शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

१०० मीटरमध्ये तीन बंधारे

By admin | Updated: July 22, 2014 00:05 IST

एखाद्या वस्तूची उपयोगिता किती यानुसार त्याचे निर्माण अपेक्षित असते. तसे नियोजनही केले जाते. मात्र कृषी विभागाने यावर कळस केला आहे. लगतच्या ठाणेगाव येथील छोट्याशा नाल्यावर

ठाणेगाव : कृषी विभागाच्या धोरणामुळे शासनाच्या निधीला चुनाअब्दुल मतीन - पारवाएखाद्या वस्तूची उपयोगिता किती यानुसार त्याचे निर्माण अपेक्षित असते. तसे नियोजनही केले जाते. मात्र कृषी विभागाने यावर कळस केला आहे. लगतच्या ठाणेगाव येथील छोट्याशा नाल्यावर केवळ १०० मीटरमध्ये तीन सिमेंट बंधारे बांधले. या विभागाने सदर गावावर एवढी ‘उदारता’ दाखविण्यामागे काय कारण असावे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ठाणेगाव या छोट्याशा गावातून दोन नाले वाहतात. यापूर्वी एका नाल्यावर दोन सिमेंट बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यांचा उपयोग किती होतो याची माहिती या विभागाला नाही. एवढ्यावरच हा विभाग थांबला नाही तर दुसऱ्या एका नाल्यावर केवळ १०० मीटर अंतरात तीन बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. जंगलाला लागून वाहणाऱ्या या नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचा उपयोग किती शेतकऱ्यांना होईल याचा कुठलाही हिशेब या विभागाकडे नाही. मात्र बंधारे बांधून केवळ शासनाच्या निधीला चुना लावला गेला. या विभागाने बंधारे बांधले हे खरे मात्र त्याचा दर्जा तपासण्याची तसदी कुणीही घेतली नाही. या कामासाठी सिमेंटचा वापर अत्यल्प करण्यात आला. रेतीही नाल्याची उपयोगात आणली. बांधकाम झाल्यानंतर पाण्याचा आवश्यक तेवढा वापर झालेला नाही. परिणामी या बंधाऱ्याच्या आयुष्याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. शासनाचे हजारो रुपये या कामावर खर्च करण्यात आले. त्याची उपयोगिता अद्याप स्पष्ट झाली नसली तरी निकृष्ट काम झाले, हे मात्र अनेक बाबींवरून दिसून येते. त्यामुळे या बंधाऱ्याच्या निर्मितीचा उद्देश नेमका काय असावा, हा प्रश्न कायम आहे. त्यादृष्टीने संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी चौकशी केल्यास अनेक बाबी पुढे येऊ शकतात. या दृष्टीने परिसरातील लोकप्रतिनिधींनीही हा प्रश्न लावून धरण्याची गरज आहे.