शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

पांढरकवडा हद्दवाढ त्रासदायक

By admin | Updated: March 11, 2017 01:05 IST

मोठा गाजावाजा करुन येथील नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ठ झालेल्या वसाहतींची दुर्दशा अद्यापही संपली नाही.

नगर परिषदेचे दुर्लक्ष : समस्यांमध्ये पडली भर, नागरिक हैराण पांढरकवडा : मोठा गाजावाजा करुन येथील नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ठ झालेल्या वसाहतींची दुर्दशा अद्यापही संपली नाही. हद्दवाढ झाल्यानंतर या वसाहतींची दुर्दशा संपेल, या वसाहतींना ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा होती. परंतु अद्यापही या वसाहतीला पाहिजे त्या प्रमाणात सुविधाच पुरविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. गेल्या अडीच वर्षांपूर्वी शहराला लागून असलेल्या मंगलमूर्ती ले-आऊट, बेतवार ले-आऊट, पटेल ले-आऊट, श्यामनगरी-२, पोसवाल ले-आऊट, आशियाना ले-आऊट, राधेयनगरी, जंगूबाई टेकडी परिसर, रामकृष्णनगर, चिंतामणी ले-आऊट आदि परिसर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.१ व प्रभाग क्र.२ मध्ये समाविष्ठ करण्यात आला. हा भाग नगरपरिषदेच्या क्षेत्रात आल्यामुळे मतदारांची संख्याही वाढली. त्यामुळे नगरपरिषदेचे दोन नविन सदस्य निवडून देण्यासाठी एप्रिल २०१५ मध्ये निवडणूकसुद्धा झाली. या निवडणुकीत नगरपरिषदेतील सत्तारुढ कॉग्रेसचे मंजुषा तिरपुडे व विशाल सिडाम हे दोन सदस्य निवडून आलेत. या दोन जागांसाठी निवडणूक होऊन दोन वर्षे होत आहेत. तरी नगर परिषद हद्दीत समाविष्ठ झालेल्या या भागाचा विकास अद्यापही झाला नाही. अनेक वसाहतीत अद्यापही पथदिवे लावण्यात आलेले नाहीत.रस्त्याची कामे झाली नाहीत. या सर्व परिसरातील नाल्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत. या नाल्यांची नियमित साफ सफाई केल्या जात नाही. नगर परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष शंकर बडे यांनी मंत्रालयात सतत पाठपुरावा करुन पांढरकवडा नगर परिषदेची हद्दवाढ करुन घेतली होती. त्यांनी यासाठी महाराष्ट्र राज्याचे तत्कालिन मंत्री शिवाजीराव मोघे यांची मदत घेतली. नगर विकास मंत्रालयाकडे सतत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन शासनाने पांढरकवडा नगरपरिषदेला हद्दवाढीची परवानगी दिली. रितसर हा भाग नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ठ करण्यात आला. वाढीव क्षेत्रासाठी दोन सदस्य संख्याही वाढली. १७ सदस्यांची असलेली पांढरकवडा नगरपरिषद १९ सदस्यांची झाली. त्यानंतर शंकर बडे यांचा अडीच वर्षांचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला. नगराध्यक्ष पद हे पुढील अडीच वर्षांसाठी महिला सदस्यासाठी राखीव असल्यामुळे ३० जून २०१५ रोजी वंदना रॉय या नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्यात. या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेले.नगर परिषदेला पुर्ण वेळ अभियंताच नव्हता. कोणाचा पायपोस कोणाला नाही,अशी या नगर परिषदेची स्थिती झाली. विकासाची कामे खोळंबली. या वसाहतींचा विकास न झाल्याने तीव्र असंतोष पसरला आहे. (तालुका प्रतिनिधी) घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात विशेष म्हणजे या वसाहतीतील नागरिकांकडून नगर परिषदेने लाखो रुपयांचा कर देखील वसूल केला आहे.परंतु या ठिकाणी साधी पाणी पुरवठ्याची सोय सुध्दा करण्यात आलेली नाही.पाणी पुरवठा करण्यासाठी पाईप लाईनच टाकण्यात आलेली नाही.काही भागात पाईप लाईन टाकण्यात आली परंतु ती पाईप लाईन तशीच पडून असल्यामुळे हे काम अर्धवट अवस्थेत आहे.या प्रभागामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.मात्र याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.