शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

तिवरंग ग्रामस्थांनी केला श्रमदानातून रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:40 IST

शासनाच्या मदतीची वाट न पाहता श्रमदानातून तिवरंग गावकऱ्यांनी रस्ता तयार केला. यातून ‘गाव करी, ते राव ना करी’ ही म्हण त्यांनी सार्थ ठरविली.

ठळक मुद्देगाव करी, ते राव ना करी : शासनाची वाट न बघता श्रमदान, श्रमदानासोबतच हरिकीर्तन

दिनेश चौतमल ।लोकमत न्यूज नेटवर्कमुळावा : शासनाच्या मदतीची वाट न पाहता श्रमदानातून तिवरंग गावकऱ्यांनी रस्ता तयार केला. यातून ‘गाव करी, ते राव ना करी’ ही म्हण त्यांनी सार्थ ठरविली.मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील तळणी व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील तिवरंग गावाला जोडणारा रस्त्याचा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. ही बाब जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांना ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली. त्यांनी स्वत: पुढाकार घेत लोकसभागातून पुलाची दुरुस्ती व रस्ता तयार करण्याची संकल्पना मांडली. तिवरंग, मनुला, तळणी, वाकी येथील ग्रामस्थानी होकार देताच कामाला सुरूवात झाली. सध्या पुलाची दुरुस्ती व माती भरावाचे काम पूर्ण झाले. त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. यासोबतच रात्री हरिकीर्तन आयोजित केले आहे. संत मंडळी स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभागी होत आहे. हभप देविदास महाराज, खंडू महाराज, शिंदे माऊली, गणेश महाराज वाकीकर यांचे कीर्तन झाले. हभप गुलाबराव धोंगडे, प्रकाशराव कदम, विश्वनाथ कदम, जगदेवराव महाराज, नामदेव सूर्यवंशी, अनिल कदमल, बाळू महाराज, रमेश महाजन यांनीही कीर्तन केले.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबूराव कदम, मारोतराव लोखंडे, विवेक देशमुख यांनी या कामाला भेट दिली. मराठवाड्यातील तळणी रोडला जोडणारा सुमारे अर्धा किलोमीटरचा रस्ता आता जिल्हा परिषद सदस्यांच्या निधीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामालाही सुरूवात झाली. मराठवाड्यातील तळणी, वाकी, साप्ती, कोहळी, निघा, कोळी, निवळा, रुचेगाव, भरडगा, नेवरी या गाातील लोकांना विदर्भातील मुळावा येथे येण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. तसेच विदर्भातील तिवरंग, झाडगाव, पिंपळदरी, मुळावा, हातला, धनज, मोहदरी, पिंपळदरी, सुकळी, करमुला, पोफाळी, तरोडा या गावांची मोठी बाजारपेठ असणाºया नांदेड येथे जाण्यासाठी आता सोयीचे झाले आहे.४० किलोमीटरचा फेरा वाचलातिवरंग, मुळावा, उमरखेडमार्गे नांदेड ११० किलोमीटर अंतर जावे लागते. नवीन रस्त्यावरून तिवरंग, तळणी, कोळी, मार्लेगाव मार्गे केवळ ७० किलोमीटर अंतर असल्याने गावकऱ्याचा ४० किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांनी रस्त्याच्या कामाचे ठिकाणी मुक् कामच ठोकला आहे. रस्ता पूर्ण होईपर्यंत थांबण्याचा त्यांचा मनोदय आहे. श्रमदानासाठी शेकडो हात सरसावले असून परिसरातील गावांमध्ये ग्राम स्वच्छताही केली जात आहे. याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.