शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार

By admin | Updated: November 15, 2014 02:11 IST

यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी पीक सोयाबीनने दगा दिला आहे. पिकच न झाल्यामुळे पुढील वर्षी खरिपात सोयाबीन बियाण्यांची प्रचंड टंचाई भासणार आहे.

नेर : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी पीक सोयाबीनने दगा दिला आहे. पिकच न झाल्यामुळे पुढील वर्षी खरिपात सोयाबीन बियाण्यांची प्रचंड टंचाई भासणार आहे. शेतकऱ्यांना यासाठी जादा दाम मोजावे लागण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. कधी अती पाऊस तर कधी परतीचा पाऊस आणि गारपीट आणि कधी अत्यल्प पाऊस अशा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पिकांना बसत असून याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनमानावर होत आहे. यावर्षी खंडित पावसामुळे दीड ते दोन महिने उशिरा झालेली पेरणी. त्यानंतर दुबार व तिबार पेरणीचे संकट आणि पावसाने मारलेली दडी यामुळे सोयाबीनची उगवण अत्यल्प झाली. बाधित बियाण्याच्या पेरणीमुळे यावर्षी सोयाबीनवर पिवळा (मोझॅक) रोगाचा प्रादुर्भाव झाला. प्रतिकूल हवामानामुळे ७० टक्के सोयाबीन करपले, शेंगा पोचट राहिल्या, एकरी एक पोत्याची झडती सध्या होत असल्याचे दिसून येते. मागील वर्षापेक्षाही यावर्षीचे सोयाबीन खराब झाल्यामुळे ते पुढच्या वर्षीच्या पेरणीयोग्य नाही. परिणामी २०१५ मध्ये खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांची तीव्र टंचाई राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या सोयाबीन कापणीचा व मळणीचा हंगाम सुरू आहे. यापूर्वी सोयाबीनवर झालेल्या मोझॅक रोगाच्या प्रादुर्भावामुळे एकूण लागवणीपैकी सोयाबीनचे ७० टक्के क्षेत्र करपले आहे. शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पाऊस न आल्याने त्या मोठ्या प्रमाणात पोचट राहिल्या. व दाणेही बारिक झाले. यामुळे मळणीमध्ये एकरी एक किंवा दोन पोते सोयाबीन झडत आहे. एकरी १५ हजार रुपये खर्च सोयाबीनला येत असताना उत्पन्न मात्र केवळ अडीच ते तीन हजार रुपये मिळत असेल तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी जगावे की मरावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. सद्यस्थितीत २० टक्के संरक्षित सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांव्यतिरिक्त ८० टक्के सोयाबीन उत्पादक मरणासन्न अवस्थेत आहे. मागील वर्षी सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात ४० टक्क्यांनी घट झाली होती. यावर्षी मात्र त्याहीपेक्षा बिकट परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाच्या सोयाबीन उत्पादनात किमान ७० टक्क्यांनी कमी येणार असल्याची शक्यता आहे. सलग दोन वर्षांपासून सोयाबीन उत्पादकांची हीच परिस्थिती आहे. दरवर्षी अत्यल्प उत्पादन व निकृष्ट दर्जाचे बियाणे यामुळे पुढील हंगामासाठी सोयाबीनचे दर्जेदार बियाणे मिळणे दुरापस्त झाले आहे. महाबीजचे प्लॉटदेखील निकृष्ट आहेत. अन्य बियाणे कंपन्यांचीसुद्धा हीच परिस्थिती आहे. राज्यात सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या मध्यप्रदेशातील सोयाबीन उत्पादकांचीदेखील सद्यस्थिती अतिशय वाईट आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतातून उपलब्ध होणारे सोयाबीन दरवर्षीप्रमाणे बोगसच राहणार आहे. यामुळे १०० दिवसांचे कॅश ड्रॉप यानंतर दुर्लभ होईल. शेतकऱ्यांना यापुढे परंपरागत पिकांवरच मदार ठेवावी लागणार आहे. सोयाबीन हे पीक नगदी असले तरी श्ेतकऱ्यांना आता त्यावर अधिक अवलंबून राहता येणार नाही. तेव्हा अन्य पर्यायाचा वापर करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, असे मत कृषितज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे पुढील हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीनचे महागडे बियाणे खरेदी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. सोयाबीनचा पुढील हंगाम देखील फारसा लाभदायक राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून न राहता इतरही लागवणीचा विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)