शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

तिवरंग ग्रामस्थांनी केला श्रमदानातून रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:40 IST

शासनाच्या मदतीची वाट न पाहता श्रमदानातून तिवरंग गावकऱ्यांनी रस्ता तयार केला. यातून ‘गाव करी, ते राव ना करी’ ही म्हण त्यांनी सार्थ ठरविली.

ठळक मुद्देगाव करी, ते राव ना करी : शासनाची वाट न बघता श्रमदान, श्रमदानासोबतच हरिकीर्तन

दिनेश चौतमल ।लोकमत न्यूज नेटवर्कमुळावा : शासनाच्या मदतीची वाट न पाहता श्रमदानातून तिवरंग गावकऱ्यांनी रस्ता तयार केला. यातून ‘गाव करी, ते राव ना करी’ ही म्हण त्यांनी सार्थ ठरविली.मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील तळणी व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील तिवरंग गावाला जोडणारा रस्त्याचा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. ही बाब जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांना ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली. त्यांनी स्वत: पुढाकार घेत लोकसभागातून पुलाची दुरुस्ती व रस्ता तयार करण्याची संकल्पना मांडली. तिवरंग, मनुला, तळणी, वाकी येथील ग्रामस्थानी होकार देताच कामाला सुरूवात झाली. सध्या पुलाची दुरुस्ती व माती भरावाचे काम पूर्ण झाले. त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. यासोबतच रात्री हरिकीर्तन आयोजित केले आहे. संत मंडळी स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभागी होत आहे. हभप देविदास महाराज, खंडू महाराज, शिंदे माऊली, गणेश महाराज वाकीकर यांचे कीर्तन झाले. हभप गुलाबराव धोंगडे, प्रकाशराव कदम, विश्वनाथ कदम, जगदेवराव महाराज, नामदेव सूर्यवंशी, अनिल कदमल, बाळू महाराज, रमेश महाजन यांनीही कीर्तन केले.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबूराव कदम, मारोतराव लोखंडे, विवेक देशमुख यांनी या कामाला भेट दिली. मराठवाड्यातील तळणी रोडला जोडणारा सुमारे अर्धा किलोमीटरचा रस्ता आता जिल्हा परिषद सदस्यांच्या निधीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामालाही सुरूवात झाली. मराठवाड्यातील तळणी, वाकी, साप्ती, कोहळी, निघा, कोळी, निवळा, रुचेगाव, भरडगा, नेवरी या गाातील लोकांना विदर्भातील मुळावा येथे येण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. तसेच विदर्भातील तिवरंग, झाडगाव, पिंपळदरी, मुळावा, हातला, धनज, मोहदरी, पिंपळदरी, सुकळी, करमुला, पोफाळी, तरोडा या गावांची मोठी बाजारपेठ असणाºया नांदेड येथे जाण्यासाठी आता सोयीचे झाले आहे.४० किलोमीटरचा फेरा वाचलातिवरंग, मुळावा, उमरखेडमार्गे नांदेड ११० किलोमीटर अंतर जावे लागते. नवीन रस्त्यावरून तिवरंग, तळणी, कोळी, मार्लेगाव मार्गे केवळ ७० किलोमीटर अंतर असल्याने गावकऱ्याचा ४० किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांनी रस्त्याच्या कामाचे ठिकाणी मुक् कामच ठोकला आहे. रस्ता पूर्ण होईपर्यंत थांबण्याचा त्यांचा मनोदय आहे. श्रमदानासाठी शेकडो हात सरसावले असून परिसरातील गावांमध्ये ग्राम स्वच्छताही केली जात आहे. याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.