शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

हिवाळ्यातच तीन प्रकल्पांत ठणठणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 21:17 IST

यावर्षी अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील तीन जलप्रकल्प हिवाळ्यातच कोरडे पडले. इतर मोठ्या जलाशयातही केवळ १६ टक्केच पाणी शिल्लक आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देजलाशयात १६ टक्केच : प्रकल्पातील आरक्षित पाणी नदीत सोडण्याचा वांदा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील तीन जलप्रकल्प हिवाळ्यातच कोरडे पडले. इतर मोठ्या जलाशयातही केवळ १६ टक्केच पाणी शिल्लक आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.जिल्ह्यातील ६२ लघु प्रकल्पांपैकी लोहतवाडी, नेर आणि बोरडा प्रकल्पात पाण्याचा थेंबही उरला नाही. इतर मोठ्या प्रकल्पांत केवळ १६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. त्यात पूस प्रकल्पात २०.७४ टक्के, अरूणावती १४.३० टक्के, तर बेंबळा प्रकल्पात केवळ १७.१४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अडाणमध्ये २३, नवरगाव ४०, गोकी १४, वाघाडी १२, सायखेडा ८१, अधरपूस ६२, तर बोरगाव प्रकल्पात केवळ १२ टक्के जलसाठा आहे. ६२ लघु प्रकल्पांमध्ये एकूण केवळ २५ टक्के पाणी शिल्लक आहे.हिवाळ्यातच प्रकल्प शेवटच्या घटका मोजत असल्याने येता उन्हाळा अत्यंत कठीण जाण्याचे संकेत आहे. जिल्ह्यातील ८०० च्यावर गावांमध्ये यंदा भीषण पाणीटंचाईची स्थिती आहे. यवतमाळ शहरालाही पाणीटंचाई भेडसावणार आहे. यामुळे उन्हाळ्यात जिल्ह्यात सर्वत्र पाणी पेटण्याची शक्यता वाढली आहे.जिल्ह्यातील नियोजित प्रकल्पांमधील पाणी साठा नदीत सोडणे आणि पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. मात्र नियोजित पाणी साठयात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. यामुळे पाण्याचे नियोजन कोलमडण्याचा धोका वर्तविला जात आहे.