शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगा नदी पुलाने घेतले आणखी तीन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 22:10 IST

विशाल पात्र असलेल्या पैनगंगेच्या पुलावर सुरक्षा कठड्यांच्या अभावी शुक्रवारी पती-पत्नीसह तिघांचा बळी गेला. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलावर लोखंडी कठडे लावण्याची मागणी....

ठळक मुद्देसुरक्षा कठडेच नाही : उमरखेड पोलीस व सामाजिक संघटनांच्या पत्राकडे दुर्लक्ष

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : विशाल पात्र असलेल्या पैनगंगेच्या पुलावर सुरक्षा कठड्यांच्या अभावी शुक्रवारी पती-पत्नीसह तिघांचा बळी गेला. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलावर लोखंडी कठडे लावण्याची मागणी सामाजिक संघटनांसह पोलीस यंत्रणेनेही केली होती. परंतु संबंधित विभागाने दखल घेतली नाही. शुक्रवारी तिघांचे बळी गेले, यापूर्वी अनेकांची बळी सुरक्षा कठड्याअभावी गेलेत. भविष्यातही असे अपघात होण्याची भीती आहे.विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरुन पैनगंगा नदी वाहते. या दोन प्रदेशांना जोडणारा मार्लेगाव येथे मोठा पूल आहे. याच पुलावर शुक्रवारी एका ट्रकने कारला जबर धडक दिली. सुरक्षा कठडे नसल्याने कार थेट नदी पात्रात कोसळली. या भीषण अपघातात ज्ञानेश्वर गोटे, त्यांच्या पत्नी रत्ना गोटे आणि चालक जागीच ठार झाले. या पुलावर सुरक्षा कठडे असते तर अपघातानंतर कार कठड्याला अडकली असती आणि नदीपात्रात कोसळली नसती, असे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.यापूर्वीही या पुलावरून पडून अनेकांना प्राण गमवावा लागला तर कित्येक जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे पुलाच्या सुरक्षा कठड्यांबाबत विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला. पोलिसांनीही पत्रव्यवहार करून सुरक्षा कठडे आवश्यक असल्याचे संबंधित विभागाला सांगितले. परंतु अद्यापपर्यंत कुणीही दखल घेतली नाही. विशेष म्हणजे पैनगंगेच्या या पुलासोबतच जिल्ह्यातील अनेक मोठ्या नद्यांवर असलेल्या पुलांवरही सुरक्षा कठड्यांचा अभाव आहे. बांधकाम विभागाने कठडे लावून लोकांच्या प्राणांचे रक्षण करावे, अशी मागणी आहे.लोखंडी सुरक्षा कठड्यांवर चोरट्यांची नजरजिल्ह्यातील बहुतांश मोठ्या नद्यांच्या पुलावर बांधकाम विभागाने सुरक्षा कठडे लावले होते. परंतु लोखंडी सुरक्षा कठडे चोरट्यांचे लक्ष ठरले आहे. वारंवार कठडे लावल्यानंतरही चोरटे लोखंंडी पाईप चोरुन नेतात. त्यामुळे बांधकाम विभाग सुरक्षा कठडे लावण्याकडे दुर्लक्ष करते. परंतु अशा पुलांवर सिमेंटचे कठडे उभारल्यास अपघात टाळता येऊ शकतात. परंतु एकदा पूल बांधला की, त्याकडे बांधकाम विभाग पुन्हा कधीही लक्ष देत नाही.