शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तीन खासदार आणि बारा आमदार

By admin | Updated: February 12, 2017 00:11 IST

जिल्ह्याला तीन खासदार, विधानसभेचे सात आणि विधानपरिषदेचे पाच, असे १२ आमदार लाभले आहे.

प्रतिष्ठा पणाला : मतदार ठरणार निर्णायक रवींद्र चांदेकर  यवतमाळ जिल्ह्याला तीन खासदार, विधानसभेचे सात आणि विधानपरिषदेचे पाच, असे १२ आमदार लाभले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या सर्वांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा आहे. त्यामुळेच जिल्ह्याला हंसराज अहीर, भावना गवळी व अ‍ॅड. राजीव सातव, असे तीन खासदार मिळाले. त्यांच्यापैकी अहीर केंद्रात गृहराज्यमंत्री आहे. आमदारांपैकी मदन येरावार पालकमंत्री, डॉ. रणजित पाटील नगरविकास राज्यमंत्री, तर संजय राठोड महसूल राज्यमंत्री आहेत. माणिकराव ठाकरे विधान परिषदेचे उपसभापती आहे. या सर्वांना लाल दिवे आहे. उर्वरित खासदार, आमदारही दिग्गज आहेत. या सर्वांना येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्याच पक्षाला आपली उपयोगिता सिद्ध करून दाखवून द्यावी लागणार आहे. खासदार, आमदारांच्या बाबतीत सध्या भाजपा आणि शिवसेना सरस आहे. त्यांचेच सर्वाधिक खासदार व आमदार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन आमदार आहे. त्यापैकी केवळ ठाकरे यांनाच लाल दिवा आहे. तथापि त्यांना त्याचा पुरेपूर वापर करता येणे शक्य नाही. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचा सर्वाधिक कस लागणार आहे. राष्ट्रवादीला आपला गड राखण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करावे लागणार आहे. त्या तुलनेत भाजप आणि शिवसेनेला ही निवडणूक सोपी आहे. त्यांचे थेट केंद्रापासून ते राज्यापर्यंत मंत्री आहेत. सोबतीला राज्यमंत्री दर्जाचा लालदिवाही आहे. तरीही जिल्हा परिषदेची उमेदवारी बहाल करताना भाजपाला अनेक ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनाच आपली उमेदवारी द्यावी लागली आहे. उरले केवळ पाच दिवस हे सर्व लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष निवडणुकीत कोणती भूमिका बजावतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मतदानाला जेमतेम पाच दिवस उरले आहे. तूर्तास जिल्हा परिषदेवर काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. ती उलथून पाडण्यासाठी भाजपा-शिवसेनेला, तर ती कायम ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला व्यूहरचना आखावी लागेल. ग्रामीण भागात चांगला जनाधार लाभलेल्या काँग्रेसला सत्ता कायम राखण्यासाठी जादा मेहनत घ्यावी लागेल, एवढे मात्र निश्चित.