शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

जिल्ह्यातील ३२७ गावांवर भीषण पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: March 8, 2017 00:09 IST

यावर्षी जिल्ह्यातील ३२७ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

यवतमाळ : यावर्षी जिल्ह्यातील ३२७ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दोन कोटी ८८ लाख रूपयांच्या कृती आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषदेचा पाणीटंचाई विभाग, नैसर्गिक आपत्ती विभाग, आणि भूजल सर्वेक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सादर झालेल्या अहवालास जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंंह यांनी मंजुरी दिली आहे. ३२७ गावामध्ये पाणीटंचाई भीषण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दोन कोटी ८८ लाख रूपये लागणार आहेत. यामध्ये प्रगतीपथावरील योजना पूर्ण करणे, विंधन विहिरी अधिग्रहित करणे, तात्पुरती पूरक नळ योजना पूर्ण करणे, नळ योजनांची विशेष दुरूस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती करणे, खासगी विहिरी अधिग्रहित करणे, विहीर खोल करणे, गाळ काढणे, वुडक्या झिऱ्या घेणे, टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे आदींचा यामध्ये समावेश आहे. जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत ७० गावांमधील उपाययोजना करण्यात येणार आहे. याकरिता एक कोटी ९६ लाख रूपये लागणार आहेत. एप्रिल ते जून या कालावधीत २५७ गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडावर उपाय योजना होणार आहेत. २३७ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे. या कामाकरिता ७३ लाख ५६ हजार रूपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. २५ गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडावर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याकरिता १८ लाख ३० हजारांचा खर्च होणार आहे. (शहर वार्ताहर) २६ गावांमध्ये बैलगाडीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या कामावर ९० हजार रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या कालावधीत १४ तात्पुरत्या पूरक नळयोजना दुरूस्त करण्यात येणार आहे. या कामावर ४६ लाख ५० हजार रूपयांचा खर्च होणार आहे. ५२ गावामधील ५२ विशेष नळ योजनेच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामावर सर्वाधिक एक कोटी ४७ लाख ८० हजारांचा खर्च करण्यात येणार आहे.