शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

राजस्व अभियानाचे तीनतेरा

By admin | Updated: September 1, 2014 00:16 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरेने निकाली निघावे यासाठी राजस्व अभियान राबविण्यात आले. १८ जुलै २०१३ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. शेतकऱ्यांची कामे सुलभ आणि जलद गतीने होण्यासाठी शासनाने

किशोर वंजारी - नेरशेतकऱ्यांचे प्रश्न त्वरेने निकाली निघावे यासाठी राजस्व अभियान राबविण्यात आले. १८ जुलै २०१३ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. शेतकऱ्यांची कामे सुलभ आणि जलद गतीने होण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे यवतमाळ जिल्ह्यात या महत्त्वाकांक्षी योजनेचे पानिपत होत आहे. सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांचा दैनंदिन कामे आणि विविध प्रश्नासंदर्भात तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंध येतो. त्यांना या कामामुळे सदर कार्यालयांना भेटी द्याव्या लागतात. त्यांची कामे सुलभ व्हावी यासाठी राजस्व अभियान सुरू करण्यात आले. यात विविध दाखले देण्यासाठी शिबिर घेणे, गाव नकाशा प्रमाणे अतिक्रमित आणि बंद झालेले गाडी रस्ते, पांदण रस्ते, शिव रस्ते मोकळे करणे, विविध दाखले देण्यासाठी शिबिर घेणे, एक महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, चावडी वाचन आदी प्रकारची कामे घेण्याचा समावेश होता. विस्तारित स्वरूपातील समाधान योजना आणि महसूल अधिकाऱ्यांकडील प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी महसूल अदालत घेणे आदी बाबीही समाविष्ट आहे. मात्र नेरसह जिल्ह्यातील विविध तालुक्यात अजूनही चावडी वाचनाशिवाय उपक्रम राबविले गेले नाहीत. दाखले देण्यासाठी अपवाद वगळता शिबिर झाले नाही. शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना विविध प्रमाणपत्रांसाठी आवश्यक नमुने व आवश्यक असणाऱ्या दस्तावेजाची यादी पुरविण्याच्यादृष्टीने शिबिर राबविले गेले नाही. यावरून सदर योजनेचे जिल्ह्यात तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे.गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित, बंद झालेले गाडी रस्ते, पांदण, शिवार रस्ते आदी बाबींच्या शेकडो तक्रारी प्रलंबित आहे. राजस्व अभियानाच्या अनुषंगाने तहसील प्रशासन यावर कोणताही उपाय करू शकला नाही. चावडी वाचन कार्यक्रमालाही अल्प प्रतिसाद आहे. तलाठी कार्यालयात बसून कागदावर चावडी वाचन करतात. त्यामुळे लोकांचा सहभागही अतिशय कमी राहतो. या योजनेला गती मिळावी यासाठी महसूल विभागाने ठोस पावले उचलण्याची आणि योजना राबविण्यात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.