविन सदस्य निवडून देण्यासाठी एप्रिल २०१५ मध्ये निवडणूकसुद्धा झाली. या निवडणुकीत नगरपरिषदेतील सत्तारुढ कॉग्रेसचे मंजुषा तिरपुडे व विशाल सिडाम हे दोन सदस्य निवडून आलेत. या दोन जागांसाठी निवडणूक होऊन दोन वर्षे होत आहेत. तरी नगर परिषद हद्दीत समाविष्ठ झालेल्या या भागाचा विकास अद्यापही झाला नाही. अनेक वसाहतीत अद्यापही पथदिवे लावण्यात आलेले नाहीत.रस्त्याची कामे झाली नाहीत. या सर्व परिसरातील नाल्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत. या नाल्यांची नियमित साफ सफाई केल्या जात नाही. नगर परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष शंकर बडे यांनी मंत्रालयात सतत पाठपुरावा करुन पांढरकवडा नगर परिषदेची हद्दवाढ करुन घेतली होती. त्यांनी यासाठी महाराष्ट्र राज्याचे तत्कालिन मंत्री शिवाजीराव मोघे यांची मदत घेतली. नगर विकास मंत्रालयाकडे सतत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन शासनाने पांढरकवडा नगरपरिषदेला हद्दवाढीची परवानगी दिली. रितसर हा भाग नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ठ करण्यात आला. वाढीव क्षेत्रासाठी दोन सदस्य संख्याही वाढली. १७ सदस्यांची असलेली पांढरकवडा नगरपरिषद १९ सदस्यांची झाली. त्यानंतर शंकर बडे यांचा अडीच वर्षांचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला. नगराध्यक्ष पद हे पुढील अडीच वर्षांसाठी महिला सदस्यासाठी राखीव असल्यामुळे ३० जून २०१५ रोजी वंदना रॉय या नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्यात. या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेले.नगर परिषदेला पुर्ण वेळ अभियंताच नव्हता. कोणाचा पायपोस कोणाला नाही,अशी या नगर परिषदेची स्थिती झाली. विकासाची कामे खोळंबली. या वसाहतींचा विकास न झाल्याने तीव्र असंतोष पसरला आहे. (तालुका प्रतिनिधी) घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात विशेष म्हणजे या वसाहतीतील नागरिकांकडून नगर परिषदेने लाखो रुपयांचा कर देखील वसूल केला आहे.परंतु या ठिकाणी साधी पाणी पुरवठ्याची सोय सुध्दा करण्यात आलेली नाही.पाणी पुरवठा करण्यासाठी पाईप लाईनच टाकण्यात आलेली नाही.काही भागात पाईप लाईन टाकण्यात आली परंतु ती पाईप लाईन तशीच पडून असल्यामुळे हे काम अर्धवट अवस्थेत आहे.या प्रभागामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.मात्र याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.