शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

वाघाच्या हल्ल्यात माजी सरपंचासह तीन गंभीर

By admin | Updated: June 10, 2017 01:02 IST

गावालगतच्या नाल्यावर प्रात:र्विधीसाठी गेलेल्या दोन मजुरांवर पट्टेदार वाघाने हल्ला केला.

मांगली, हिरापुरातील घटना : लागोपाठ हल्ले, गावकरी दहशतीत लोकमत न्यूज नेटवर्क मुकुटबन : गावालगतच्या नाल्यावर प्रात:र्विधीसाठी गेलेल्या दोन मजुरांवर पट्टेदार वाघाने हल्ला केला. यात दोेनही मजूर गंभीर जखमी झालेत. ही खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास झरी तालुक्यातील मांगली येथे घडली. या घटनेने गावकरी दहशतीत असतानाच पुन्हा सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास याच वाघाने हिरापूर शेतशिवारात हिरापूर येथील माजी सरपंच देवीदास निमसटकर यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना तात्काळ वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. सकाळी घडलेल्या घटनेतील एका जखमीवर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले, तर एका जखमीला मुकुटबन येथून चंद्रपूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. या घटनेने परिसरातील गावांमध्ये वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सध्या मांगली येथे रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी पांढरकवडा तालुक्यातील पहापळ येथील काही मजूर मांगली येथे आले आहेत. शुक्रवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास या मजुरांपैैकी अनिल टेकाम(३०) रा.पहापळ व विकास वाघाडे (२८) रा.मांगली हे दोघे प्रात:र्विधीसाठी मांगली गावालगतच्या नाल्यावर गेले. याचवेळी नाल्याच्या काठावरील झुडपात एक पट्टेदार वाघ दबा धरून बसला होता. अनिल आणि विकासच्या हालचालीमुळे वाघ बिथरला आणि त्याने थेट दोघांवरही हल्ला केला. त्यामुळे हे दोघांनीही जिवाच्या आकांताने आरडाओरड सुरू केली. आजुबाजूला असलेल्या लोकांनीही आरडाओरड केल्याने वाघाने नाल्याच्या दिशेने पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच, मांगली गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत. घटनेनंतर वन कर्मचारी व पोलिसांनी वाघाचा शोध घेतला असता, दोन किलोमिटर अंतरावर एका पाणवठ्याजवळील झुडपात तो बसून असल्याचे दिसून आले. याच वाघाने सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हिरापूर शेतशिवारात पेरणीसाठी गेलेल्या देवीदास निमसटकर यांच्यावरही हल्ला केला. झरी तालुक्यात खरीप हंगामावर वाघाची दहशत सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. अशा स्थितीत या परिसरात वाघाचा वावर वाढल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये वाघाची प्रचंड दहशत आहे. शेतकरी व शेतमजुरांनी शेतात जाताना एकाकी न जाता समुहाने जावे, असे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.