शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

थिमेटने १० जनावरे ठार

By admin | Updated: January 14, 2015 23:16 IST

शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी एका शेतकऱ्याने चक्क वन्यप्राण्यांसाठी थिमेट नामक विषारी द्रव गवतावर टाकले. हे गवत खाल्याने एक-दोन नव्हेतर तब्बल दहा जनावरे मृत्युमुखी पडली.

बोरीअरब : शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी एका शेतकऱ्याने चक्क वन्यप्राण्यांसाठी थिमेट नामक विषारी द्रव गवतावर टाकले. हे गवत खाल्याने एक-दोन नव्हेतर तब्बल दहा जनावरे मृत्युमुखी पडली. तर पाच जनावरांची प्रकृती गंभीर आहे. ही खळबळजनक घटना लगतच्या पेंढारा शिवारात घडली. नेर तालुक्यातील पेंढारा येथील गुराखी ज्ञानेश्वर रणमले यांनी गावातील २५ ते ३० जनावरे चारण्यासाठी जंगलात नेली. जंगलानजीक शेत असल्याने तेथे वन्यप्राण्यांचा हैदोस आहे. पिकाचे संरक्षण करण्यासाठी एका शेतकऱ्याने वन्यप्राण्यांसाठी गवतावर थिमेट नामक विषारी द्रव टाकून ठेवले होते. गुराखी रणमले यांनी चारण्यासाठी नेलेल्या जनावरांनी थिमेट टाकून असलेले गवत खालले. अल्पावधीतच जनावरांना विषबाधा झाली. त्यामध्ये नऊ गाई आणि एक गोऱ्हा जागीच ठार झाले. तर पाच जनावरांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहे. एका गर्भवती गायीची अवस्था पाहून तर कुणाचेही हृदय गहिवरावे. थिमेट खाल्याने तिचे पोटच फाटले. त्यातून चिमुकले पिलूही बाहेर पडले. मातेशेजारी त्या मृत पिलाला पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. ही जनावरे पेंढारा येथील शंकर खद्रे, पुलाबाई देवकर, महादेव रणमले, गोविंद लडके, विठ्ठल बेले, परसराम बेले, किसन ढोक आदींच्या मालकीची होती. त्यांचे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले. घटनेनंतर पशुपालक पोलिसात तक्रार देण्यास गेले. मात्र परस्पर प्रकरण मिटवा, असा सल्ला देत पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली. संबंधित शेतकऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी संबंधित पशुपालकांची आहे. मात्र पोलीसच पाठीराखे झाल्याने तो शेतकरी निश्चिंत असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)