शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

जंगलात चराईसाठी तीन लाख मेंढ्यांना ‘नो एन्ट्री’

By admin | Updated: July 9, 2014 23:52 IST

वनविभागाने जंगलात मेंढ्यांना चारण्यास मज्जाव केला असून तीन लाख मेंढ्यांना चारायचे कोठे असा प्रश्न मेंढपाळांपुढे पडला आहे. हा प्रश्न घेऊन शेकडो मेंढपाळ बुधवारी येथील मुुख्य वनसंरक्षक कार्यालयावर

मेंढपाळ संकटात : धनगरबांधव वनविभागावर धडकलेयवतमाळ : वनविभागाने जंगलात मेंढ्यांना चारण्यास मज्जाव केला असून तीन लाख मेंढ्यांना चारायचे कोठे असा प्रश्न मेंढपाळांपुढे पडला आहे. हा प्रश्न घेऊन शेकडो मेंढपाळ बुधवारी येथील मुुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडकले. चराईची परवानगी देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. तसेच धनगर समाज महासंघाच्यावीने एक निवेदनही देण्यात आले.यवतमाळ जिल्हयात मेंढपापाल व्यवसाय करणारे दहा हजार कुटुंब आहेत. अनेक पिढ्यांपासून मेंढीपालन करीत आहेत. सध्यस्थितीत तीन लाख मेंढ्यांना गावोगावी फिरून चारा उपलब्ध करून दिला जातो. उन्हाळ्यात धरण आणि शेतीमध्ये चराईसाठी मेंढ्या बसविल्या जातात. मात्र पावसाळा येताच शेतशिवारात चराई करता येत नाही. त्याच वेळी वनविभाग जंगलात मेंढ्यांना शिरू देत नाही. अशा स्थितीत चराईचा मोठा प्रश्न प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मेंढपाळांनी वनविभागाच्या मुुख्य कार्यालयावर धडक दिली. यावेळी मुख्य वनसंरक्षकांच्या वतीने निवेदन स्विकारणाऱ्या उपवनसंरक्षकांना जाब विचारण्यात आला. उपवनसंरक्षकांनी याबाबत १४ जुलैला तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी निवेदन सादर करतांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे पाटील, उपाध्यक्ष रमेश महानुर, सचिव कृष्णराव कांबळे, डॉ. संदीप धवने, श्रीधर मोहड, अविनाश जानकर, गजानन डोमाळे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)