शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीचे तीनतेरा

By admin | Updated: August 26, 2014 23:45 IST

पावसाळा सुरू झाला की दरवर्षी शासनातर्फे गावागावांमध्ये वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते. मात्र अनेक ठिकाणी झाडे लावल्यानंतर ती आठ-पंधरा दिवसांतच मरून जात असल्याचे दिसून येते.

नांदेपेरा : पावसाळा सुरू झाला की दरवर्षी शासनातर्फे गावागावांमध्ये वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते. मात्र अनेक ठिकाणी झाडे लावल्यानंतर ती आठ-पंधरा दिवसांतच मरून जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे या वृक्ष लागवड मोहिमेचे तीनतेरा वाजले आहेत. वृक्ष लागवडीवर शासन दरवर्षी लाखो रूपये खर्च करीत असते़ मोठ्या थाटामाटात गावोगावी वृक्ष लागवड केली जाते. मात्र नंतर लावण्यात आलेल्या झाडांची देखभाल कुणीही करीत नाही़ परिणामी पावसाळा संपताच झाडे पूर्णत: नष्ट होतात़ तरीही पुन्हा दरवर्षी झाडे लावण्याची मोहीम राबविली जाते़ परंतु एकही झाड जिवंत राहत नसल्याने वृक्ष लागवड मोहिमेचा सर्वत्र फज्जा उडाला आहे़ या वृक्ष लावगडीसाठी अनेक गावी नर्सरी स्थापन केली जाते. त्यात रोपटी लावली जातात. त्यातूनच ग्रामपंचायती, संस्थांना रोपटी पुरविली जातात. मात्र अनेक नर्सरीमध्ये ही रोपटी जागीच वाळून जातात. काही नर्सरींमध्ये तर रोपट्यांचीच झाडे होतात. तरीही कुणीच ती रोपटी वृक्ष लावगडीसाठी नेत नाहीत. तालुक्यात अनेक ठिकाणी असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. संबंधित नर्सरीमध्येच रोपट्यांचे झाडांत रुपांतर झाले आहे. तथापि नर्सरी चालकांवर अद्याप कुठेही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. दरवर्षी गावोगावी झाडे लावली जातात. मात्र त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे आता शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला झाडे देताना त्या झाडांची जोपासणे करणे, ती जिवंत ठेवण्याबाबत उपाययोजना करण्याची खरी गरज आहे. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई केल्यास व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना झाडे जीवंत ठेवण्याची जबाबदारी सोपविल्यासच, झाडे जिवंत राहू शकण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाचा लाखोंचा निधीही पाण्यात जाणार नाही. गावही हिरवेगार होईल. पर्यावरणाचाही समतोल राखला जाईल. त्याचा सर्वांनाच लाभ होईल. त्या दृष्टीने उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. (वार्ताहर)