शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार

By admin | Updated: November 15, 2014 02:11 IST

यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी पीक सोयाबीनने दगा दिला आहे. पिकच न झाल्यामुळे पुढील वर्षी खरिपात सोयाबीन बियाण्यांची प्रचंड टंचाई भासणार आहे.

नेर : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी पीक सोयाबीनने दगा दिला आहे. पिकच न झाल्यामुळे पुढील वर्षी खरिपात सोयाबीन बियाण्यांची प्रचंड टंचाई भासणार आहे. शेतकऱ्यांना यासाठी जादा दाम मोजावे लागण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. कधी अती पाऊस तर कधी परतीचा पाऊस आणि गारपीट आणि कधी अत्यल्प पाऊस अशा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पिकांना बसत असून याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनमानावर होत आहे. यावर्षी खंडित पावसामुळे दीड ते दोन महिने उशिरा झालेली पेरणी. त्यानंतर दुबार व तिबार पेरणीचे संकट आणि पावसाने मारलेली दडी यामुळे सोयाबीनची उगवण अत्यल्प झाली. बाधित बियाण्याच्या पेरणीमुळे यावर्षी सोयाबीनवर पिवळा (मोझॅक) रोगाचा प्रादुर्भाव झाला. प्रतिकूल हवामानामुळे ७० टक्के सोयाबीन करपले, शेंगा पोचट राहिल्या, एकरी एक पोत्याची झडती सध्या होत असल्याचे दिसून येते. मागील वर्षापेक्षाही यावर्षीचे सोयाबीन खराब झाल्यामुळे ते पुढच्या वर्षीच्या पेरणीयोग्य नाही. परिणामी २०१५ मध्ये खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांची तीव्र टंचाई राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या सोयाबीन कापणीचा व मळणीचा हंगाम सुरू आहे. यापूर्वी सोयाबीनवर झालेल्या मोझॅक रोगाच्या प्रादुर्भावामुळे एकूण लागवणीपैकी सोयाबीनचे ७० टक्के क्षेत्र करपले आहे. शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पाऊस न आल्याने त्या मोठ्या प्रमाणात पोचट राहिल्या. व दाणेही बारिक झाले. यामुळे मळणीमध्ये एकरी एक किंवा दोन पोते सोयाबीन झडत आहे. एकरी १५ हजार रुपये खर्च सोयाबीनला येत असताना उत्पन्न मात्र केवळ अडीच ते तीन हजार रुपये मिळत असेल तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी जगावे की मरावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. सद्यस्थितीत २० टक्के संरक्षित सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांव्यतिरिक्त ८० टक्के सोयाबीन उत्पादक मरणासन्न अवस्थेत आहे. मागील वर्षी सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात ४० टक्क्यांनी घट झाली होती. यावर्षी मात्र त्याहीपेक्षा बिकट परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाच्या सोयाबीन उत्पादनात किमान ७० टक्क्यांनी कमी येणार असल्याची शक्यता आहे. सलग दोन वर्षांपासून सोयाबीन उत्पादकांची हीच परिस्थिती आहे. दरवर्षी अत्यल्प उत्पादन व निकृष्ट दर्जाचे बियाणे यामुळे पुढील हंगामासाठी सोयाबीनचे दर्जेदार बियाणे मिळणे दुरापस्त झाले आहे. महाबीजचे प्लॉटदेखील निकृष्ट आहेत. अन्य बियाणे कंपन्यांचीसुद्धा हीच परिस्थिती आहे. राज्यात सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या मध्यप्रदेशातील सोयाबीन उत्पादकांचीदेखील सद्यस्थिती अतिशय वाईट आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतातून उपलब्ध होणारे सोयाबीन दरवर्षीप्रमाणे बोगसच राहणार आहे. यामुळे १०० दिवसांचे कॅश ड्रॉप यानंतर दुर्लभ होईल. शेतकऱ्यांना यापुढे परंपरागत पिकांवरच मदार ठेवावी लागणार आहे. सोयाबीन हे पीक नगदी असले तरी श्ेतकऱ्यांना आता त्यावर अधिक अवलंबून राहता येणार नाही. तेव्हा अन्य पर्यायाचा वापर करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, असे मत कृषितज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे पुढील हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीनचे महागडे बियाणे खरेदी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. सोयाबीनचा पुढील हंगाम देखील फारसा लाभदायक राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून न राहता इतरही लागवणीचा विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)