शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही तरोडा तहानलेले

By admin | Updated: July 11, 2014 00:25 IST

आर्णी तालुक्यातील तरोडा येथील नागरिकांनी पाण्याच्या मागणीसाठी आज नागपूर-बोरी-तुळजापूर या राज्य मार्गावर दोन तास रास्ता रोको केला. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब

हिवरी/जवळा : आर्णी तालुक्यातील तरोडा येथील नागरिकांनी पाण्याच्या मागणीसाठी आज नागपूर-बोरी-तुळजापूर या राज्य मार्गावर दोन तास रास्ता रोको केला. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तरोडावासी मागील काही महिन्यांपासून पाणीटंचाईने त्रस्त आहेत. अखेर त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे या आंदोलनाचे नेतृत्व सर्व महिलांनी केले. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता मानकर, शाखा अभियंता सुनील राठोड, तहसीलदार गालगुंडे, गटविकास अधिकारी चंद्रशेखर बंड, ठाणेदार सर्जेराव गायकवाड, शाखा अभियंता कंचलवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. सभापती राजू विरखेडे व जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रशेखर बंड यांनी भगवान बुटके यांच्या शेतातील बोअरवरून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तरोडा येथे सध्या संपूर्ण गावासाठी एकच हातपंप आहे. सर्व नागरिकांना याच हातपंपावरून पाणी भरावे लागते. ग्रामस्थांची संख्या लक्षात घेता आणि पाण्याची पातळी पाहता या हातपंपाचे पाणीसुद्धा गावकऱ्यांना पुरेनासे झाले आहे. उल्लेखनिय म्हणजे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत दोन वर्षांपूर्वी ३९ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र या कामात गैरप्रकार झाल्याने ही योजना बंद पडली आणि नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. या योजनेतील गैरप्रकाराची चौकशी करून सबंधितांना शिक्षा करावी आणि गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी ही योजना पुन्हा लागू करावी, या मागणीसाठी तरोडा येथील शेकडो महिला बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या होत्या. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपली समस्या त्यांच्यासमोर मांडली. परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे ग्रामस्थांना गुरुवारी पुन्हा रास्ता रोको आंदोलन करावे लागते. या आंदोलनात गावातील महिला व मुलांचा सहभाग लक्षणिय होता. शासनाने तरोडावासीयांच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांचा रोष वाढला आहे. (वार्ताहर)