शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

पैनगंगा नदी पुलाने घेतले आणखी तीन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 22:10 IST

विशाल पात्र असलेल्या पैनगंगेच्या पुलावर सुरक्षा कठड्यांच्या अभावी शुक्रवारी पती-पत्नीसह तिघांचा बळी गेला. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलावर लोखंडी कठडे लावण्याची मागणी....

ठळक मुद्देसुरक्षा कठडेच नाही : उमरखेड पोलीस व सामाजिक संघटनांच्या पत्राकडे दुर्लक्ष

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : विशाल पात्र असलेल्या पैनगंगेच्या पुलावर सुरक्षा कठड्यांच्या अभावी शुक्रवारी पती-पत्नीसह तिघांचा बळी गेला. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलावर लोखंडी कठडे लावण्याची मागणी सामाजिक संघटनांसह पोलीस यंत्रणेनेही केली होती. परंतु संबंधित विभागाने दखल घेतली नाही. शुक्रवारी तिघांचे बळी गेले, यापूर्वी अनेकांची बळी सुरक्षा कठड्याअभावी गेलेत. भविष्यातही असे अपघात होण्याची भीती आहे.विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरुन पैनगंगा नदी वाहते. या दोन प्रदेशांना जोडणारा मार्लेगाव येथे मोठा पूल आहे. याच पुलावर शुक्रवारी एका ट्रकने कारला जबर धडक दिली. सुरक्षा कठडे नसल्याने कार थेट नदी पात्रात कोसळली. या भीषण अपघातात ज्ञानेश्वर गोटे, त्यांच्या पत्नी रत्ना गोटे आणि चालक जागीच ठार झाले. या पुलावर सुरक्षा कठडे असते तर अपघातानंतर कार कठड्याला अडकली असती आणि नदीपात्रात कोसळली नसती, असे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.यापूर्वीही या पुलावरून पडून अनेकांना प्राण गमवावा लागला तर कित्येक जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे पुलाच्या सुरक्षा कठड्यांबाबत विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला. पोलिसांनीही पत्रव्यवहार करून सुरक्षा कठडे आवश्यक असल्याचे संबंधित विभागाला सांगितले. परंतु अद्यापपर्यंत कुणीही दखल घेतली नाही. विशेष म्हणजे पैनगंगेच्या या पुलासोबतच जिल्ह्यातील अनेक मोठ्या नद्यांवर असलेल्या पुलांवरही सुरक्षा कठड्यांचा अभाव आहे. बांधकाम विभागाने कठडे लावून लोकांच्या प्राणांचे रक्षण करावे, अशी मागणी आहे.लोखंडी सुरक्षा कठड्यांवर चोरट्यांची नजरजिल्ह्यातील बहुतांश मोठ्या नद्यांच्या पुलावर बांधकाम विभागाने सुरक्षा कठडे लावले होते. परंतु लोखंडी सुरक्षा कठडे चोरट्यांचे लक्ष ठरले आहे. वारंवार कठडे लावल्यानंतरही चोरटे लोखंंडी पाईप चोरुन नेतात. त्यामुळे बांधकाम विभाग सुरक्षा कठडे लावण्याकडे दुर्लक्ष करते. परंतु अशा पुलांवर सिमेंटचे कठडे उभारल्यास अपघात टाळता येऊ शकतात. परंतु एकदा पूल बांधला की, त्याकडे बांधकाम विभाग पुन्हा कधीही लक्ष देत नाही.