शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

‘तंबाखूमुक्त शाळा’ घोषणेचा उडाला फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 21:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुका हा तंबाखूमुक्त शाळांचा तालुका म्हणून घोषित केला असला तरी या घोषणेचा पार फज्जा उडाला आहे.तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, शासनाने शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविला. २०१५ पासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे व सलाम बाँम्बे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त शाळा अभियान ...

ठळक मुद्देशिक्षकच खर्ऱ्याच्या अधीन : पांढरकवडा तालुक्यातील १३६ शाळांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुका हा तंबाखूमुक्त शाळांचा तालुका म्हणून घोषित केला असला तरी या घोषणेचा पार फज्जा उडाला आहे.तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, शासनाने शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविला. २०१५ पासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे व सलाम बाँम्बे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत पांढरकवडा पंचायत समितीमधील १३६ शाळांनी सहभाग घेतला होता. मागील वर्षी सावित्रीबाई फुले यांचे जयंतीदिनी झालेल्या एका कार्यक्रमात तत्कालीन पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी व शिक्षण विभागाच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत तालुका हा तंबाखूमुक्त शाळांचा तालुका म्हणून घोषित करण्यात आला होता.यावेळी विद्यार्थी व शिक्षकांना तंबाखूचे सेवन न करण्याची शपथही घ्यायला लावली. तसे आदेशही काढण्यात आले. शाळांसमोर बोर्डही लावण्यात आले. परंतु बोर्ड केवळ नावापुरतेच अहे. काही विद्यार्थीही शाळेत सर्रासपणे तंबाखू, गुटखा व खर्ऱ्याचे सेवन करीत असल्याचे विदारक चित्र तालुक्यातील शाळांमध्ये पाहावयास मिळते. प्रशासनाचा आदेश मिळाल्यानंतर काही दिवस कर्मचाऱ्यांनी या आदेशाची अंमलबजावणीदेखिल केली. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांनाही समजावून सांगण्यात आले. पंरतु शाळेतील काही कर्मचारीच विद्यार्थ्यांसमक्ष तोंडात खर्रा कोंबताना दिसतात. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम होत असून विद्यार्थ्यांमध्येही तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढले आहे.ग्रामीण भागात जनजागृतीची गरजकेवळ तंबाखूमुक्त शाळा झाल्याची घोषणा करून तंबाखूमुक्त शाळा होणार नाही, तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज आहे. शासनाने अनेकदा आदेश काढूनही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज आहे.