शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

तीन हजार शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:27 IST

तालुक्यातील शेतकरी शासनाच्या धोरणाला कंटाळला आहे. शासकीय दरात शेतकऱ्यांकडून तूर घेऊ, लवकर चुकारे देऊ, कर्ज वाटप करू या घोषणा पोकळ निघाल्या आहे.

ठळक मुद्देप्रश्न सुटण्याची आशा : आसूड यात्रेचे आज नेर शहरात आगमन

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील शेतकरी शासनाच्या धोरणाला कंटाळला आहे. शासकीय दरात शेतकऱ्यांकडून तूर घेऊ, लवकर चुकारे देऊ, कर्ज वाटप करू या घोषणा पोकळ निघाल्या आहे. मंगळवार, २२ मे रोजी आमदार बच्चू कडू यांची ‘आसूड’ यात्रा नेर शहरात पोहोचत आहे. ‘आसूड’ या समस्येवर प्रहार करेल का, शेतकºयांना न्याय मिळेल का, असे विविध विचार व मंथन नागरिकात होत आहे.तालूक्यातील तीन हजार शेतकरी अजूनही तूर विकण्यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहे. ४०० शेतकरी तूर विक्रीच्या रांगेत आहे. मान्सून यायला काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. शेताची मशागत करून बी-बियाणे आणण्यासाठी शेतकºयांना पैशाची गरज आहे. बँकांनी अजूनही कर्जवाटपाला सुरुवात केली नाही. ज्यांच्याकडे वर्षानुवर्षे कर्ज आहे, त्यांना कर्ज निलचे मॅसेज येत आहे. पण जे पीक विकून, उसनवार काढून कर्ज भरत होते, त्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे. व्यापारी शेतकºयांकडून कवडीमोल भावात तूर विकत घेऊन नाफेडमध्ये विविध सातबारावर टाकून शासकीय दराचा फायदा घेत आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीवर नाफेडने अतिक्रमण केले आहे. तूर घ्यायला नाफेड मुदतवाढीची वाट पाहात आहे. यामुळे बाजार समितीत विखुरलेले तुरीचे ढिग दिसत आहे. नेर तालूक्यातील कर्जबाजारी आणि समस्याग्रस्त शेतकरी ‘आसूड’ आंदोलनापासून खूप अपेक्षा ठेऊन आहे. आमदार बच्चू कडू हे नेर येथे दाखल होणार आहे. केवळ संबोधन नाही तर ‘आसूड’चा प्रहार त्यांनी करावा, अशी तालुक्यातील शेतकºयांना अपेक्षा आहे.