शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

१०० मीटरमध्ये तीन बंधारे

By admin | Updated: July 22, 2014 00:05 IST

एखाद्या वस्तूची उपयोगिता किती यानुसार त्याचे निर्माण अपेक्षित असते. तसे नियोजनही केले जाते. मात्र कृषी विभागाने यावर कळस केला आहे. लगतच्या ठाणेगाव येथील छोट्याशा नाल्यावर

ठाणेगाव : कृषी विभागाच्या धोरणामुळे शासनाच्या निधीला चुनाअब्दुल मतीन - पारवाएखाद्या वस्तूची उपयोगिता किती यानुसार त्याचे निर्माण अपेक्षित असते. तसे नियोजनही केले जाते. मात्र कृषी विभागाने यावर कळस केला आहे. लगतच्या ठाणेगाव येथील छोट्याशा नाल्यावर केवळ १०० मीटरमध्ये तीन सिमेंट बंधारे बांधले. या विभागाने सदर गावावर एवढी ‘उदारता’ दाखविण्यामागे काय कारण असावे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ठाणेगाव या छोट्याशा गावातून दोन नाले वाहतात. यापूर्वी एका नाल्यावर दोन सिमेंट बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यांचा उपयोग किती होतो याची माहिती या विभागाला नाही. एवढ्यावरच हा विभाग थांबला नाही तर दुसऱ्या एका नाल्यावर केवळ १०० मीटर अंतरात तीन बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. जंगलाला लागून वाहणाऱ्या या नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचा उपयोग किती शेतकऱ्यांना होईल याचा कुठलाही हिशेब या विभागाकडे नाही. मात्र बंधारे बांधून केवळ शासनाच्या निधीला चुना लावला गेला. या विभागाने बंधारे बांधले हे खरे मात्र त्याचा दर्जा तपासण्याची तसदी कुणीही घेतली नाही. या कामासाठी सिमेंटचा वापर अत्यल्प करण्यात आला. रेतीही नाल्याची उपयोगात आणली. बांधकाम झाल्यानंतर पाण्याचा आवश्यक तेवढा वापर झालेला नाही. परिणामी या बंधाऱ्याच्या आयुष्याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. शासनाचे हजारो रुपये या कामावर खर्च करण्यात आले. त्याची उपयोगिता अद्याप स्पष्ट झाली नसली तरी निकृष्ट काम झाले, हे मात्र अनेक बाबींवरून दिसून येते. त्यामुळे या बंधाऱ्याच्या निर्मितीचा उद्देश नेमका काय असावा, हा प्रश्न कायम आहे. त्यादृष्टीने संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी चौकशी केल्यास अनेक बाबी पुढे येऊ शकतात. या दृष्टीने परिसरातील लोकप्रतिनिधींनीही हा प्रश्न लावून धरण्याची गरज आहे.