शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक आमदाराला तीन ग्रामपंचायती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2015 00:06 IST

केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आदर्श आमदार ग्राम योजना लागू करण्यात आली आहे.

विकासाचे टार्गेट : आमदार आदर्श ग्राम योजना लागू यवतमाळ : केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आदर्श आमदार ग्राम योजना लागू करण्यात आली आहे. प्रधान सचिव तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालक सचिव व्ही. गिरीराज यांच्या स्वाक्षरीने २० मे रोजी ग्रामविकास खात्याने त्यासंबंधीचे आदेश जारी केले. केंद्र शासनाने ११ आॅक्टोबर २०१४ रोजी सांसद आदर्श ग्राम योजना लागू केली आहे. तोच पॅटर्न राज्यात विधानमंडळ सदस्यांसाठी राबविला जाणार आहे. आदर्श आमदार ग्राम योजना असे याचे नामकरण करण्यात आले. प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघातून जुलै २०१९ पर्यंत तीन ग्रामपंचायती आदर्श म्हणून विकसित कराव्या लागणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी केंद्राच्या धर्तीवरच (सांसद आदर्श ग्राम योजना) केली जाईल. या ग्रामपंचायत निवडीचे निकषही जारी करण्यात आले आहे. लोकसंख्या किमान एक हजार असावी, आमदाराला आपले स्वत:चे (पती/पत्नीचे) गाव निवडता येणार नाही, आमदाराचा मतदारसंघ शहरी व ग्रामीण असेल तर ते ग्रामीण भागातून ग्रामपंचायतीची निवड करतील, एखाद्या आमदाराचा मतदारसंघ संपूर्णपणे शहरी असेल तर ते त्यांच्या सोईने त्याच जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची निवड करू शकणार आहे. मुंबई परिसरातील शहरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार राज्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीची निवड करू शकतील. विधान परिषद सदस्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही जिल्ह्यातून ग्रामपंचायत निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले. या योजनेत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाईल. निवडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आमदार निधीतील कामांसाठी राज्य शासनाकडून जोड निधी देण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाकडे या योजनेच्या समन्वयाचे काम देण्यात आले आहे. (प्रतिनिधी) असे आहेत आदर्श ग्राम योजनेचे उपक्रमग्रामस्थांमध्ये उत्तम आरोग्यासाठी स्वच्छतेच्या सवयी विकसित करणे, बालके व महिलांमध्ये कुपोषणाविषयी जाणीव जागृती निर्माण करणे, व्यसनांच्या दुष्परिणामाबाबत जागृती करून सुदृढ आरोग्याच्या सवयी विकसित करणे, किमान दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, गुन्हेगारी, बेकारी, लिंग भेदभाव दूर करून नागरिकांचे ग्रामविकासात योगदान घेणे, शेती संबंधी सेवांचा दर्जा उंचावणे, पशुसंवर्धन, पाणलोट विकास, लघु ग्रामोद्योग, बँक सुविधा उपलब्ध करून देणे, युवकांना कौशल्यवृद्धी प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, गावात सुसज्ज ग्रामपंचायत भवन, उत्तम रस्ते, पूर्ण वेळ वीज, अन्य सार्वजनिक सेवा सुविधा, इंटरनेट आदी पायाभूत सुविधा विकसित करणे, वृक्ष लागवड, घनकचरा व्यवस्थापन, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन, कंपोष्ट खत, सांडपाण्यावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या शुद्ध पाण्याचा शेतीसाठी फेर वापर करणे आदी उपक्रम या योजनेतून राबविण्याचे शासनाचे आदेश आहे.