शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

तीन कंपन्यांनी ‘आधार’ सोडला

By admin | Updated: November 8, 2014 22:44 IST

जिल्ह्याची जबाबदारी सोपविलेल्या तीन कंपन्यांनी आधार कार्ड नोंदणीचे काम थांबविले आहे. परिणामी सुमारे सात लाख नागरिक नोंदणीपासून वंचित आहेत, तर दुसरीकडे दोन हजार गावांसाठी केवळ ५७ केंद्र आहेत.

नोंदणी संथगतीने : दोन हजार गावांसाठी ५७ केंद्रयवतमाळ : जिल्ह्याची जबाबदारी सोपविलेल्या तीन कंपन्यांनी आधार कार्ड नोंदणीचे काम थांबविले आहे. परिणामी सुमारे सात लाख नागरिक नोंदणीपासून वंचित आहेत, तर दुसरीकडे दोन हजार गावांसाठी केवळ ५७ केंद्र आहेत. त्यामुळे अवघ्या वर्षभरात नोंदणीची मोहीम पूर्ण करण्याचे शासनाचे आश्वासन हवेत विरले आहे.जिल्ह्यातील २७ लाख ७२ हजार ३४८ नागरिक आधारकार्ड काढण्यासाठी पात्र आहेत. मात्र नोंदणीसाठी यंत्रणाच नसल्याने नागरिकांची कोंडी झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आधारकार्ड काढण्याची जबाबदारी तीन कंपन्यांवर सोपविण्यात आली होती. यामध्ये वक्रांगी, नेटलिंक आणि फिनोटेक या कंपन्यांचा समावेश होता. या तीनही कंपन्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता नोंदणीचे काम बंद केले. १३ जानेवारी २०१४ पासून या कंपन्यांनी जिल्हा प्रशासनाशी कुठलाही संपर्क साधला नाही. या कंपनीच्या कामकाजाचा अहवाल जिल्हा प्रशासनाने वरिष्ठांकडे पाठविला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आधारकार्ड नोंदणीची संपूर्ण जबाबदारी सीएमएस कंपनीकडे देण्यात आली आहे. या कंपनीच्या मदतीने ई-महासेवाकेंद्र चालविले जातात. या ई-महासेवा केंद्रांकडे आधारकार्ड काढण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ८० केंद्राकडे हे काम सोपविण्यात आले. यातील ५७ केंद्रांवर सध्याच्यास्थितीत आधारकार्ड काढले जातात. दोन हजार ४० महसुली गावांसाठी ५७ आधारकार्ड केंद्र अपुरे आहे. त्यामुळे या केंद्रावर एकच गर्दी उडत आहे तर, ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना या केंद्राची माहितीच नाही. यवतमाळ तालुक्यात ८ केंद्र, आर्णी तालुक्यात ७ केंद्र, घाटंजी, राळेगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस आणि नेर तालुक्यात प्रत्येकी १ केंद्र सुरू करण्यात आले आहे. पुसद तालुक्यात १२, महागाव तालुक्यात ३, उमरखेड तालुक्यात ८ आणि केळापूर तालुक्यात ५ केंद्र उघडण्यात आले आहेत. मारेगाव तालुक्यात २ तर वणी तालुक्यात ६ केंद्र उघडण्यात आले आहे. (शहर वार्ताहर)