शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

पैनगंगा नदी पुलाने घेतले आणखी तीन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 22:10 IST

विशाल पात्र असलेल्या पैनगंगेच्या पुलावर सुरक्षा कठड्यांच्या अभावी शुक्रवारी पती-पत्नीसह तिघांचा बळी गेला. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलावर लोखंडी कठडे लावण्याची मागणी....

ठळक मुद्देसुरक्षा कठडेच नाही : उमरखेड पोलीस व सामाजिक संघटनांच्या पत्राकडे दुर्लक्ष

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : विशाल पात्र असलेल्या पैनगंगेच्या पुलावर सुरक्षा कठड्यांच्या अभावी शुक्रवारी पती-पत्नीसह तिघांचा बळी गेला. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलावर लोखंडी कठडे लावण्याची मागणी सामाजिक संघटनांसह पोलीस यंत्रणेनेही केली होती. परंतु संबंधित विभागाने दखल घेतली नाही. शुक्रवारी तिघांचे बळी गेले, यापूर्वी अनेकांची बळी सुरक्षा कठड्याअभावी गेलेत. भविष्यातही असे अपघात होण्याची भीती आहे.विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरुन पैनगंगा नदी वाहते. या दोन प्रदेशांना जोडणारा मार्लेगाव येथे मोठा पूल आहे. याच पुलावर शुक्रवारी एका ट्रकने कारला जबर धडक दिली. सुरक्षा कठडे नसल्याने कार थेट नदी पात्रात कोसळली. या भीषण अपघातात ज्ञानेश्वर गोटे, त्यांच्या पत्नी रत्ना गोटे आणि चालक जागीच ठार झाले. या पुलावर सुरक्षा कठडे असते तर अपघातानंतर कार कठड्याला अडकली असती आणि नदीपात्रात कोसळली नसती, असे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.यापूर्वीही या पुलावरून पडून अनेकांना प्राण गमवावा लागला तर कित्येक जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे पुलाच्या सुरक्षा कठड्यांबाबत विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला. पोलिसांनीही पत्रव्यवहार करून सुरक्षा कठडे आवश्यक असल्याचे संबंधित विभागाला सांगितले. परंतु अद्यापपर्यंत कुणीही दखल घेतली नाही. विशेष म्हणजे पैनगंगेच्या या पुलासोबतच जिल्ह्यातील अनेक मोठ्या नद्यांवर असलेल्या पुलांवरही सुरक्षा कठड्यांचा अभाव आहे. बांधकाम विभागाने कठडे लावून लोकांच्या प्राणांचे रक्षण करावे, अशी मागणी आहे.लोखंडी सुरक्षा कठड्यांवर चोरट्यांची नजरजिल्ह्यातील बहुतांश मोठ्या नद्यांच्या पुलावर बांधकाम विभागाने सुरक्षा कठडे लावले होते. परंतु लोखंडी सुरक्षा कठडे चोरट्यांचे लक्ष ठरले आहे. वारंवार कठडे लावल्यानंतरही चोरटे लोखंंडी पाईप चोरुन नेतात. त्यामुळे बांधकाम विभाग सुरक्षा कठडे लावण्याकडे दुर्लक्ष करते. परंतु अशा पुलांवर सिमेंटचे कठडे उभारल्यास अपघात टाळता येऊ शकतात. परंतु एकदा पूल बांधला की, त्याकडे बांधकाम विभाग पुन्हा कधीही लक्ष देत नाही.