शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

तिवरंग ग्रामस्थांनी केला श्रमदानातून रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:40 IST

शासनाच्या मदतीची वाट न पाहता श्रमदानातून तिवरंग गावकऱ्यांनी रस्ता तयार केला. यातून ‘गाव करी, ते राव ना करी’ ही म्हण त्यांनी सार्थ ठरविली.

ठळक मुद्देगाव करी, ते राव ना करी : शासनाची वाट न बघता श्रमदान, श्रमदानासोबतच हरिकीर्तन

दिनेश चौतमल ।लोकमत न्यूज नेटवर्कमुळावा : शासनाच्या मदतीची वाट न पाहता श्रमदानातून तिवरंग गावकऱ्यांनी रस्ता तयार केला. यातून ‘गाव करी, ते राव ना करी’ ही म्हण त्यांनी सार्थ ठरविली.मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील तळणी व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील तिवरंग गावाला जोडणारा रस्त्याचा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. ही बाब जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांना ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली. त्यांनी स्वत: पुढाकार घेत लोकसभागातून पुलाची दुरुस्ती व रस्ता तयार करण्याची संकल्पना मांडली. तिवरंग, मनुला, तळणी, वाकी येथील ग्रामस्थानी होकार देताच कामाला सुरूवात झाली. सध्या पुलाची दुरुस्ती व माती भरावाचे काम पूर्ण झाले. त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. यासोबतच रात्री हरिकीर्तन आयोजित केले आहे. संत मंडळी स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभागी होत आहे. हभप देविदास महाराज, खंडू महाराज, शिंदे माऊली, गणेश महाराज वाकीकर यांचे कीर्तन झाले. हभप गुलाबराव धोंगडे, प्रकाशराव कदम, विश्वनाथ कदम, जगदेवराव महाराज, नामदेव सूर्यवंशी, अनिल कदमल, बाळू महाराज, रमेश महाजन यांनीही कीर्तन केले.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबूराव कदम, मारोतराव लोखंडे, विवेक देशमुख यांनी या कामाला भेट दिली. मराठवाड्यातील तळणी रोडला जोडणारा सुमारे अर्धा किलोमीटरचा रस्ता आता जिल्हा परिषद सदस्यांच्या निधीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामालाही सुरूवात झाली. मराठवाड्यातील तळणी, वाकी, साप्ती, कोहळी, निघा, कोळी, निवळा, रुचेगाव, भरडगा, नेवरी या गाातील लोकांना विदर्भातील मुळावा येथे येण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. तसेच विदर्भातील तिवरंग, झाडगाव, पिंपळदरी, मुळावा, हातला, धनज, मोहदरी, पिंपळदरी, सुकळी, करमुला, पोफाळी, तरोडा या गावांची मोठी बाजारपेठ असणाºया नांदेड येथे जाण्यासाठी आता सोयीचे झाले आहे.४० किलोमीटरचा फेरा वाचलातिवरंग, मुळावा, उमरखेडमार्गे नांदेड ११० किलोमीटर अंतर जावे लागते. नवीन रस्त्यावरून तिवरंग, तळणी, कोळी, मार्लेगाव मार्गे केवळ ७० किलोमीटर अंतर असल्याने गावकऱ्याचा ४० किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांनी रस्त्याच्या कामाचे ठिकाणी मुक् कामच ठोकला आहे. रस्ता पूर्ण होईपर्यंत थांबण्याचा त्यांचा मनोदय आहे. श्रमदानासाठी शेकडो हात सरसावले असून परिसरातील गावांमध्ये ग्राम स्वच्छताही केली जात आहे. याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.