शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

तीन हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची कोंडी

By admin | Updated: December 14, 2015 02:39 IST

शैक्षणिक सत्र संपत आले तरी तीन हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

मंत्र्यांच्या आश्वासनाची प्रतीक्षा : केंद्रीय मंत्री, आमदारांच्या भेटीनंतरही प्रश्न कायमयवतमाळ : शैक्षणिक सत्र संपत आले तरी तीन हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. या आंदोलनाची दखल घेत खासदार आणि आमदारांनी भेट दिली. मात्र तिढा सुटला नाही. सामाजिक न्याय मंत्री विष्णू सावरांच्या आश्वासनाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांनी सुरू केली आहे.गत पाच वर्षांपासून विद्यार्थ्यांचा वसतिगृहाचा प्रश्न सुटला नाही. हा प्रश्न वरिष्ठ पातळीवरचा आहे, असे सांगून वारंवार पुढे ढकलला जातो. मात्र तोडगा निघाला नाही. आता तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मात्र मुलांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही. इतकेच नव्हे तर शासकीय वसतिगृहाच्या इमारती नाही. इमारतीच्या भाड्यावर आतापर्यंत लाखो रूपयांचा खर्च झाला. या पैशात इमारती उभ्या झाल्या असत्या. प्रत्यक्षात जागा मिळाली. मात्र इमारती बांधल्या गेल्या नाही. वसतिगृहे भाडेतत्वावरच सुरू आहेत. मुलांना या ठिकाणी मर्यादित प्रवेश आहे. यामुळे तीन हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोट्यवधीचे बजेट असताना मुलांना शिक्षणासाठी वसतिगृहात प्रवेश मिळत नाही. यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. शासनाचे उदासीन धोरण कारणीभूत असल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहे. गत पाच वर्षांपासून हा संघर्ष सुरू आहे. मात्र त्याबाबत ठोस निर्णय झाला नाही.उपोषण मंडपाला केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भेट दिली. आमदार अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी भेट दिली. मात्र विद्यार्थ्यांचे समाधान झाले नाही. पालकमंत्री संजय राठोड यांनी विश्रामगृहावर विद्यार्थ्यांची बैठक बोलावली होती. निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, प्रकल्प अधिकारी दीपककुमार मिना यावेळी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)