शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘कलेक्टर’च्या कक्षासमोर तिघांनी घेतले विष

By admin | Updated: April 28, 2017 02:25 IST

जिल्हा कचेरीतील जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच दारव्हा तालुक्यातील डोल्हारी येथील एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून

शेतीच्या ताब्याचा वाद : दारव्हा तालुक्यातील गौतम कुटुंबीय यवतमाळ : जिल्हा कचेरीतील जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच दारव्हा तालुक्यातील डोल्हारी येथील एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबातील जमिनीच्या ताब्यावरून त्यांनी विष घेतल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी दुपारी १२ वाजता त्यांनी विष घेताच महसूल यंत्रणेत खळबळ उडाली. त्यांना तातडीने वाहनातून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उन्नन रामचंद्र गौतम (३२), कुंदन रामचंद्र गौतम (३४), आशिष अरुण गौतम (३२) सर्व रा. डोल्हारी देवी, ता. दारव्हा, अशी विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यांनी कुटुंबातील पाच एकर शेतीच्या ताब्यावरून दारव्हा येथील दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला होता. यात न्यायालयाने गौतम यांच्याविरूद्ध निकाल दिला होता. तेव्हापासून शेताच्या ताब्यावरून गौतम कुटुंबियांत धुसफूस सुरू होती. दारव्हा न्यायालयाच्या ८ आॅक्टोबर २०१४ च्या निकालानुसार गंगाबाई इंद्रबाद्दूर ठाकूर (बैस) (५३) रा. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती, यांनी त्यांच्याकडे शेतीचा ताबा मागितला. त्यावेळी ठाकूर यांनी दारव्हा पोलिसांकडे संरक्षणही मागितले होते. मात्र उन्नन, कुंदन व आशिष यांनी विरोध केल्यामुळे त्यांना शेतीचा ताबा घेता आला नव्हता. तेव्हापासून हे प्रकरण थंडबस्त्यात होते. गुरुवारी अचानक हे तिघे यवतमाळातील जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर कुणालाही काही कळायच्या आत स्वत:जवळ आणलेल्या डब्यातील विष प्राशन केले. हा प्रकार तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तिघांनाही तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीची पाहणी केली असता त्यात दारव्हा दिवाणी न्यायालयाशी संबंधित एक निवेदन आढळून आले. त्यावरूनच या शेतकऱ्यांची ओळख पटली. उपविभागीय अधिकारी राजेंद्र देशमुख आणि तहसीलदार सचिन शेजाळ यांनी शासकीय रुग्णालयात पोहोचून त्यांची भेट घेतली. मात्र तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्याकडून कुठलीही माहिती मिळू शकली नाही. नेमके प्रकरण काय याचा महसूल व पोलीस यंत्रणा शोध घेत आहे. (कार्यालय प्रतिनिधी) सलग दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यानंतर पोलीस व ज्याच्या बाजूने निकाल लागला, ते ताबा घेण्यासाठी आले असता या तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाची सहा महिन्यांपूर्वी दारव्हा पोलिसांनी नोंद घेतली होती. यानंतर शेतीचा ताबा घेताना आडकाठी येत असल्याने गुरूवारी दारव्हा ठाणेदारांनी दोनही गटांसह डोल्हारी देवी येथील पोलीस पाटील व तंटामुक्त समितीला ठाण्यात बोलाविले होते. मात्र गौतम कुटुंबीयांनी तेथे न जाता थेट यवतमाळ गाठून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांचा हा सहा महिन्यातील दुसरा प्रयत्न आहे. जिल्हाधिकारी कक्षासमोरील दुसरी घटना शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कक्षासमोर विष घेतल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी दारव्हा तालुक्यातीलच शेंद्री येथील एका युवा शेतकऱ्याने खासगी फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गुरुवारी विष घेणारेही प्रामाणिकपणे शेतीत राबत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. मात्र कौटुंबिक वादातून शेतीच्या ताब्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येते.