शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३२७ गावांवर भीषण पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: March 8, 2017 00:09 IST

यावर्षी जिल्ह्यातील ३२७ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

यवतमाळ : यावर्षी जिल्ह्यातील ३२७ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दोन कोटी ८८ लाख रूपयांच्या कृती आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषदेचा पाणीटंचाई विभाग, नैसर्गिक आपत्ती विभाग, आणि भूजल सर्वेक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सादर झालेल्या अहवालास जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंंह यांनी मंजुरी दिली आहे. ३२७ गावामध्ये पाणीटंचाई भीषण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दोन कोटी ८८ लाख रूपये लागणार आहेत. यामध्ये प्रगतीपथावरील योजना पूर्ण करणे, विंधन विहिरी अधिग्रहित करणे, तात्पुरती पूरक नळ योजना पूर्ण करणे, नळ योजनांची विशेष दुरूस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती करणे, खासगी विहिरी अधिग्रहित करणे, विहीर खोल करणे, गाळ काढणे, वुडक्या झिऱ्या घेणे, टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे आदींचा यामध्ये समावेश आहे. जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत ७० गावांमधील उपाययोजना करण्यात येणार आहे. याकरिता एक कोटी ९६ लाख रूपये लागणार आहेत. एप्रिल ते जून या कालावधीत २५७ गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडावर उपाय योजना होणार आहेत. २३७ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे. या कामाकरिता ७३ लाख ५६ हजार रूपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. २५ गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडावर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याकरिता १८ लाख ३० हजारांचा खर्च होणार आहे. (शहर वार्ताहर) २६ गावांमध्ये बैलगाडीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या कामावर ९० हजार रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या कालावधीत १४ तात्पुरत्या पूरक नळयोजना दुरूस्त करण्यात येणार आहे. या कामावर ४६ लाख ५० हजार रूपयांचा खर्च होणार आहे. ५२ गावामधील ५२ विशेष नळ योजनेच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामावर सर्वाधिक एक कोटी ४७ लाख ८० हजारांचा खर्च करण्यात येणार आहे.