शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

वाघाच्या हल्ल्यात माजी सरपंचासह तीन गंभीर

By admin | Updated: June 10, 2017 01:02 IST

गावालगतच्या नाल्यावर प्रात:र्विधीसाठी गेलेल्या दोन मजुरांवर पट्टेदार वाघाने हल्ला केला.

मांगली, हिरापुरातील घटना : लागोपाठ हल्ले, गावकरी दहशतीत लोकमत न्यूज नेटवर्क मुकुटबन : गावालगतच्या नाल्यावर प्रात:र्विधीसाठी गेलेल्या दोन मजुरांवर पट्टेदार वाघाने हल्ला केला. यात दोेनही मजूर गंभीर जखमी झालेत. ही खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास झरी तालुक्यातील मांगली येथे घडली. या घटनेने गावकरी दहशतीत असतानाच पुन्हा सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास याच वाघाने हिरापूर शेतशिवारात हिरापूर येथील माजी सरपंच देवीदास निमसटकर यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना तात्काळ वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. सकाळी घडलेल्या घटनेतील एका जखमीवर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले, तर एका जखमीला मुकुटबन येथून चंद्रपूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. या घटनेने परिसरातील गावांमध्ये वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सध्या मांगली येथे रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी पांढरकवडा तालुक्यातील पहापळ येथील काही मजूर मांगली येथे आले आहेत. शुक्रवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास या मजुरांपैैकी अनिल टेकाम(३०) रा.पहापळ व विकास वाघाडे (२८) रा.मांगली हे दोघे प्रात:र्विधीसाठी मांगली गावालगतच्या नाल्यावर गेले. याचवेळी नाल्याच्या काठावरील झुडपात एक पट्टेदार वाघ दबा धरून बसला होता. अनिल आणि विकासच्या हालचालीमुळे वाघ बिथरला आणि त्याने थेट दोघांवरही हल्ला केला. त्यामुळे हे दोघांनीही जिवाच्या आकांताने आरडाओरड सुरू केली. आजुबाजूला असलेल्या लोकांनीही आरडाओरड केल्याने वाघाने नाल्याच्या दिशेने पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच, मांगली गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत. घटनेनंतर वन कर्मचारी व पोलिसांनी वाघाचा शोध घेतला असता, दोन किलोमिटर अंतरावर एका पाणवठ्याजवळील झुडपात तो बसून असल्याचे दिसून आले. याच वाघाने सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हिरापूर शेतशिवारात पेरणीसाठी गेलेल्या देवीदास निमसटकर यांच्यावरही हल्ला केला. झरी तालुक्यात खरीप हंगामावर वाघाची दहशत सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. अशा स्थितीत या परिसरात वाघाचा वावर वाढल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये वाघाची प्रचंड दहशत आहे. शेतकरी व शेतमजुरांनी शेतात जाताना एकाकी न जाता समुहाने जावे, असे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.