शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

राजस्व अभियानाचे तीनतेरा

By admin | Updated: September 1, 2014 00:16 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरेने निकाली निघावे यासाठी राजस्व अभियान राबविण्यात आले. १८ जुलै २०१३ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. शेतकऱ्यांची कामे सुलभ आणि जलद गतीने होण्यासाठी शासनाने

किशोर वंजारी - नेरशेतकऱ्यांचे प्रश्न त्वरेने निकाली निघावे यासाठी राजस्व अभियान राबविण्यात आले. १८ जुलै २०१३ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. शेतकऱ्यांची कामे सुलभ आणि जलद गतीने होण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे यवतमाळ जिल्ह्यात या महत्त्वाकांक्षी योजनेचे पानिपत होत आहे. सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांचा दैनंदिन कामे आणि विविध प्रश्नासंदर्भात तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंध येतो. त्यांना या कामामुळे सदर कार्यालयांना भेटी द्याव्या लागतात. त्यांची कामे सुलभ व्हावी यासाठी राजस्व अभियान सुरू करण्यात आले. यात विविध दाखले देण्यासाठी शिबिर घेणे, गाव नकाशा प्रमाणे अतिक्रमित आणि बंद झालेले गाडी रस्ते, पांदण रस्ते, शिव रस्ते मोकळे करणे, विविध दाखले देण्यासाठी शिबिर घेणे, एक महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, चावडी वाचन आदी प्रकारची कामे घेण्याचा समावेश होता. विस्तारित स्वरूपातील समाधान योजना आणि महसूल अधिकाऱ्यांकडील प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी महसूल अदालत घेणे आदी बाबीही समाविष्ट आहे. मात्र नेरसह जिल्ह्यातील विविध तालुक्यात अजूनही चावडी वाचनाशिवाय उपक्रम राबविले गेले नाहीत. दाखले देण्यासाठी अपवाद वगळता शिबिर झाले नाही. शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना विविध प्रमाणपत्रांसाठी आवश्यक नमुने व आवश्यक असणाऱ्या दस्तावेजाची यादी पुरविण्याच्यादृष्टीने शिबिर राबविले गेले नाही. यावरून सदर योजनेचे जिल्ह्यात तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे.गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित, बंद झालेले गाडी रस्ते, पांदण, शिवार रस्ते आदी बाबींच्या शेकडो तक्रारी प्रलंबित आहे. राजस्व अभियानाच्या अनुषंगाने तहसील प्रशासन यावर कोणताही उपाय करू शकला नाही. चावडी वाचन कार्यक्रमालाही अल्प प्रतिसाद आहे. तलाठी कार्यालयात बसून कागदावर चावडी वाचन करतात. त्यामुळे लोकांचा सहभागही अतिशय कमी राहतो. या योजनेला गती मिळावी यासाठी महसूल विभागाने ठोस पावले उचलण्याची आणि योजना राबविण्यात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.