शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

जड वाहतुकीने जीव धोक्यात

By admin | Updated: July 26, 2015 02:26 IST

शहरात वाहतुकीचे तीन-तेरा वाजले असून वाढत्या अतिक्रमणाने मोठे रस्तेही गल्लीचे रुप घेत आहेत.

नागरिक त्रस्त : वाहतूक पोलीस शहराबाहेर वसुलीत व्यस्तपुसद : शहरात वाहतुकीचे तीन-तेरा वाजले असून वाढत्या अतिक्रमणाने मोठे रस्तेही गल्लीचे रुप घेत आहेत. त्यातच शहरातून जड वाहतूक बेलगाम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून जावे लागते. शहरात मागील काही दिवसात अपघातांमध्ये वाढ झाली असून वाहतूक पोलीस मात्र शहरात दिसतच नाही. शहरातील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या बसस्थानकासमोरील रस्त्यावर जडवाहनांची अहोरात्र वर्दळ असते. या मार्गानेच शहरातील बहुतेक महाविद्यालयातील विद्यार्थी ये-जा करीत असतात. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून या रस्त्याने जड वाहने नेले जातात. या जड वाहनांना कोणत्याच प्रकारे निर्बंध लावले जात नाही. त्यामुळे या मार्गावर नागरिक व विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना नेहमीच करावा लागतो. या रस्त्याच्या कडेला दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्याच प्रमाणे पाण्याच्या टाकीजवळ, बीएसएनएल आॅफीसकडे जाणाऱ्या मार्गावर छोटे-मोठे टॅक्सी तसेच आॅटोरिक्षा लावलेली असतात. काळी-पिवळ्या गाड्या तर सर्रास रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जातात. परिणामी नागरिकांना आपले वाहन काढताना कमालीची कसरत करावी लागते. या रस्त्यावर काळी-पिवळी, आॅटारिक्षा चालक आपले हक्क दाखवीत वाटेल तिथे आपली वाहने उभी करीत आहेत. बसस्थानकात बस वळविताना चालकाला या वाहनांचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावरील वाहतूक फक्त रस्ता सुरक्षा अभियान सुरू असतानाच सुरळीत करण्यात येते. मात्र त्यानंतरचा पूर्णकाळ या वाहन चालकांसाठी मोकळा असतो. वाहन चालकांना वाहतुकीचे नियम कळावे यासाठी वाहतूक विभागाकडून नियमांचे सूचनांचे फलक लावणे आवश्यक आहे. मात्र ते कुठेही दिसत नाही. परिणाम वाहतुकीचा त्रास सामान्य नागरिकांना भोगावा लागतो. (तालुका प्रतिनिधी)