शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

साडेतीनशेवर आरोपी विविध गुन्ह्यात पसार

By admin | Updated: September 17, 2014 00:01 IST

खून, दरोडे, प्राणघातक हल्ला, वाटमारी, घरफोडी यासारख्या गंभीर गुन्ह्यातील एक दोन नव्हे, तर तब्बल ३५२ आरोपी जिल्हाभरातून पसार आहेत. पोलिसांच्या हातावर तुरी देवून वर्षानूवर्षे हे आरोपी

पोलिसांच्या हातावर तुरी : १७ वर्षांपासून फरारीचा रेकॉर्ड सतीश येटरे - यवतमाळखून, दरोडे, प्राणघातक हल्ला, वाटमारी, घरफोडी यासारख्या गंभीर गुन्ह्यातील एक दोन नव्हे, तर तब्बल ३५२ आरोपी जिल्हाभरातून पसार आहेत. पोलिसांच्या हातावर तुरी देवून वर्षानूवर्षे हे आरोपी ओळख लपवून समाजात वास्तव्य करीत आहे. यातील काही आरोपींनी तर पसार राहण्याचा रेकॉर्डच केला आहे. एक आरोपी तब्बल १७ वर्षांपासून पसार असल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे, हे विशेष! असे असले तरी पसार आरोपींचा फुगत चाललेला आकडा बघता पोलीस त्यांच्यापुढे दिवसेंदिवस हतबल होत चालल्याचे दिसून येत आहे. शरीर दुखापतीच्या आणि संपत्तीविषयक गुन्ह्यात जिल्हा पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत गंभीर गुन्हे नोंद असलेले तब्बल ३५२ आरोपी पसार असल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. त्यापैकी २६३ आरोपींची फरार, तर ८९ आरोपींची पाहिजेत या सदराखाली नोंद घेण्यात आली आहे. कुठलीही गुन्हेगारी घटना घडल्यानंतर पोलीस आरोपींना अटक करतात. त्यानंतर मात्र जामीन मिळताच हे आरोपी शिक्षेच्या भितीने पसार होतात. आरोपी अनुपस्थित असल्याने न्यायप्रविष्ट खटलेही प्रलंबित राहतात. अनेकदा समन्स बजावूनही आरोपी हजर होत नाही. वॉरंट निघाल्यानंतर पोलीस संबंधित आरोपीचा शोध घेतात. मात्र शोध घेवून तो हाती लागत नाही. तेव्हा अनेकदा पोलिसांना न्यायालयाच्या संतापालाही सामोरे जावे लागते. दुसरीकडे एखाद्या गंभीर घटनेला मूर्तरूप देवून वर्षानूवर्षे पसार राहण्याचा ट्रेंड सध्या गुन्हेगारांमध्ये आहे. घटनेशी संबंधित पुरावे गोळा करून आणि तपास पूर्ण करून पोलिसांना ९० दिवसाच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करावी लागते. तोवर आरोपीला अटक करण्यात अथवा पुरावे गोळा झाले नाही तर अनेकदा पोलीस न्यायालयाला विनंती करून अतिरिक्त अवधी मागते. परंतु वारंवार अवधी वाढवून मिळत नाही. ही पोलिसांची खरी अडचण असली तरी, गुन्हेगारांना मात्र ९० दिवसाच्या नंतर म्हणजेच दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर न्यायालयात आत्मसमर्पण केल्यास लवकर जामीन मिळतो. तसेच दोषारोपपत्रात तांत्रिक अडचणी राहून खटल्यातून निर्दाेष मुक्तता होते, असा गैरसमज गुन्हेगारांमध्ये आहे. त्यामुळे भितीतून नव्हे तर गैरसमजूतीतूनही अनेक आरोपी पसार आहेत. काही आरोपी हे सराईत असल्याने कारागृहात असताना इतर गुन्हेगारांशी झालेल्या ओळखीतून आणि त्यांच्याच आधाराने ते परजिल्ह्यात वास्तव्याला आहेत. पोलीस दफ्तरी पसार म्हणून नोंद असलेले अनेक आरोपी वर्षानूवर्षे पसार आहेत. त्यातील एक आरोपी तर तब्बल १७ वर्षांपासून फरार आहे. पसार आरोपी हे मूळगाव आणि ठिकाण सोडून समाजात वास्तव्याला आहेत. त्यासाठी ते आपली ओळख लपवतात. त्यामुळे पसार आरोपींचा आकडा वाढताच आहे. याउलट पोलिसांची यंत्रणा तोकडी आणि कुचकामी ठरत असल्यानेही काही आरोपी पसार असल्याचे सांगण्यात येते. काही आरोपी हे पोलिसांच्या हालचालींवर बारिक नजर ठेवत असल्याने ते हाती लागत नाहीत, हेसुद्धा या पसार आरोपींची जमेची बाजू आहे.