शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

हिवाळ्यातच तीन प्रकल्पांत ठणठणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 21:17 IST

यावर्षी अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील तीन जलप्रकल्प हिवाळ्यातच कोरडे पडले. इतर मोठ्या जलाशयातही केवळ १६ टक्केच पाणी शिल्लक आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देजलाशयात १६ टक्केच : प्रकल्पातील आरक्षित पाणी नदीत सोडण्याचा वांदा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील तीन जलप्रकल्प हिवाळ्यातच कोरडे पडले. इतर मोठ्या जलाशयातही केवळ १६ टक्केच पाणी शिल्लक आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.जिल्ह्यातील ६२ लघु प्रकल्पांपैकी लोहतवाडी, नेर आणि बोरडा प्रकल्पात पाण्याचा थेंबही उरला नाही. इतर मोठ्या प्रकल्पांत केवळ १६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. त्यात पूस प्रकल्पात २०.७४ टक्के, अरूणावती १४.३० टक्के, तर बेंबळा प्रकल्पात केवळ १७.१४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अडाणमध्ये २३, नवरगाव ४०, गोकी १४, वाघाडी १२, सायखेडा ८१, अधरपूस ६२, तर बोरगाव प्रकल्पात केवळ १२ टक्के जलसाठा आहे. ६२ लघु प्रकल्पांमध्ये एकूण केवळ २५ टक्के पाणी शिल्लक आहे.हिवाळ्यातच प्रकल्प शेवटच्या घटका मोजत असल्याने येता उन्हाळा अत्यंत कठीण जाण्याचे संकेत आहे. जिल्ह्यातील ८०० च्यावर गावांमध्ये यंदा भीषण पाणीटंचाईची स्थिती आहे. यवतमाळ शहरालाही पाणीटंचाई भेडसावणार आहे. यामुळे उन्हाळ्यात जिल्ह्यात सर्वत्र पाणी पेटण्याची शक्यता वाढली आहे.जिल्ह्यातील नियोजित प्रकल्पांमधील पाणी साठा नदीत सोडणे आणि पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. मात्र नियोजित पाणी साठयात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. यामुळे पाण्याचे नियोजन कोलमडण्याचा धोका वर्तविला जात आहे.