शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

‘कलेक्टर’च्या कक्षासमोर तिघांनी घेतले विष

By admin | Updated: April 28, 2017 02:25 IST

जिल्हा कचेरीतील जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच दारव्हा तालुक्यातील डोल्हारी येथील एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून

शेतीच्या ताब्याचा वाद : दारव्हा तालुक्यातील गौतम कुटुंबीय यवतमाळ : जिल्हा कचेरीतील जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच दारव्हा तालुक्यातील डोल्हारी येथील एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबातील जमिनीच्या ताब्यावरून त्यांनी विष घेतल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी दुपारी १२ वाजता त्यांनी विष घेताच महसूल यंत्रणेत खळबळ उडाली. त्यांना तातडीने वाहनातून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उन्नन रामचंद्र गौतम (३२), कुंदन रामचंद्र गौतम (३४), आशिष अरुण गौतम (३२) सर्व रा. डोल्हारी देवी, ता. दारव्हा, अशी विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यांनी कुटुंबातील पाच एकर शेतीच्या ताब्यावरून दारव्हा येथील दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला होता. यात न्यायालयाने गौतम यांच्याविरूद्ध निकाल दिला होता. तेव्हापासून शेताच्या ताब्यावरून गौतम कुटुंबियांत धुसफूस सुरू होती. दारव्हा न्यायालयाच्या ८ आॅक्टोबर २०१४ च्या निकालानुसार गंगाबाई इंद्रबाद्दूर ठाकूर (बैस) (५३) रा. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती, यांनी त्यांच्याकडे शेतीचा ताबा मागितला. त्यावेळी ठाकूर यांनी दारव्हा पोलिसांकडे संरक्षणही मागितले होते. मात्र उन्नन, कुंदन व आशिष यांनी विरोध केल्यामुळे त्यांना शेतीचा ताबा घेता आला नव्हता. तेव्हापासून हे प्रकरण थंडबस्त्यात होते. गुरुवारी अचानक हे तिघे यवतमाळातील जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर कुणालाही काही कळायच्या आत स्वत:जवळ आणलेल्या डब्यातील विष प्राशन केले. हा प्रकार तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तिघांनाही तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीची पाहणी केली असता त्यात दारव्हा दिवाणी न्यायालयाशी संबंधित एक निवेदन आढळून आले. त्यावरूनच या शेतकऱ्यांची ओळख पटली. उपविभागीय अधिकारी राजेंद्र देशमुख आणि तहसीलदार सचिन शेजाळ यांनी शासकीय रुग्णालयात पोहोचून त्यांची भेट घेतली. मात्र तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्याकडून कुठलीही माहिती मिळू शकली नाही. नेमके प्रकरण काय याचा महसूल व पोलीस यंत्रणा शोध घेत आहे. (कार्यालय प्रतिनिधी) सलग दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यानंतर पोलीस व ज्याच्या बाजूने निकाल लागला, ते ताबा घेण्यासाठी आले असता या तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाची सहा महिन्यांपूर्वी दारव्हा पोलिसांनी नोंद घेतली होती. यानंतर शेतीचा ताबा घेताना आडकाठी येत असल्याने गुरूवारी दारव्हा ठाणेदारांनी दोनही गटांसह डोल्हारी देवी येथील पोलीस पाटील व तंटामुक्त समितीला ठाण्यात बोलाविले होते. मात्र गौतम कुटुंबीयांनी तेथे न जाता थेट यवतमाळ गाठून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांचा हा सहा महिन्यातील दुसरा प्रयत्न आहे. जिल्हाधिकारी कक्षासमोरील दुसरी घटना शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कक्षासमोर विष घेतल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी दारव्हा तालुक्यातीलच शेंद्री येथील एका युवा शेतकऱ्याने खासगी फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गुरुवारी विष घेणारेही प्रामाणिकपणे शेतीत राबत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. मात्र कौटुंबिक वादातून शेतीच्या ताब्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येते.