शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनातून प्रतिभावंत साहित्यिक घडतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 22:49 IST

बाल साहित्य संमेलन हे बालकांच्या सुप्त गुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे. या संमेलनातून भविष्यात नक्कीच प्रतिभावंत साहित्यिक घडतील. बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता बाल साहित्य संमेलनाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन राजुदास जाधव यांनी केले.

ठळक मुद्देराजुदास जाधव : येळाबारा येथे बाल साहित्य संमेलन, कविता आणि चित्रांच्या प्रदर्शनाने वेधले लक्ष

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : बाल साहित्य संमेलन हे बालकांच्या सुप्त गुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे. या संमेलनातून भविष्यात नक्कीच प्रतिभावंत साहित्यिक घडतील. बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता बाल साहित्य संमेलनाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन राजुदास जाधव यांनी केले.यवतमाळ तालुक्यातील येळाबारा येथे टाटा ट्रस्ट, वर्ल्ड व्हिजन इंडिया, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान आणि २१ गावातील शाळा व्यवस्थापन समिती फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसºया बाल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. भविष्यात शासन पातळीवरसुद्धा अशा आगळ्यावेगळ्या संमेलनाची दखल शासनाने घेतली पाहिजे, कारण याच बालकांमधून पुढे समाज परिवर्तन करणारे साहित्यिक निर्माण होणार आहे, असेही राजुदास जाधव योवळी म्हणाले.मुलांनी स्वत: लिहिलेल्या कविता आणि काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन संमेलनस्थळी लावले होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शाह, पंचायत समिती सदस्य सूमन गावंडे, राजू गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. वर्ल्ड व्हिजन प्रकल्पचे संचालक राजेंद्र सूर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समिती फेडरेशनचे अध्यक्ष मनोहर विरूडकर, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज भोयर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.प्रास्ताविक सुनील भेले यांनी केले. संचालन व आभार संतोष पिंगळे यांनी मानले. व्यवस्थापन आकाश चंदनखेडे यांनी सांभाळले. प्रा. घनश्याम दरणे, सुनील कदम यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला.६४ बालकवींच्या कवितासंमेलनात ६४ बालकवींनी विविध विषयांवर आपल्या कविता सादर केल्या. पाठ्यपुस्तकातील पाठावर पपेटसारख्या विविध माध्यमाने नाट्यकर, माध्यमांतर सादर करण्यात आले होते. काव्यसंमेलनाचे संचालन संबोधी भेले हिने केले. चित्रकाव्य प्रदर्शन पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.शाळा बंद धोरणाचा निषेधसंमेलनात विविध ठराव घेण्यात आले. हातगाव येथील यश बल्की यांनी ३० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या शासन धोरणाचा निषेध करण्यात येत आहे आणि शाळा व्यवस्थापन समिती फेडरेशनच्या आंदोलनास पाठिंबा देत आहे, असा ठराव मांडला. बाल साहित्य संमेलनाचे शासनस्तरावर आयोजन व्हावे, असाही ठराव घेतला गेला.