शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसमध्ये तीन बैठका पाणीटंचाई मात्र कायम

By admin | Updated: April 27, 2017 00:30 IST

तालुक्यातील पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी आतापर्यंत तीन बैठका घेण्यात आल्या. मात्र गावागावातील पाणीटंचाई जैसे थेच आहे.

जैसे थे : पहिल्या बैठकीतील समस्या तिसऱ्या बैठकीतही कायम दिग्रस : तालुक्यातील पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी आतापर्यंत तीन बैठका घेण्यात आल्या. मात्र गावागावातील पाणीटंचाई जैसे थेच आहे. पहिल्या बैठकीतील प्रश्न तिसऱ्या बैठकीपर्यंतही सुटले नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या शब्दांना अधिकाऱ्यांच्या लेखी काही किमत आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिग्रस तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावागावातील विहिरींनी तळ गाठला असून अनेक गावातील हातपंपही बंद पडले आहे. पंचायत समितीने तयार केलेला कृती आराखडाही कागदावरच दिसत आहे. दिग्रस तालुक्यातील पाणीटंचाईची नेमकी स्थिती काय आहे, यासाठी महिनाभरापूर्वी महसूल राज्यमंत्री आणि या विभागाचे आमदार संजय राठोड यांनी पाणीटंचाई आढावा बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. तसेच मुख्यालयी न राहणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर दुसरी पाणीटांईची बैठक झाली. या बैठकीतही तेच ते प्रश्न पुढे आले. यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्या उपस्थितीत तिसरी पाणीटंचाईची आढावा बैठक घेण्यात आली. त्यांनी सरपंच, उपसरपंच आदींनी मांडलेल्या प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच पाणीटंचाई उद्भवल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे सांगितले. या तिन्ही बैठका पाणीटंचाईची तिच ती गावे आणि त्याच त्या समस्या होत्या. सरपंच आणि सदस्य आपल्या गावातील समस्या मांडून आता हतबल झाले आहे. ना.संजय राठोड यांनी पाणीटंचाईसाठी कितीही पैसा खेचून आणण्याची ग्वाही दिली होती. परंतु अद्यापपर्यंत गावागावातील पाणीटंचाई कायम आहे. लोकप्रतिनिधींचे अधिकारी ऐकत नसल्याचे यावरून दिसून येत आहे. अनेक गावातील सरपंच तर कशाला समस्या मांडायची, असे म्हणत आहे. ्रपाणी टंचाईमुळे हैराण झालेल्या गावकऱ्यांची यातून सुटका कशी होणार, हा मोठा प्रश्न आहे. (शहर प्रतिनिधी) ‘त्या’ आदेशाचे काय झाले ? पाणीटंचाईसंदर्भात झालेल्या बैठकीत ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश महसूल राज्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु बहुतांश गावातील ग्रामसेवक आजही शहरातूनच कारभार पाहात आहे. ग्रामीण जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. परंतु ग्रामसेवकांना त्याचे काही देणेघेणे दिसत नाही. जेथे मंत्र्याच्याच आदेशाला जुमानत नाही तेथे अधिकाऱ्यांनी सांगून ग्रामसेवक मंडळी काय करत असेल, हा प्रश्न आहे.