शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

आजचा विदर्भाचा लढा शेवटचा असेल

By admin | Updated: April 24, 2016 02:35 IST

स्वतंत्र विदर्भाचा लढा यापूर्वी दोन वेळा असफल झाला. आताचा लढा तिसरा आणि अंतिम असेल.

श्रीहरी अणे : यवतमाळ येथे जाहीर व्याख्यानयवतमाळ : स्वतंत्र विदर्भाचा लढा यापूर्वी दोन वेळा असफल झाला. आताचा लढा तिसरा आणि अंतिम असेल. येत्या तीन वर्षात विदर्भ वेगळा झाला नाही, तर पुढील २५ वर्षातही होणार नाही. केंद्रात भाजपाचे बहुमत असेपर्यंतच वेगळा विदर्भ होणे आवश्यक आहे. १ जानेवारी २०१७ पर्यंत याबाबत ठोस निर्णय झाला नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल, असे प्रतिपादन माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले. येथील लोकनायक बापूजी अणे विद्यालयात त्यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी माजी खासदार जांबुवंतराव धोटे होते. श्रीहरी अणे पुढे म्हणाले, विदर्भाबाबत हेतुपुरस्सर चार गैरसमज पसरविले जातात. विदर्भाची मागणी ही जनतेची नाही, विदर्भाचे नेते कमजोर आहेत, वेगळा विदर्भ आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही आणि मराठी माणूस संपून हिंदी भाषिकांचे वर्चस्व निर्माण होईल. खरे म्हणजे जनमत नाही, हे धादांत खोटे आहे. विदर्भ सी.पी. अ‍ॅन्ड बेरार असेंब्लीत असतानाच वेगळ्या विदर्भाचा ठराव १९३८ मध्ये झाला आहे. मुंबई राज्यात विदर्भ सामील करतानाच नागपूर आणि अकोला येथे करार झाले आहेत ते विदर्भाचे वेगळेपण जोपासणारे करार होते. मुंबई राज्य निर्मितीच्या वेळीच पंडित नेहरुंनी वेगळ्या विदर्भाचा पुरस्कार केलेला आहे. नागपूर आणि मद्रास येथील काँग्रेसच्या अधिवेशनातही ठराव झाले आहेत. फाजलअली कमिशनने १९५६ ला वेगळा विदर्भ व्हावा, असे म्हटले आहे. लोकनायक बापूजी अणे यांची कैफियत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही एका भाषेची अनेक राज्ये होऊ शकतात असे म्हटले आहे. मुंबई राज्यातून गुजरात वेगळा झाला तेव्हाच विदर्भातील ११७ आमदारांनी वेगळ्या विदर्भासाठी राजीनामे देण्याची तयारी दाखविली होती. परंतु यशवंतराव चव्हाणांनी विकासाची ग्वाही देऊन विदर्भाला वेगळे होऊ दिले नाही. जनमत नाही असे शासनाला वाटत असले तर जनमताचा कौल घ्यावा. त्यामध्ये ५१ टक्के लोकांनी मागणी केली नाही तर आम्ही विदर्भाची मागणी सोडून देऊ. एखाद्या राज्याची निर्मिती हा केंद्र शासनाचा विषय आहे. त्यासाठी महाराष्ट्रात ठराव पारित करण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानाहून जांबुवंतराव धोटे म्हणाले, आज मूल्यहिन राजकारणाचा कळस झाला आहे. मूल्ये हरविलेल्यांची पिलावळ पश्चिम महाराष्ट्रात वाढली आहे. खरे बोलणाऱ्या माणसाला आज गुन्हेगार ठरविले जात आहे. विदर्भाचे राज्य हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. अ‍ॅड. विजयाताई धोटे यांचेही मनोगत झाले. विदर्भ हा जिजामाता, रुक्मिणी, राष्ट्रसंत, गाडगे महाराजांचा असून यवतमाळ हे विदर्भाच्या संघर्षाचे केंद्र आहे. प्रास्ताविक माजी आमदार दिवाकर पांडे यांनी केले. विचारपीठावर अ‍ॅड. रवी संन्याल, चंद्रकांत रानडे, वासुदेव विधाते, अ‍ॅड. उदय पांडे, नीरज खांदेवाले, मोहन जोशी आदी उपस्थित होते. संचालन श्याम मंचलवार, आभार अ‍ॅड. विजय बोरखडे यांनी मानले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)महाराष्ट्रदिनी विदर्भ झेंडा१ मे महाराष्ट्र निर्मितीचा दिवस आमच्यासाठी काळा दिवस ठरला आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण विदर्भात विदर्भ झेंड्याचे ध्वजारोहण केले जाणार आहे. भाजपाने निवडणूक जाहीरनाम्यातील वेगळ्या विदर्भाचे वचन पूर्ण केले नाही. त्यामुळे याचदिवशी निवडणूक जाहीरनाम्याची होळी करणार असल्याचे ते म्हणाले. ज्या जिल्ह्याने लोकनायक बाबूजी अणे दिले, विदर्भवीर जांबुवंतराव दिले त्याच जिल्ह्याने आम्हाला वेगळा विदर्भ मिळवून दिला पाहिजे, असे भावनिक आवाहन अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी यावेळी केले.