शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

दिग्रसमध्ये तीन बैठका पाणीटंचाई मात्र कायम

By admin | Updated: April 27, 2017 00:30 IST

तालुक्यातील पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी आतापर्यंत तीन बैठका घेण्यात आल्या. मात्र गावागावातील पाणीटंचाई जैसे थेच आहे.

जैसे थे : पहिल्या बैठकीतील समस्या तिसऱ्या बैठकीतही कायम दिग्रस : तालुक्यातील पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी आतापर्यंत तीन बैठका घेण्यात आल्या. मात्र गावागावातील पाणीटंचाई जैसे थेच आहे. पहिल्या बैठकीतील प्रश्न तिसऱ्या बैठकीपर्यंतही सुटले नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या शब्दांना अधिकाऱ्यांच्या लेखी काही किमत आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिग्रस तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावागावातील विहिरींनी तळ गाठला असून अनेक गावातील हातपंपही बंद पडले आहे. पंचायत समितीने तयार केलेला कृती आराखडाही कागदावरच दिसत आहे. दिग्रस तालुक्यातील पाणीटंचाईची नेमकी स्थिती काय आहे, यासाठी महिनाभरापूर्वी महसूल राज्यमंत्री आणि या विभागाचे आमदार संजय राठोड यांनी पाणीटंचाई आढावा बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. तसेच मुख्यालयी न राहणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर दुसरी पाणीटांईची बैठक झाली. या बैठकीतही तेच ते प्रश्न पुढे आले. यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्या उपस्थितीत तिसरी पाणीटंचाईची आढावा बैठक घेण्यात आली. त्यांनी सरपंच, उपसरपंच आदींनी मांडलेल्या प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच पाणीटंचाई उद्भवल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे सांगितले. या तिन्ही बैठका पाणीटंचाईची तिच ती गावे आणि त्याच त्या समस्या होत्या. सरपंच आणि सदस्य आपल्या गावातील समस्या मांडून आता हतबल झाले आहे. ना.संजय राठोड यांनी पाणीटंचाईसाठी कितीही पैसा खेचून आणण्याची ग्वाही दिली होती. परंतु अद्यापपर्यंत गावागावातील पाणीटंचाई कायम आहे. लोकप्रतिनिधींचे अधिकारी ऐकत नसल्याचे यावरून दिसून येत आहे. अनेक गावातील सरपंच तर कशाला समस्या मांडायची, असे म्हणत आहे. ्रपाणी टंचाईमुळे हैराण झालेल्या गावकऱ्यांची यातून सुटका कशी होणार, हा मोठा प्रश्न आहे. (शहर प्रतिनिधी) ‘त्या’ आदेशाचे काय झाले ? पाणीटंचाईसंदर्भात झालेल्या बैठकीत ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश महसूल राज्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु बहुतांश गावातील ग्रामसेवक आजही शहरातूनच कारभार पाहात आहे. ग्रामीण जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. परंतु ग्रामसेवकांना त्याचे काही देणेघेणे दिसत नाही. जेथे मंत्र्याच्याच आदेशाला जुमानत नाही तेथे अधिकाऱ्यांनी सांगून ग्रामसेवक मंडळी काय करत असेल, हा प्रश्न आहे.