शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाई निवारणासाठी पालिकेला हवे तीन कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 21:50 IST

शहरावर भीषण पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. जीवन प्राधीकरणाच्या नियोजनाप्रमाणे बेंबळातील पाणी येण्यास किमान फेब्रुवारीची वाट पाहावी लागणार आहे.

ठळक मुद्देआराखडा सादर : आॅगस्ट महिन्यापासून प्रशासनाकडे पत्रव्यवहार

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शहरावर भीषण पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. जीवन प्राधीकरणाच्या नियोजनाप्रमाणे बेंबळातील पाणी येण्यास किमान फेब्रुवारीची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे नगरपरिषदेने उपलब्ध जलस्रोतांच्या सहाय्याने टंचाई निवारणाचा आराखडा तयार केला आहे. मात्र अंमलबजावणीसाठी नगरपरिषदेकडे बजेट नसल्याने जिल्हा प्रशासनाकडे तीन कोटींची मागणी केली आहे. यासाठी नगराध्यक्षांनी आॅगस्ट महिन्यापासूनच पत्रव्यवहार केला आहे.यवतमाळकरांची तहान भागविण्यासाठी आता बेंबळा प्रकल्पाचाच पर्याय सर्वांना दिसत आहे. त्यासाठी बेंबळातून तातडीने पाणी आणून वितरित करण्याची धडपड सुरू आहे. प्रत्यक्षात या कामात अनेक अडचणी असून निर्धारित कालावधीत हे पाणी येईल की, नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी सर्वसाधारण सभेत शहरातील टंचाई निवारणासाठी पालिकास्तरावर उपाय योजना करण्याचा प्रस्ताव ठेवला. याला सर्वच नगरसेवकांनी मान्यता दिली.यवतमाळचे भौगोलिक क्षेत्र दहा पटीने वाढले असून, येथे पाणी पोहोचविण्यासाठी बजेटही तितकेच लागणार आहे. नगरपरिषदेने या संभाव्य टंचाईसाठी तब्बल तीन कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. ही रक्कम जिल्हाधिकाºयांनी २० नोव्हेंबर रोजी प्राप्त झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठीच्या विशेष अनुदानातून देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. पाच कोटींची रक्कम ही तात्पुरती पाणीपुरवठा योजना यासाठीच देण्यात आली आहे. यातून नगरपरिषद टंचाई आराखड्यावर काम करता येणार आहे. त्यासाठी पालिकेने शहरातील नैसर्गिक जलस्रोतांची साफसफाई, मुबलक पाणीसाठ्यांच्या खाजगी विहिरींचे अधीग्रहण, अशा विहिरींवर सबमर्सीबल पंप बसविणे, पाणी पोहोचविण्यासाठी टॅँकरची व्यवस्था, हातपंपाची दुरूस्ती, आझाद मैदान स्विमिंग पूलच्या विंधन विहिरीचे अधिग्रहण प्रस्ताव, टंचाई काळात शहरातील स्विमिंग पूल बंद ठेवणे या उपाय योजना आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.टंचाई काळात बेंबळाचा एकच पर्याय डोळ््यासमोर ठेवून चालणार नाही. शहर व परिसरातील नैर्सगिक जलस्रोतांचाही पर्यायी वापर करणे आवश्यक आहे. पावसाची स्थिती पाहता आॅगस्ट महिन्यापासूनच टंचाई उपाय योजनांच्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत टंचाईसाठी अनुदानाची मागणी केली होती.- कांचन चौधरी,नगराध्यक्ष, यवतमाळ