शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेती वाहतुकीने घेतला तिघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:00 IST

जिल्ह्यात सर्रास अवैध रेतीची वाहतूक सुरू आहे. रात्री आर्णी व घाटंजी तालुक्यातून चोरटी वाहतूक केली जाते. याच वाहतुकीने रविवारी रात्री ११.३० वाजता तिघांचा बळी घेतला. घाटंजी तालुक्यातील कोळी-लिंगी येथे रेतीच्या ट्रकला अपघात झाला.

ठळक मुद्देआर्णी, घाटंजीत चोरटी वाहतूक : भरधाव ट्रक उलटला

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : जिल्ह्यात सर्रास अवैध रेतीची वाहतूक सुरू आहे. रात्री आर्णी व घाटंजी तालुक्यातून चोरटी वाहतूक केली जाते. याच वाहतुकीने रविवारी रात्री ११.३० वाजता तिघांचा बळी घेतला. घाटंजी तालुक्यातील कोळी-लिंगी येथे रेतीच्या ट्रकला अपघात झाला.अडाण नदीच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून ट्रक यवतमाळकडे येत असताना अपघात घडला. भरधाव ट्रक कोळी-लिंगी गावाजवळच्या वळणावर अचानक पलटी झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. जगदीश मेश्राम, किसन ठाकरे हे रेतीच्या ढिगाऱ्यात दबले. तर उर्वरित सात जण गंभीर जखमी झाले. त्यांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. यामध्ये विक्रम सक्रापुरे, प्रभाकर देवीदास ससाने, मंगेश शंकर ससाने, दिलीप अनंत गाडेकर, सचिन श्रावण वाघमारे यांचा समावेश आहे. यातील आकाश दाभेरे व विक्रम सक्रापुरे या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. यातील आकाश दाभेरे याचा नागपूरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातातील मृतक व जखमी हे यवतमाळनजीकच्या गोधनी येथील असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव महसूल प्रशासनाने केलेला नाही. त्यामुळे रेतीमाफियांकडून रात्रीच वाहतूक केली जात आहे. सदोबासावळी येथून, घाटंजी येथून रेती ट्रक, मॅटेडोअर व इतर काही प्रवासी वाहनातूनही यवतमाळात आणली जात आहे. याला महसूल यंत्रणेतून पाठबळ मिळत असल्याची चर्चा आहे. भीतीमुळे ट्रक भरधाव चालविले जातात. घाटात चालकाचे नियंत्रण नसल्याने हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येते.चौपट दराने रेतीची खुलेआम विक्रीशहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. एकाही रेती घाटाचा लिलाव नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात रेती येते कोठून याची चौकशी स्थानिक महसूल यंत्रणेने केली नाही. याचाच फायदा रेतीमाफिया घेत आहेत. आठ ते दहा हजार रुपये ब्रास प्रमाणे रेतीची विक्री सुरू आहे. संपूर्ण कामकाज मध्यरात्रीनंतरच होत आहे. या चोरट्या वाहतुकीला शहरात अभय कुणाचे असा प्रश्न उपस्थित होतो.