शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

तीन वर्षांपासून शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: July 8, 2016 02:33 IST

शासनाकडून प्रत्येक वर्षी पीककर्ज वाटप मोहीम राबविली जाते. पण काही शेतकऱ्यांना कर्जच मिळत नसल्याचे समोर आले आहे.

मोहदी : शासनाकडून प्रत्येक वर्षी पीककर्ज वाटप मोहीम राबविली जाते. पण काही शेतकऱ्यांना कर्जच मिळत नसल्याचे समोर आले आहे. कमी जमीनधारक शेतकऱ्यांना अल्प पीक कर्ज लवकर मिळते. पण अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे दिसते. परिणामी गत तीन वर्षांपासून काही शेतकरी कर्जापासून वंचित आहेत.पीक कर्जाचे पुनर्गठण केले जात आहे. पण तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून कर्जाची परतफेड न करू शकलेल्या शेतकऱ्यांना कर्जच मिळाले नसल्याचे समोर आले आहे. या वंचित शेतकऱ्यांची संख्या ६० टक्के असल्याचेही सांगण्यात येत आहे. सतत तीन वर्षे पैसेवारी ५० टक्केपेक्षा कमी असल्यास दुष्काळी परिस्थिती जाहीर केली जाते. यामुळे सक्तीची कर्ज वसुली थांबविली जाते. पण शेतकरी सावरेल याची शाश्वती नसते. खरीप पीककर्ज वाटप सुरू आहे. पण याचा लाभ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच होत आहे. तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहे. कमी शेती असलेल्यांच्या तुलनेत अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांचा खर्चही अधिक असतो. परिणामी सधन शेतकऱ्यांवर गंडांतर येत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जमीन विकण्याचा सपाटा लावला. (वार्ताहर)