शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

इनाम जमीन हस्तांतरण कारवाई थंडबस्त्यात

By admin | Updated: November 30, 2015 02:24 IST

इनाम जमीन हस्तांतरण प्रकरण मागील पाच वर्षांपासून थंडबस्त्यात पडले आहे. इनाम जमिनीचे बऱ्याच मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हस्तांतरण झाले असल्याचे स्पष्ट झाले ...

पाच वर्षे लोटली : माहूर येथील दत्तात्रेय शिखर संस्थानला प्रतीक्षायवतमाळ : इनाम जमीन हस्तांतरण प्रकरण मागील पाच वर्षांपासून थंडबस्त्यात पडले आहे. इनाम जमिनीचे बऱ्याच मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हस्तांतरण झाले असल्याचे स्पष्ट झाले असतानाही प्रत्यक्ष कारवाई केली जात नाही. नांदेड जिल्ह्याच्या माहूर येथील श्री दत्तात्रेय संस्थान शिखरला जमीन नावे करून देण्याची प्रतीक्षा आहे. इनाम जमिनीचे हस्तांतरण शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय होत नाही. तसेच देवस्थान इनाम जमिनीला कुळ कायदा लागू नाही. त्यामुळे देवस्थान इनाम जमिनीला कुळ लावून जमीन कुळाला देता येत नाही, अशा प्रकारे देवस्थान इनाम जमिनीचे बेकायदेशीररीत्या हस्तांतरण झाले असल्यास ते रद्द करून देवस्थानच्या नावे पूर्ववत करण्याचे आदेश राज्याच्या महसूल व वनविभाग मंत्रालयाने महसूल प्रशासनाला दिले होते. तसे परिपत्रक ३० जून २०१० रोजी जारी करण्यात आले. या पत्रकानुसार यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, महागाव, उमरखेड, वणी, दारव्हा तहसील अंतर्गत देवस्थान इनाम जमिनीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. मात्र माहूर येथील श्री दत्तात्रय संस्थानच्या यवतमाळ जिल्ह्यातील इनाम जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण झाले असल्याबाबत आणि प्रत्येक तहसील कार्यालयांतर्गत शासनास सादर केलेला अहवाल पूर्णत: चुकीचा असल्याची बाब आर्णी येथील गोपाल भारती यांनी अमरावती विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती. यावर आयुक्तांनी चौकशी समिती गठित करून कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या आदेशानुसार यवतमाळ, दारव्हा, उमरखेड, केळापूर, वणी उपविभाग स्तरावर चौकशी समिती गठित करण्यात आली. उपविभागीय अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष होते. या समितीने देवस्थान इनाम जमिनीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. यात श्री दत्तात्रेय संस्थान शिखर या देवस्थानच्या यवतमाळ जिल्ह्यातील इनाम जमिनीचे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याचे स्पष्ट झाले. यावरून पाच वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अजूनही महसूल प्रशासनाने इनाम जमीन शिखर संस्थानच्या नावाने केलेली नाही. दरम्यान, गोपाल भारती यांनी मंत्रालय सचिव आणि अमरावती विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. सदर प्रकरण विहित कालावधीत निकाली निघाले नसल्याने विलंबास जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)