शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

टिपेश्वर अभयारण्याची क्षमता चारच वाघांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 21:44 IST

पट्टेदार वाघीण अवनीला गोळी घालून ठार केल्याने जगभर चर्चिल्या गेलेल्या टिपेश्वर अभयारण्याची क्षमता केवळ चार वाघांची आहे. मात्र प्रत्यक्षात तेथे १३ ते १४ वाघ असल्याची माहिती आहे. नरभक्षक वाघीण अवनीने पांढरकवडा वन विभागांतर्गत १३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार केली.

ठळक मुद्देप्रत्यक्षात डझनावर वाघांचे वास्तव्य : जंगलक्षेत्र कमी पडत असल्यानेच गावांमध्ये शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पट्टेदार वाघीण अवनीला गोळी घालून ठार केल्याने जगभर चर्चिल्या गेलेल्या टिपेश्वर अभयारण्याची क्षमता केवळ चार वाघांची आहे. मात्र प्रत्यक्षात तेथे १३ ते १४ वाघ असल्याची माहिती आहे.नरभक्षक वाघीण अवनीने पांढरकवडा वन विभागांतर्गत १३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार केली. म्हणून या वाघिणीला हैदराबादच्या नवाब या एक्सपर्ट शिकाऱ्यामार्फत गोळी घालून ठार मारण्यात आले. या निमित्ताने व्याघ्र संख्या व अभयारण्याची क्षमता हा मुद्दा पुढे आला आहे.सूत्रानुसार, पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत येणाºया टिपेश्वर अभयारण्याचे क्षेत्र १४८.६३ चौरस किलोमीटर एवढे आहे. या अभयारण्यात जास्तीत जास्त चार ते पाच वाघ राहू शकतात. प्रत्येक वाघाला किमान १० चौरस किलोमीटरचे क्षेत्र लागते. हे क्षेत्र वाघ स्वत: निश्चित करते. या क्षेत्राच्या चहूबाजूला तो लघवीने सीमा ठरवितो. मग त्या सीमेत दुसरा वाघ प्रवेश करीत नाही. अवघ्या चार ते पाच वाघांची क्षमता असलेल्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये नऊ ते दहा वाघ असल्याची नोंद वन खात्याच्या दप्तरी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात त्या भागातील वाघांचा हा आकडा १३ ते १४ असल्याचे वन यंत्रणा खासगीत सांगते. क्षमतेच्या सुमारे तीन पट अधिक वाघ असल्याने टिपेश्वर अभयारण्याचे क्षेत्र या वाघांना कमी पडते. त्यामुळेच हे वाघ अभयारण्याबाहेर आले असून पांढरकवडा वन विभागाचे जंगल तसेच त्याला लागून असलेल्या रहिवासी वस्त्या-गावे आणि शेतशिवारांमध्ये या वाघांचा वावर वाढला आहे. त्यातच शिकारीसाठी वन्यप्राणी मिळत नसल्याने हे वाघ हिंसक झाले असून मानवी वस्त्यांवर हल्ले करू लागले आहे. वाघांनी केलेल्या हल्ल्यात पांढरकवडा वन क्षेत्रांतर्गत आतापर्यंत १३ शेतकरी-शेतमजुरांचा बळी गेला आहे. मात्र या सर्व १३ शिकारी एकाच वाघाने केल्या का याबाबत वन खात्यातच साशंकतेचे वातावरण आहे.वन खात्याने नवाब पिता-पुत्रामार्फत अवनीला गोळी घालून ठार केले असले तरी तिचे दोन बछडे आता मोठे झाले आहेत. त्यांना शिकारही करता येत आहे. याशिवाय एक आणखी मोठा वाघ त्यांच्यासोबत आहे. या वाघ व बछड्यांची दहशत तीनही तालुक्यात कायम आहे. त्यामुळे आजही शेकडो हेक्टर जमीन पडिक आहे. लोक जागलीला जायला, शेतात जायला जीवाच्या भीतीने घाबरत आहेत. वन खात्याची यंत्रणा अनेकदा शेती पडिक असल्यामागे वनजमिनीवरील अतिक्रमण हे ठेवणीतील कारण पुढे करते. मात्र प्रत्यक्षात वाघाची दहशत हेच कारण असल्याचे आढळून आले आहे. वन्यजीव खात्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी टिपेश्वर अभयारण्याचे क्षेत्र किती, क्षमता किती, प्रत्येक वाघाला लागणारे क्षेत्र किती, तेथे रेकॉर्डवर पट्टेदार वाघांची नोंद किती आणि प्रत्यक्षात किती वाघांचे अस्तित्व आहे, याबाबी तपासल्यास १३ शेतकरी-शेतमजुरांच्या शिकारी मागील ‘वास्तव’ उघड होण्यास वेळ लागणार नाही.वन खात्याचे वर्षानुवर्षे दुर्लक्षक्षमतेपेक्षा अधिक असलेल्या वाघांना वन्यजीव विभागाने बेशुद्ध करून व पकडून इतरत्र हलविणे अपेक्षित आहे. मात्र वाघांची संख्या प्रचंड वाढली असतानाही वन खात्याने गेली कित्येक वर्ष या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच पांढरकवडा वन विभागातील तीन तालुक्यातील १३ शेतकरी-शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागल्याचे मानले जाते.

टॅग्स :TigerवाघTipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्य