शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

पांढरकवडा हद्दवाढ त्रासदायक

By admin | Updated: March 11, 2017 01:05 IST

मोठा गाजावाजा करुन येथील नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ठ झालेल्या वसाहतींची दुर्दशा अद्यापही संपली नाही.

नगर परिषदेचे दुर्लक्ष : समस्यांमध्ये पडली भर, नागरिक हैराण पांढरकवडा : मोठा गाजावाजा करुन येथील नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ठ झालेल्या वसाहतींची दुर्दशा अद्यापही संपली नाही. हद्दवाढ झाल्यानंतर या वसाहतींची दुर्दशा संपेल, या वसाहतींना ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा होती. परंतु अद्यापही या वसाहतीला पाहिजे त्या प्रमाणात सुविधाच पुरविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. गेल्या अडीच वर्षांपूर्वी शहराला लागून असलेल्या मंगलमूर्ती ले-आऊट, बेतवार ले-आऊट, पटेल ले-आऊट, श्यामनगरी-२, पोसवाल ले-आऊट, आशियाना ले-आऊट, राधेयनगरी, जंगूबाई टेकडी परिसर, रामकृष्णनगर, चिंतामणी ले-आऊट आदि परिसर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.१ व प्रभाग क्र.२ मध्ये समाविष्ठ करण्यात आला. हा भाग नगरपरिषदेच्या क्षेत्रात आल्यामुळे मतदारांची संख्याही वाढली. त्यामुळे नगरपरिषदेचे दोन नविन सदस्य निवडून देण्यासाठी एप्रिल २०१५ मध्ये निवडणूकसुद्धा झाली. या निवडणुकीत नगरपरिषदेतील सत्तारुढ कॉग्रेसचे मंजुषा तिरपुडे व विशाल सिडाम हे दोन सदस्य निवडून आलेत. या दोन जागांसाठी निवडणूक होऊन दोन वर्षे होत आहेत. तरी नगर परिषद हद्दीत समाविष्ठ झालेल्या या भागाचा विकास अद्यापही झाला नाही. अनेक वसाहतीत अद्यापही पथदिवे लावण्यात आलेले नाहीत.रस्त्याची कामे झाली नाहीत. या सर्व परिसरातील नाल्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत. या नाल्यांची नियमित साफ सफाई केल्या जात नाही. नगर परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष शंकर बडे यांनी मंत्रालयात सतत पाठपुरावा करुन पांढरकवडा नगर परिषदेची हद्दवाढ करुन घेतली होती. त्यांनी यासाठी महाराष्ट्र राज्याचे तत्कालिन मंत्री शिवाजीराव मोघे यांची मदत घेतली. नगर विकास मंत्रालयाकडे सतत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन शासनाने पांढरकवडा नगरपरिषदेला हद्दवाढीची परवानगी दिली. रितसर हा भाग नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ठ करण्यात आला. वाढीव क्षेत्रासाठी दोन सदस्य संख्याही वाढली. १७ सदस्यांची असलेली पांढरकवडा नगरपरिषद १९ सदस्यांची झाली. त्यानंतर शंकर बडे यांचा अडीच वर्षांचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला. नगराध्यक्ष पद हे पुढील अडीच वर्षांसाठी महिला सदस्यासाठी राखीव असल्यामुळे ३० जून २०१५ रोजी वंदना रॉय या नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्यात. या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेले.नगर परिषदेला पुर्ण वेळ अभियंताच नव्हता. कोणाचा पायपोस कोणाला नाही,अशी या नगर परिषदेची स्थिती झाली. विकासाची कामे खोळंबली. या वसाहतींचा विकास न झाल्याने तीव्र असंतोष पसरला आहे. (तालुका प्रतिनिधी) घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात विशेष म्हणजे या वसाहतीतील नागरिकांकडून नगर परिषदेने लाखो रुपयांचा कर देखील वसूल केला आहे.परंतु या ठिकाणी साधी पाणी पुरवठ्याची सोय सुध्दा करण्यात आलेली नाही.पाणी पुरवठा करण्यासाठी पाईप लाईनच टाकण्यात आलेली नाही.काही भागात पाईप लाईन टाकण्यात आली परंतु ती पाईप लाईन तशीच पडून असल्यामुळे हे काम अर्धवट अवस्थेत आहे.या प्रभागामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.मात्र याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.