शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

तीन खासदार आणि बारा आमदार

By admin | Updated: February 12, 2017 00:11 IST

जिल्ह्याला तीन खासदार, विधानसभेचे सात आणि विधानपरिषदेचे पाच, असे १२ आमदार लाभले आहे.

प्रतिष्ठा पणाला : मतदार ठरणार निर्णायक रवींद्र चांदेकर  यवतमाळ जिल्ह्याला तीन खासदार, विधानसभेचे सात आणि विधानपरिषदेचे पाच, असे १२ आमदार लाभले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या सर्वांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा आहे. त्यामुळेच जिल्ह्याला हंसराज अहीर, भावना गवळी व अ‍ॅड. राजीव सातव, असे तीन खासदार मिळाले. त्यांच्यापैकी अहीर केंद्रात गृहराज्यमंत्री आहे. आमदारांपैकी मदन येरावार पालकमंत्री, डॉ. रणजित पाटील नगरविकास राज्यमंत्री, तर संजय राठोड महसूल राज्यमंत्री आहेत. माणिकराव ठाकरे विधान परिषदेचे उपसभापती आहे. या सर्वांना लाल दिवे आहे. उर्वरित खासदार, आमदारही दिग्गज आहेत. या सर्वांना येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्याच पक्षाला आपली उपयोगिता सिद्ध करून दाखवून द्यावी लागणार आहे. खासदार, आमदारांच्या बाबतीत सध्या भाजपा आणि शिवसेना सरस आहे. त्यांचेच सर्वाधिक खासदार व आमदार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन आमदार आहे. त्यापैकी केवळ ठाकरे यांनाच लाल दिवा आहे. तथापि त्यांना त्याचा पुरेपूर वापर करता येणे शक्य नाही. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचा सर्वाधिक कस लागणार आहे. राष्ट्रवादीला आपला गड राखण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करावे लागणार आहे. त्या तुलनेत भाजप आणि शिवसेनेला ही निवडणूक सोपी आहे. त्यांचे थेट केंद्रापासून ते राज्यापर्यंत मंत्री आहेत. सोबतीला राज्यमंत्री दर्जाचा लालदिवाही आहे. तरीही जिल्हा परिषदेची उमेदवारी बहाल करताना भाजपाला अनेक ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनाच आपली उमेदवारी द्यावी लागली आहे. उरले केवळ पाच दिवस हे सर्व लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष निवडणुकीत कोणती भूमिका बजावतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मतदानाला जेमतेम पाच दिवस उरले आहे. तूर्तास जिल्हा परिषदेवर काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. ती उलथून पाडण्यासाठी भाजपा-शिवसेनेला, तर ती कायम ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला व्यूहरचना आखावी लागेल. ग्रामीण भागात चांगला जनाधार लाभलेल्या काँग्रेसला सत्ता कायम राखण्यासाठी जादा मेहनत घ्यावी लागेल, एवढे मात्र निश्चित.