शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

पावसाळ्यातही तरोडा तहानलेले

By admin | Updated: July 11, 2014 00:25 IST

आर्णी तालुक्यातील तरोडा येथील नागरिकांनी पाण्याच्या मागणीसाठी आज नागपूर-बोरी-तुळजापूर या राज्य मार्गावर दोन तास रास्ता रोको केला. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब

हिवरी/जवळा : आर्णी तालुक्यातील तरोडा येथील नागरिकांनी पाण्याच्या मागणीसाठी आज नागपूर-बोरी-तुळजापूर या राज्य मार्गावर दोन तास रास्ता रोको केला. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तरोडावासी मागील काही महिन्यांपासून पाणीटंचाईने त्रस्त आहेत. अखेर त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे या आंदोलनाचे नेतृत्व सर्व महिलांनी केले. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता मानकर, शाखा अभियंता सुनील राठोड, तहसीलदार गालगुंडे, गटविकास अधिकारी चंद्रशेखर बंड, ठाणेदार सर्जेराव गायकवाड, शाखा अभियंता कंचलवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. सभापती राजू विरखेडे व जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रशेखर बंड यांनी भगवान बुटके यांच्या शेतातील बोअरवरून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तरोडा येथे सध्या संपूर्ण गावासाठी एकच हातपंप आहे. सर्व नागरिकांना याच हातपंपावरून पाणी भरावे लागते. ग्रामस्थांची संख्या लक्षात घेता आणि पाण्याची पातळी पाहता या हातपंपाचे पाणीसुद्धा गावकऱ्यांना पुरेनासे झाले आहे. उल्लेखनिय म्हणजे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत दोन वर्षांपूर्वी ३९ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र या कामात गैरप्रकार झाल्याने ही योजना बंद पडली आणि नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. या योजनेतील गैरप्रकाराची चौकशी करून सबंधितांना शिक्षा करावी आणि गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी ही योजना पुन्हा लागू करावी, या मागणीसाठी तरोडा येथील शेकडो महिला बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या होत्या. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपली समस्या त्यांच्यासमोर मांडली. परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे ग्रामस्थांना गुरुवारी पुन्हा रास्ता रोको आंदोलन करावे लागते. या आंदोलनात गावातील महिला व मुलांचा सहभाग लक्षणिय होता. शासनाने तरोडावासीयांच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांचा रोष वाढला आहे. (वार्ताहर)