शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

वणीत अकरावी प्रवेशाचा प्रश्न चिघळणार

By admin | Updated: July 28, 2016 01:07 IST

वणी उपविभागातील तील विद्यार्थ्यांचा अकरावीच्या प्रवेशाचा प्रश्न अद्यापही सुटला नसून या विषयात

चर्चा निष्फळ : शुक्रवारपासून पदाधिकाऱ्यांचे बेमुदत तर विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण वणी : वणी उपविभागातील तील विद्यार्थ्यांचा अकरावीच्या प्रवेशाचा प्रश्न अद्यापही सुटला नसून या विषयात शिक्षण विभागाशी झालेली चर्चाही निष्फळ ठरल्याने हा प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली २९ जुलैपासून स्वप्नील धुर्वे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. याविषयी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील, असा निर्धार संघटनेने केला आहे. वणी उपविभागातील विद्यार्थ्यांना अकरावीच्या विज्ञान शाखेत प्रवेश मिळावा, यासाठी ५ जुलैै रोजी ‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली १८३ विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांना मागेल त्या महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल व कुणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असा शब्द शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र १० दिवसानंतरही विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नाहीत. यासंदर्भात विचारणा केली असता, आम्ही वणीतील महाविद्यालयांना यादी पाठविली आहे, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र त्यानंतरही प्रवेशाचा प्रश्न सुटला नाही. १६ जुलैैला येथील महसूल भवनात विद्यार्थ्यांचे वर्ग भरविण्यात येऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी स्थानिक प्रशासनाने प्रवेशासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तरीही प्रवेश रखडले. लोकप्रतिनिधींना निवेदने दिली. त्याचाही उपयोग झाला नाही. २१ जुलैैला पुन्हा यवतमाळ येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यावेळीसुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशाची हमी दिली. मात्र आता जुलैै महिन्या संपत आला असला तरी अकरावीच्या प्रवेशाचा प्रश्न कायम आहे. विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रीया न झाल्यास शुक्रवार २९ जुलैैपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा ‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या संघटनेचे स्वप्नील धुर्वे यांनी दिला आहे. (कार्यालय प्रतिनिधी) अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा अकरावी प्रवेशाच्या प्रकरणात शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल केली असून या प्रकरणाची उच्चस्तरिय चौैकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर फौैजदारी कारवाई करण्याची मागणी स्वप्नील धुर्वे यांनी केली आहे. बुधवार आमरण उपोषणासंदर्भात वणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.