शहरं
Join us  
Trending Stories
1
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
2
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
3
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
4
पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
6
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
7
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
8
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
9
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
10
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
11
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
12
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
13
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
14
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
15
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
16
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
17
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
18
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
19
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
20
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?

तीन हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची कोंडी

By admin | Updated: December 14, 2015 02:39 IST

शैक्षणिक सत्र संपत आले तरी तीन हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

मंत्र्यांच्या आश्वासनाची प्रतीक्षा : केंद्रीय मंत्री, आमदारांच्या भेटीनंतरही प्रश्न कायमयवतमाळ : शैक्षणिक सत्र संपत आले तरी तीन हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. या आंदोलनाची दखल घेत खासदार आणि आमदारांनी भेट दिली. मात्र तिढा सुटला नाही. सामाजिक न्याय मंत्री विष्णू सावरांच्या आश्वासनाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांनी सुरू केली आहे.गत पाच वर्षांपासून विद्यार्थ्यांचा वसतिगृहाचा प्रश्न सुटला नाही. हा प्रश्न वरिष्ठ पातळीवरचा आहे, असे सांगून वारंवार पुढे ढकलला जातो. मात्र तोडगा निघाला नाही. आता तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मात्र मुलांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही. इतकेच नव्हे तर शासकीय वसतिगृहाच्या इमारती नाही. इमारतीच्या भाड्यावर आतापर्यंत लाखो रूपयांचा खर्च झाला. या पैशात इमारती उभ्या झाल्या असत्या. प्रत्यक्षात जागा मिळाली. मात्र इमारती बांधल्या गेल्या नाही. वसतिगृहे भाडेतत्वावरच सुरू आहेत. मुलांना या ठिकाणी मर्यादित प्रवेश आहे. यामुळे तीन हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोट्यवधीचे बजेट असताना मुलांना शिक्षणासाठी वसतिगृहात प्रवेश मिळत नाही. यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. शासनाचे उदासीन धोरण कारणीभूत असल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहे. गत पाच वर्षांपासून हा संघर्ष सुरू आहे. मात्र त्याबाबत ठोस निर्णय झाला नाही.उपोषण मंडपाला केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भेट दिली. आमदार अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी भेट दिली. मात्र विद्यार्थ्यांचे समाधान झाले नाही. पालकमंत्री संजय राठोड यांनी विश्रामगृहावर विद्यार्थ्यांची बैठक बोलावली होती. निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, प्रकल्प अधिकारी दीपककुमार मिना यावेळी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)