शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

सीमावर्ती तीन गावांचा तिढा अद्याप कायमच

By admin | Updated: May 10, 2015 01:57 IST

मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील उमरघाट, पेंढरी आणि आंबेझरी या तीन गावांचा तिढा अद्याप कायमच आहे.

मारेगाव : मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील उमरघाट, पेंढरी आणि आंबेझरी या तीन गावांचा तिढा अद्याप कायमच आहे. या तीनही गावांचा विकास रखडला आहे. पंचायत समिती आणि तालुका या वादात ही गावे भरडली जात आहे.वणी तालुक्याच्या विभाजनानंतर मारेगाव तालुका अस्तित्वात आला. कालांतराने मारेगाव तालुक्याचे विभाजन होऊन झरीजामणी तालुका निर्माण झाला. झरी, मारेगाव येथे स्वतंत्र पंचायत समितीही अस्तित्वात आली. मात्र ही तीन गावे तालुका आणि पंचायत समितीच्या कलहात भरडली जात आहे. मारेगाव तालुक्याचे १९९२ मध्ये विभाजन होऊन झरीजामणी तालुका निर्माण झाला. या विभाजनात उमरघाट व पेंढरी ही दोन गावे मारेगाव तालुक्यात, तर आंबेझरी हे गाव झरी तालुक्यात गेले.प्रथम मारेगाव व झरी या दोन्ही तालुक्यांसाठी मारेगाव ही एकच पंचायत समिती होती. एकच पंचायत समिती असल्याने सुरूवातीला या तीनही गावांची कोणतीही अडचण नव्हती. तथापि पाच वर्षांनंतर मारेगाव पंचायत समितीचे विभाजन होऊन झरी पंचायत समिती निर्माण झाली अन् या तीन गावांची रडकथा सुरू झाली. त्यात उमरघाट, पेंढरी आणि आंबेझरी या तीन गावांची कोंडी झाली. स्वतंत्र पंचायत समितीनंतर त्यांच्या विकासात खोडा निर्माण झाला.पंचायत समिती विभाजनात मारेगाव तालुक्यातील उमरघाट आणि पेंढरी गावांना झरी पंचायत समितीमधील सुर्ला आणि सुसरी ग्रामपंचायतीमध्ये ठेवण्यात आले, तर झरीजामणी तालुक्यातील आंबेझरी गावाला मारेगाव पंचायत समितीमधील सगनापूर ग्रामपंचायतीला जोडण्यात आले. त्यामुळे या गावांचा विकासच रखडला. ग्रामस्थांना विविध त्रास होऊ लागला. दोन तालुके आणि दोन पंचायत समितीमुळे ही गावे चांगलीच संकटात सापडली. प्रत्येक निवडणुकीत पक्षीय पदाधिकारी, उमेदवार या गावांत जातात. ग्रामस्थांना तिढा सोडविण्याची ग्वाही देतात. मात्र निवडणुकीनंतर त्यांना या गावांचा विसर पडतो. लोकप्रतिनिधींच्या या उदासीन वृत्तीमुळे आता ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळत आहे़ तेथील ग्रामस्थांना कोणत्या तहसीलकडे आणि कोणत्या पंचायत समितीकडे दाद मागावी, असा प्रश्न पडला आहे. या गावांसाठी दरवर्षी विकास निधी येतो. तो पंचायत समितीत जमा होतो. मात्र दोन पंचायत समित्या असल्याने दोनही पंचायत समित्यांना विकास निधी दरवर्षी परस्परांना वळता करावा लागतो़ त्याला विलंब होतो. संबंधित ग्रामपंचायतीही सापत्न वागणूक देतात. त्यामुळे या तीन गावांतील विकास रखडला. (तालुका प्रतिनिधी)