शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

राज्यात धान्याच्या पारदर्शक वितरणासाठी आता अंगठा सक्तीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 10:54 IST

रेशन दुकानामधून धान्य वितरणासाठी पॉस मशिनचा प्रयोग हाती घेण्यात आला होता. यामध्ये असंख्य त्रृटी आढळल्या. आता या प्रक्रियेला गती देण्यासाठी एईपीडीएस नावाचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देअंमलबजावणी सुरूएईपीडीएस सॉफ्टवेअर सादर करणार हिशेब

रुपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रेशन दुकानामधून धान्य वितरणासाठी पॉस मशिनचा प्रयोग हाती घेण्यात आला होता. यामध्ये असंख्य त्रृटी आढळल्या. आता या प्रक्रियेला गती देण्यासाठी एईपीडीएस नावाचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. पुरवठा विभागाने हे सॉफ्टवेअर राज्यभरात वितरित करणे सुरू केले आहे. यामध्ये पारदर्शक धान्य वितरणासाठी अंगठा सक्तीचा करण्यात आला आहे. यातून धान्य वितरण प्रक्रिया पारदर्शक होणार आहे. हे अद्ययावत मशिनच आपला अहवाल जिल्ह्यासह राज्याच्या पुरवठा विभागाकडे सादर करणार आहे.रेशन दुकानातील धान्य काळयाबाजारात पोहचते. त्याला पायबंद घालण्यासाठी पॉस मशिनचा वापर सुरू झाला. अनेक ठिकाणी लिंक नसल्याने धान्य वितरणात आॅफलाईन पध्दतीने धान्य वितरीत केले जात होते. त्याचा अहवाल सादर करून नवीन कोटा मिळत होता. आता एप्रिलपासून पॉस मशिनमध्ये एईपीडीएस नावाचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यात आले आहे. यामुळे लिंक फेल होण्याचा प्रकार थांबणार आहे. मोबाईलवरील वायफाय अथवा इतर माध्यमातून संगणक आॅनलाईन करता येणार आहे. विशेष म्हणजे, ज्या कुटुंबाला धान्य वितरित करायचे आहे, त्या कुटुंबाचा अंगठा सक्तीचा राहणार आहे. अंगठा या मशिनवर लावल्यानंतर तो आधारलिंक होणे गरजेचे आहे. आधार लिंक अंगठा आणि रेशन पुस्तकातील नाव यांचे ताळमेळ जुळल्यानंतरच धान्य वितरित होणार आहे.विशेष म्हणजे, छोट्या मुलांचा अंगठा या ठिकाणी चालणार नाही. मोठ्या जबाबदार व्यक्तीलाच हे धान्य वितरित करण्यात येणार आहे. याकरिता गावपातळीवरील नागरिकांना अंगठा अपडेट करण्यासाठी आधार केंद्राची मदत घ्यावी लागणार आहे. या मशिनवर धान्य वितरकाचे आणि धान्य खरेदीदारचे नाव, वेळ, दिनांक आणि उचल केल्याची किंमत घेतलेले पैसे असा संपूर्ण हिशेब राहणार आहे. हा जमा-खर्च विक्रेत्याला तालुका अथवा जिल्हा पातळीवर सादर करण्याची गरज नाही. आॅनलाईन पध्दतीने ही संपूर्ण माहिती या कार्यालयात काही सेकंदात जमा होणार आहे.

ज्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात वाटपज्या महिन्यात धान्य वितरित करण्यात आले, ते धान्य ३० अथवा ३१ तारखेपर्यंतच लाभार्थ्यांना वाटणे गरजेचे आहे. महिन्याच्या शेवटच्या तारखेनंतर धान्य वाटप ‘लॅप्स’ होईल. इतर कोटा दुकानात शिल्लक आहे, असे गृहीत धरले जाणार आहे. यामुळे दुसऱ्या महिन्याला वितरित होणाºया एकूण कोट्यातून शिल्लक धान्य वजा करण्यात येणार आहे. उरलेले धान्य दुसºया महिन्याच्या कोट्यात दुकानदाराला मिळणार आहे. यामुळे शिल्लक धान्यातून होणारा गैरप्रकार पूर्णत: थांबणार आहे.

जोडीदाराला मिळणारे ३५ किलो थांबणारअंत्योदय योजनेत १ अथवा दोन व्यक्ती असणाऱ्या कुटुंबाला ३५ किलो धान्य वितरित करण्यात येत होते. आता अशा कुटुंबाला प्राधान्य गटात टाकण्यात येणार आहे. त्यांना चार ते पाच किलोच्या नियमानुसार मानसी धान्य मिळणार आहे. मात्र कोलाम समाजाला ३५ किलो धान्य मिळणार आहे. 

टॅग्स :Governmentसरकार