शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणा

By admin | Updated: April 9, 2016 02:39 IST

स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांची बांधिलकी जोपासणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिले. त्यांचे कार्य अजरामर आहे.

मनोहरराव नाईक : पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्व पुसद : स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांची बांधिलकी जोपासणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिले. त्यांचे कार्य अजरामर आहे. बाबासाहेबांचे सामाजिक तत्त्वज्ञान फार मोठे आहे, ते आम्ही आज आचरणात आणतो काय, हा मोठा प्रश्न आहे. यावर चर्चेची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांनी येथे केले. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित सम्यक जाणीवेच्या धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे उद्घाटन आमदार नाईक यांच्या हस्ते गुरुवारी येथील पंचायत समितीच्या सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय खडसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, डॉ. वामन गवई, के.डी. जाधव, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, उपाध्यक्ष डॉ. मो.नदीम, पंचायत समिती सभापती सुभाष कांबळे, फकीरराव वाढवे, अर्जुनराव लोखंडे, गोविंद भवरे, भीमराव कांबळे, शेख कय्युम उपस्थित होते.आमदार नाईक म्हणाले, कुणी मतांसाठी बाबासाहेबांचे नाव घेत असतील मात्र आपण बाबासाहेबांच्या सम्यक विचारांचे आचरण करतो. त्यांच्या प्रज्ञाशील या गुणांची समाजाला खरी गरज आहे, असे सांगितले. प्रास्ताविक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश वाढवे यांनी केले. सुरुवातीला संविधान प्रस्ताविकेचे वाचन प्रा.विलास भवरे यांनी केले. सुजाता महिला मंडळाने बुद्धवंदना सादर केली. तर सुमन चोपडे यांनी भीमगीत गायन केले. कार्यक्रमाचे निवेदन प्रा.महेश हंबर्डे यांनी तर आभार पी.एम. कांबळे यांनी मानले. (प्रतिनिधी)कोळसे पाटील यांचे बीज भाषणडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूलभूत हक्कासह संविधान दिले. या संविधानाची चौकट पोलादी आहे, मात्र विषारी विचारांमुळे संविधानाची अंमलबजावणी शून्य झाली आहे. वैयक्तिक स्वार्थातून बाहेर पडा, स्वतंत्र विचार करायला शिका आणि संविधानाच्या अंमलबजावणीसाठी पेटून उठा असे विचार न्या. बी.जी. कोळसे पाटील यांनी आपल्या बीज भाषणातून व्यक्त केले. आंबेडकरी विचारातून भारतीय संविधानाची यशस्वीता याविषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.