शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

इनाम जमीन हस्तांतरण कारवाई थंडबस्त्यात

By admin | Updated: November 30, 2015 02:24 IST

इनाम जमीन हस्तांतरण प्रकरण मागील पाच वर्षांपासून थंडबस्त्यात पडले आहे. इनाम जमिनीचे बऱ्याच मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हस्तांतरण झाले असल्याचे स्पष्ट झाले ...

पाच वर्षे लोटली : माहूर येथील दत्तात्रेय शिखर संस्थानला प्रतीक्षायवतमाळ : इनाम जमीन हस्तांतरण प्रकरण मागील पाच वर्षांपासून थंडबस्त्यात पडले आहे. इनाम जमिनीचे बऱ्याच मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हस्तांतरण झाले असल्याचे स्पष्ट झाले असतानाही प्रत्यक्ष कारवाई केली जात नाही. नांदेड जिल्ह्याच्या माहूर येथील श्री दत्तात्रेय संस्थान शिखरला जमीन नावे करून देण्याची प्रतीक्षा आहे. इनाम जमिनीचे हस्तांतरण शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय होत नाही. तसेच देवस्थान इनाम जमिनीला कुळ कायदा लागू नाही. त्यामुळे देवस्थान इनाम जमिनीला कुळ लावून जमीन कुळाला देता येत नाही, अशा प्रकारे देवस्थान इनाम जमिनीचे बेकायदेशीररीत्या हस्तांतरण झाले असल्यास ते रद्द करून देवस्थानच्या नावे पूर्ववत करण्याचे आदेश राज्याच्या महसूल व वनविभाग मंत्रालयाने महसूल प्रशासनाला दिले होते. तसे परिपत्रक ३० जून २०१० रोजी जारी करण्यात आले. या पत्रकानुसार यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, महागाव, उमरखेड, वणी, दारव्हा तहसील अंतर्गत देवस्थान इनाम जमिनीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. मात्र माहूर येथील श्री दत्तात्रय संस्थानच्या यवतमाळ जिल्ह्यातील इनाम जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण झाले असल्याबाबत आणि प्रत्येक तहसील कार्यालयांतर्गत शासनास सादर केलेला अहवाल पूर्णत: चुकीचा असल्याची बाब आर्णी येथील गोपाल भारती यांनी अमरावती विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती. यावर आयुक्तांनी चौकशी समिती गठित करून कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या आदेशानुसार यवतमाळ, दारव्हा, उमरखेड, केळापूर, वणी उपविभाग स्तरावर चौकशी समिती गठित करण्यात आली. उपविभागीय अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष होते. या समितीने देवस्थान इनाम जमिनीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. यात श्री दत्तात्रेय संस्थान शिखर या देवस्थानच्या यवतमाळ जिल्ह्यातील इनाम जमिनीचे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याचे स्पष्ट झाले. यावरून पाच वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अजूनही महसूल प्रशासनाने इनाम जमीन शिखर संस्थानच्या नावाने केलेली नाही. दरम्यान, गोपाल भारती यांनी मंत्रालय सचिव आणि अमरावती विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. सदर प्रकरण विहित कालावधीत निकाली निघाले नसल्याने विलंबास जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)