शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

वीज वितरणला तीन दिवसांचा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:17 IST

येत्या तीन दिवसांत वणी शहर व लगतच्या ग्रामीण भागातील वीज समस्या निकाली न काढल्यास वणीकर नागरिकांनी उग्र आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी चालविली आहे. यासंदर्भात सोमवारी वणीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी एकवटले आहेत.

ठळक मुद्देराजकीय पक्ष एकवटले : खंडित वीज पुरवठ्याने जनजीवन प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येत्या तीन दिवसांत वणी शहर व लगतच्या ग्रामीण भागातील वीज समस्या निकाली न काढल्यास वणीकर नागरिकांनी उग्र आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी चालविली आहे. यासंदर्भात सोमवारी वणीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी एकवटले आहेत.गेल्या काही दिवसांपासून वणी शहरातील वीज समस्या जटील बनली आहे. दिवसांतून १५ ते २० वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. वणीचे तापमान लक्षात घेता, वीज पुरवठा खंडित झाला की, नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. विजेवर चालणा रे व्यवसाय ठप्प पडत आहेत. विजेचा दाब अचानक कमी जास्त होत असल्याने घरातील टि.व्ही., फ्रि ज, मिक्सर आदी उपकरणे खराब होत आहेत.यासंदर्भात विचारणा करण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्याला फोन केल्यास, एक तर संबंधित अधिकारी फोन उचलत नाही, किंवा उचलला तर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. वणी विद्युत विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याने वीज समस्यांमध्ये भर पडत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी नांदेपेरा मार्गावरील वीज कार्यालयातील तोडफोडप्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देणाºया शिष्टमंडळात राजाभाऊ पाथ्रडकर, अखिल सातोकर, विवेक मांडवकर, सिद्धीक रंगरेज, राजू तुराणकर, प्रविण खानझोडे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वणी परिसरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडेवणी शहरात मटका, जुगार, कोळसा चोरी यासह मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत. कोळसा खाणीत शस्त्राचा धाक दाखवून कोळसा, भंगार लंपास केल्या जात आहे. यामुळे वणी शहराचा बिहार व्हायला आता वेळ लागणार नाही, असा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सर्व अवैध व्यवसायाला तातडीने आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.