शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

सीमावर्ती तीन गावांचा तिढा अद्याप कायमच

By admin | Updated: May 10, 2015 01:57 IST

मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील उमरघाट, पेंढरी आणि आंबेझरी या तीन गावांचा तिढा अद्याप कायमच आहे.

मारेगाव : मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील उमरघाट, पेंढरी आणि आंबेझरी या तीन गावांचा तिढा अद्याप कायमच आहे. या तीनही गावांचा विकास रखडला आहे. पंचायत समिती आणि तालुका या वादात ही गावे भरडली जात आहे.वणी तालुक्याच्या विभाजनानंतर मारेगाव तालुका अस्तित्वात आला. कालांतराने मारेगाव तालुक्याचे विभाजन होऊन झरीजामणी तालुका निर्माण झाला. झरी, मारेगाव येथे स्वतंत्र पंचायत समितीही अस्तित्वात आली. मात्र ही तीन गावे तालुका आणि पंचायत समितीच्या कलहात भरडली जात आहे. मारेगाव तालुक्याचे १९९२ मध्ये विभाजन होऊन झरीजामणी तालुका निर्माण झाला. या विभाजनात उमरघाट व पेंढरी ही दोन गावे मारेगाव तालुक्यात, तर आंबेझरी हे गाव झरी तालुक्यात गेले.प्रथम मारेगाव व झरी या दोन्ही तालुक्यांसाठी मारेगाव ही एकच पंचायत समिती होती. एकच पंचायत समिती असल्याने सुरूवातीला या तीनही गावांची कोणतीही अडचण नव्हती. तथापि पाच वर्षांनंतर मारेगाव पंचायत समितीचे विभाजन होऊन झरी पंचायत समिती निर्माण झाली अन् या तीन गावांची रडकथा सुरू झाली. त्यात उमरघाट, पेंढरी आणि आंबेझरी या तीन गावांची कोंडी झाली. स्वतंत्र पंचायत समितीनंतर त्यांच्या विकासात खोडा निर्माण झाला.पंचायत समिती विभाजनात मारेगाव तालुक्यातील उमरघाट आणि पेंढरी गावांना झरी पंचायत समितीमधील सुर्ला आणि सुसरी ग्रामपंचायतीमध्ये ठेवण्यात आले, तर झरीजामणी तालुक्यातील आंबेझरी गावाला मारेगाव पंचायत समितीमधील सगनापूर ग्रामपंचायतीला जोडण्यात आले. त्यामुळे या गावांचा विकासच रखडला. ग्रामस्थांना विविध त्रास होऊ लागला. दोन तालुके आणि दोन पंचायत समितीमुळे ही गावे चांगलीच संकटात सापडली. प्रत्येक निवडणुकीत पक्षीय पदाधिकारी, उमेदवार या गावांत जातात. ग्रामस्थांना तिढा सोडविण्याची ग्वाही देतात. मात्र निवडणुकीनंतर त्यांना या गावांचा विसर पडतो. लोकप्रतिनिधींच्या या उदासीन वृत्तीमुळे आता ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळत आहे़ तेथील ग्रामस्थांना कोणत्या तहसीलकडे आणि कोणत्या पंचायत समितीकडे दाद मागावी, असा प्रश्न पडला आहे. या गावांसाठी दरवर्षी विकास निधी येतो. तो पंचायत समितीत जमा होतो. मात्र दोन पंचायत समित्या असल्याने दोनही पंचायत समित्यांना विकास निधी दरवर्षी परस्परांना वळता करावा लागतो़ त्याला विलंब होतो. संबंधित ग्रामपंचायतीही सापत्न वागणूक देतात. त्यामुळे या तीन गावांतील विकास रखडला. (तालुका प्रतिनिधी)