शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

परप्रांतातून आलेल्या तीन हजार नागरिकांना सर्दी, खोकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

रेल्वे, बस आणि खासगी वाहन या माध्यमातून दररोज नागरिकांचे लोंढे परतत आहेत. कुठला व्यक्ती कुठल्या गावावरून परतला याची माहिती तत्काळ मिळावी म्हणून गाव पातळीवर गाव समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती दररोज येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेत आहे. गत २८ दिवसात जिल्ह्यात ५७ हजार ४८६ नागरिक परतले आहे.

ठळक मुद्देगाव समित्यांनी नोंदविली ५७ हजार नावे : २० हजार होम क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या नियंत्रणासाठी २ मेपासून गावस्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने केलेल्या सर्वेक्षणानुसार परजिल्हा आणि परप्रांतातून आलेल्या तीन हजार नागरिकांना सर्दी, खोकला असल्याची नोंद केली आहे.रेल्वे, बस आणि खासगी वाहन या माध्यमातून दररोज नागरिकांचे लोंढे परतत आहेत. कुठला व्यक्ती कुठल्या गावावरून परतला याची माहिती तत्काळ मिळावी म्हणून गाव पातळीवर गाव समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती दररोज येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेत आहे. गत २८ दिवसात जिल्ह्यात ५७ हजार ४८६ नागरिक परतले आहे. या नागरिकांना सर्दी, खोकला किंवा इतर आजार आहे का याची पाहणी ही समिती करीत आहे. समितीच्या अहवालानुसार जिल्ह्यात तीन हजार २८० नागरिकांना सर्दी आणि खोकला असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. हा संपूर्ण अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात २० हजार ३४५ नागरिक होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.बाहेर जायचे असेल तर परवानगी लागेलपरजिल्हा, परराज्य या ठिकाणावरून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन कालवधीत कुठेही बाहेर जात येत नाही. तीव्र लक्षणे दिसल्यास तालुका समितीकडे या रुग्णांना वर्ग करण्याच्या सूचना आहे. याशिवाय क्वारंटाईन प्रक्रियेतील बाहेर पडलेल्या व्यक्तीला बाहेर जायचे असेल तर तशी परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या