शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
5
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
6
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
7
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
8
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
9
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
10
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
11
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
12
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
13
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
14
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
15
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
16
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
17
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
18
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
19
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
20
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा

जिल्ह्यात तिघांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:20 IST

जिल्ह्यात तीन विविध घटनांत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू तर दोन बालिका अत्यवस्थ झाल्याची घटना मंगळवारी घडली. उमरखेड तालुक्यातील बारा येथे पैनगंगा नदीत बुडून एक बालिका, दिग्रस तालुक्यातील अरुणावती धरणात बुडून विद्यार्थी तर पुसद तालुक्याच्या बान्शी येथे विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देदोघी अत्यवस्थ : उमरखेडमध्ये पैनगंगेत बालिका तर दिग्रसमधील अरुणावतीत विद्यार्थ्याचा अंत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात तीन विविध घटनांत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू तर दोन बालिका अत्यवस्थ झाल्याची घटना मंगळवारी घडली. उमरखेड तालुक्यातील बारा येथे पैनगंगा नदीत बुडून एक बालिका, दिग्रस तालुक्यातील अरुणावती धरणात बुडून विद्यार्थी तर पुसद तालुक्याच्या बान्शी येथे विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला.उमरखेड तालुक्यातील बारा येथे पैनगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या रुपाली उकाजी उखळे (१२) या बालिकेचा बुडून मृत्यू झाला. तर कांचन संजय उखळे (११), नेहा पांडुरंग सुरोशे (१६) असे अत्यवस्थ झालेल्या बालिकांची नावे आहे. या दोघींवरही नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. इसापूर धरणाचे पाणी सोडल्याने पैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. मंगळवारी तीन मुली कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. त्यावेळी कपडे धुताना रुपालीचा पाय घसरला आणि ती पाण्यात बुडाली. तिला वाचविण्यासाठी कांचन आणि नेहाही पाण्यात उतरल्या. मात्र पोहता येत नसल्याने त्याही बुडू लागल्या. दरम्यान हा प्रकार नदीवर असलेल्या इतर महिलांच्या लक्षात आला. त्यांनी आरडाओरडा करून नागरिकांना गोळा केले. तिघींनाही पाण्यातून बाहेर काढले. मात्र रुपालीचा मृत्यू झाला तर कांचन आणि नेहा बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना प्रथम उमरखेड व नंतर नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.दिग्रस तालुक्यातील अरुणावती धरणात बुडून तुषार महादेव मात्रे (१८) रा. कारखेडा ता. मानोरा जि. वाशिम याचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी दुपारी उघडकीस आले. तो तालुक्यातील चिंचोली येथे आजोबा जयराम काळे यांच्याकडे शिक्षणासाठी राहत होता. नुकतीच १२ वीची परीक्षा त्याने दिली होती. सोमवारी सायंकाळी ५ वाजता तो मित्रांसोबत अरुणावती धरणावर पोहण्यासाठी गेला. चौघांनी पाण्यात उडी घेतली. मात्र तुषार बाहेरच आला नाही. त्यानंतर त्याचा शोध सुरू झाला. परंतु रात्र झाल्याने शोध लागला नाही. दरम्यान मंगळवारी सकाळी १० वाजता त्याचा मृतदेह धरणातील पाण्यावर तरंगताना आढळून आला. शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तीन घटनांनी जिल्ह्यात खळबळ उडाली.बान्शी येथे शेतकरी विहिरीत पडलापुसद तालुक्यातील बान्शी येथील शेतातील विहिरीत पडून ब्रिजलाल गरीबसिंग आडे (४०) यांचा मृत्यू झाला. ब्रिजलाल नोकरासह आपल्या शेतात कामासाठी गेला होता. विहिरीवर गेला असता त्याचा तोल जाऊन विहिरीत पडला. त्यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. नोकराने आरडाओरडा करून नागरिकांना बोलावून आणले. ब्रिजलालला बाहेर काढले असता तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मागे साप लागल्याने तो विहिरीवर चढला आणि तोल जाऊन पडल्याची चर्चा गावात आहे. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, आई-वडील आहे.