शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

पाणी टंचाई निवारणासाठी पालिकेला हवे तीन कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 21:50 IST

शहरावर भीषण पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. जीवन प्राधीकरणाच्या नियोजनाप्रमाणे बेंबळातील पाणी येण्यास किमान फेब्रुवारीची वाट पाहावी लागणार आहे.

ठळक मुद्देआराखडा सादर : आॅगस्ट महिन्यापासून प्रशासनाकडे पत्रव्यवहार

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शहरावर भीषण पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. जीवन प्राधीकरणाच्या नियोजनाप्रमाणे बेंबळातील पाणी येण्यास किमान फेब्रुवारीची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे नगरपरिषदेने उपलब्ध जलस्रोतांच्या सहाय्याने टंचाई निवारणाचा आराखडा तयार केला आहे. मात्र अंमलबजावणीसाठी नगरपरिषदेकडे बजेट नसल्याने जिल्हा प्रशासनाकडे तीन कोटींची मागणी केली आहे. यासाठी नगराध्यक्षांनी आॅगस्ट महिन्यापासूनच पत्रव्यवहार केला आहे.यवतमाळकरांची तहान भागविण्यासाठी आता बेंबळा प्रकल्पाचाच पर्याय सर्वांना दिसत आहे. त्यासाठी बेंबळातून तातडीने पाणी आणून वितरित करण्याची धडपड सुरू आहे. प्रत्यक्षात या कामात अनेक अडचणी असून निर्धारित कालावधीत हे पाणी येईल की, नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी सर्वसाधारण सभेत शहरातील टंचाई निवारणासाठी पालिकास्तरावर उपाय योजना करण्याचा प्रस्ताव ठेवला. याला सर्वच नगरसेवकांनी मान्यता दिली.यवतमाळचे भौगोलिक क्षेत्र दहा पटीने वाढले असून, येथे पाणी पोहोचविण्यासाठी बजेटही तितकेच लागणार आहे. नगरपरिषदेने या संभाव्य टंचाईसाठी तब्बल तीन कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. ही रक्कम जिल्हाधिकाºयांनी २० नोव्हेंबर रोजी प्राप्त झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठीच्या विशेष अनुदानातून देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. पाच कोटींची रक्कम ही तात्पुरती पाणीपुरवठा योजना यासाठीच देण्यात आली आहे. यातून नगरपरिषद टंचाई आराखड्यावर काम करता येणार आहे. त्यासाठी पालिकेने शहरातील नैसर्गिक जलस्रोतांची साफसफाई, मुबलक पाणीसाठ्यांच्या खाजगी विहिरींचे अधीग्रहण, अशा विहिरींवर सबमर्सीबल पंप बसविणे, पाणी पोहोचविण्यासाठी टॅँकरची व्यवस्था, हातपंपाची दुरूस्ती, आझाद मैदान स्विमिंग पूलच्या विंधन विहिरीचे अधिग्रहण प्रस्ताव, टंचाई काळात शहरातील स्विमिंग पूल बंद ठेवणे या उपाय योजना आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.टंचाई काळात बेंबळाचा एकच पर्याय डोळ््यासमोर ठेवून चालणार नाही. शहर व परिसरातील नैर्सगिक जलस्रोतांचाही पर्यायी वापर करणे आवश्यक आहे. पावसाची स्थिती पाहता आॅगस्ट महिन्यापासूनच टंचाई उपाय योजनांच्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत टंचाईसाठी अनुदानाची मागणी केली होती.- कांचन चौधरी,नगराध्यक्ष, यवतमाळ