शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

जात निर्मूलनाची आजही गरज

By admin | Updated: April 11, 2017 00:09 IST

भारातील महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे की, येथे दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि ब्राह्मण जातीतूनसुद्धा अस्पृश्यता निर्मूलनाची ...

सुखदेव थोरात : समता पर्वाचे थाटात उद्घाटन, मागास समाजापुढील आव्हानांवर व्याख्यानयवतमाळ : भारातील महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे की, येथे दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि ब्राह्मण जातीतूनसुद्धा अस्पृश्यता निर्मूलनाची आणि जातीनिर्मूलनाची मोहीम चालविणारे महापुरूष निर्माण झाले आहेत. १९५० नंतर मात्र ही परंपरा खंडीत झालेली दिसते. भारतीय संविधानानुसार अस्पृश्यता आणि जात निर्मूलन होईल या भ्रमात आम्ही राहिलो. परंतु, आजवरचा अनुभव लक्षात घेता जातीच्या भिंती अधिक मजबूत होत असल्याचे दिसते. म्हणूनच आजही जाती निर्मूलन आवश्यक आहे, असे मत पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी समता पर्वात उद्घाटक या नात्याने व्यक्त केले. अध्यक्षस्थानी डॉ. हर्षदीप कांबळे होते. ‘बदलत्या परिवेषात मागास समाजापुढील आव्हाने आणि उपाय’ या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले, आजही महाराष्ट्रात आणि विशेषत: विदर्भात दलित, आदिवासी आणि ओबीसींपुढे अनेक समस्या आहेत. एकीकडे राज्य प्रगतीपथावर असताना गरिबी कमी झाली नाही. आकडेवारीचे दाखले देऊन त्यांनी सांगितले की विदर्भात १७ टक्के लोक गरीब असून, त्यात ५४ टक्के आदिवासी, २१ टक्के दलित, १४ टक्के ओबीसी, ९ टक्के उच्चवर्णीय आणि १९ टक्के मुस्लिमांचा समावेश आहे. गरिबीबरोबरच शिक्षणातही खूप तफावत आहे. दरडोई उत्पन्नाची आकडेवारी पाहिली तर दलितांचे उत्पन्न कमी आहे. दोन वेळचे जेवण न मिळणारा फार मोठा वर्ग या देशात आहे, ही आपल्यासाठी भूषणावह बाब नाही. नागरी अधिकारांच्या बाबतीतसुद्धा असे दिसते की, सार्वजनिक सेवा आजही सर्वांना उपलब्ध नाहीत. बहिष्काराच्या तंत्राने आजही दलितांची कोंडी केली जाते. अन्यायाची ही प्रक्रिया सातत्याने चालत आहे. दलितांना उत्पन्नाची साधने कमी आहेत. हातमजुरी करणारे दलित ५० टक्के, एसटी ४२ टक्के, ओबीसी २९ टक्के तर उच्चवर्णीय २५ टक्के आहेत. आरक्षणामुळे दलितांची प्रगती झाली आहे. खासगीकरणाने त्याला खिळ बसणार आहे. म्हणूनच शिक्षण आणि खासगी क्षेत्रात आरक्षण असणे महत्वाचे आहे. यावर उपाय सांगताना ते म्हणाले, दलितांनी जमिनीचे मालक व्हावे. याशिवाय उद्योगधंदे निर्माण करून भांडवलासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घेतला पाहिेजे. लहान-सहान गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा अनेक मोठ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. सर्वांनी शिक्षण घ्यावे, संघटितपणे कार्य करावे, असे आवाहन शेवटी त्यांनी केले. अध्यक्ष डॉ. कांबळे यांनी १२ वर्षापूर्वी सुरू केलेला हा उपक्रम अधिक नेटाने आणि जोमाने सुरू ठेवण्यासाठी तरुणपिढीकडे हा वारसा सोपविण्याची विनंती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अंकुश वाकडे यांनी केले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)